शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

ही तर अनिती व दुर्नीती; विरोधी पक्षांचा कडाडून हल्ला

By admin | Updated: January 2, 2015 02:27 IST

योजना आयोगाचे नाव नीती करण्याच्या केंद्राच्या निर्णयावर हल्ला चढविताना विरोधी पक्षांनी हा निर्णय दिखावू व वरकरणी असल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली : योजना आयोगाचे नाव नीती करण्याच्या केंद्राच्या निर्णयावर हल्ला चढविताना विरोधी पक्षांनी हा निर्णय दिखावू व वरकरणी असल्याचे म्हटले आहे. या निर्णयामुळे राज्यांसोबत भेदभावाचे धोरण राबविले जाण्याची व धोरणे ठरवताना कॉर्पोरेट््सचा प्रभाव राहण्याची भीती व्यक्त केली. माकपाचे नेते सीताराम येचुरी यांनी आयोगाचे नाव बदलण्याच्या घटनेचे दुर्नीती अशा शब्दात वर्णन केले. सरकार जर २०१५ च्या आधी जनतेचे वरकरणी व दिखावू गोष्टींनी अभिनंदन करू इच्छित असेल तर त्यावर आपण काही भाष्य करू शकत नाही असे म्हटले. सरकारच्या या पावलामुळे पंतप्रधानांचे कार्यालय व अर्थ मंत्रालयाची आर्थिक उद्दिष्ट वसरकारी तिजोरीबाबतची दृष्टी अधू असल्याचे स्पष्ट होते असेही त्यांनी म्हटले आहे. राज्य व केंद्रादरम्यान वादाची स्थिती असताना नीती अंतिम निर्णय घेईल तेव्हा राज्यांसोबत अन्याय होण्याची शक्यता आहे असेही ते पुढे म्हणाले. काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी, नीतीच्या निर्णयांमधून राज्यांमध्ये भेदभाव केला जाण्याची शक्यता बोलून दाखविली. यावेळी प्रतिक्रिया देताना त्यांनी पुढे, योजना आयोग योजना बनवीत होता. त्याचे नाव नीती ठेवून सरकार कोणता संदेश देण्याचा प्रयत्न करीत आहे असा सवाल केला.योजना आयोगाच्या पुनर्गठनाचा विरोध काँग्रेसने सैद्धांतिक आधारावर केल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. हा युद्ध करण्याचा मुद्दा नाही तर ती सिद्धांताची बाब आहे. विरोधी पक्षात असताना भाजपा संघवादाबाबत भरभरून बोलत होता आणि आता सत्तेत आल्यानंतर त्याच्या विरुद्ध काम करीत आहे असेही ते यावेळी म्हणाले. भाकपाचे ज्येष्ठ नेते गुरुदास दासगुप्ता यांनी, योजना आयोगाला संपुष्टात आणून नीती आयोग नावाची नवी संस्था निर्माण केल्याने अनियमित अर्थव्यवस्थेचा मार्ग प्रशस्त होईल अशी प्रतिक्रिया दिली आहे. हा नाव बदलण्याचा प्रकार नाही, सरकारने योजना आयोगाला संपविले कारण त्याचा योजनेवरच विश्वास नाही. तृणमूलच्या सौगत राय यांनी, योजना आयोगाला संपविण्यामुळे अर्थव्यवस्था अनियोजित होईल व त्यामुळे कॉर्पोरेट््सची चलती राहील असे म्हटले आहे. मी योजना आयोगाला संपविण्याच्या विरोधात आहे. जो इतक्या वर्षांपासून देसात काम करीत होता, आपण योजनाबद्ध अर्थव्यवस्थेवर विश्वास ठेवून वाटचाल करीत होतो. मात्र सरकारच्या या पावलाने अर्थव्यवस्था अनियोजित होईल अशी पुस्ती त्यांनी जोडली. च्काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी, नीतीच्या निर्णयांमधून राज्यांमध्ये भेदभाव केला जाण्याची शक्यता बोलून दाखविली. यावेळी प्रतिक्रिया देताना त्यांनीआयोगाचे नाव नीती ठेवून सरकार कोणता संदेश देण्याचा प्रयत्न करीत आहे असा सवाल केला. योजना आयोगाच्या पुनर्गठनाचा विरोध काँग्रेसने सैद्धांतिक आधारावर केल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.