शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

बेरोजगारी, महागाई अन् देशातील आर्थिक असमानता..; बिहारमधून राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 16:02 IST

Rahul Gandhi in Bihar: 'भारतीय राज्यघटना हजारो वर्षे जुन्या विचारसरणीचा विस्तार आहे, ज्यामध्ये समानता आणि न्यायाची भावना आहे.'

Rahul Gandhi in Bihar: लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी बिहारमधील बेगुसराय येथे 'स्थलांतर थांबवा, नोकऱ्या द्या' मोर्चात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी बेरोजगारी, महागाई, शिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर तरुणांना जागरुक केले. याशिवाय त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या शुल्काच्या मुद्द्यावरही प्रतिक्रिया दिली. 

सत्याचा मार्ग अवलंबावाराहुल गांधी म्हणाले की, अलीकडेच मी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित यांच्या पॉडकास्टमध्ये भाग घेतला होता. तिथे मला विचारण्यात आले की, माझे आजोबा पंडित नेहरू नेमके कोण होते, पंतप्रधान, नेते की स्वातंत्र्यसैनिक? यावर राहुल यांनी उत्तर दिले की, जेव्हा मी याबद्दल विचार करतो, तेव्हा जाणवते की, माझे आजोबा आणि महात्मा गांधी या दोघांचाही सत्याशी खोलवर संबंध आहे. आंबेडकर, सावित्रीबाई फुले, भगवान बुद्ध, गुरु नानक, कबीर आणि नारायण गुरूंमध्येही हीच विचारधारा दिसून येते. प्रत्येकाने सत्य आणि न्यायाचा मार्ग अवलंबला पाहिजे.

राहुल गांधी पुढे म्हणतात, भारतीय संविधान ही नवीन गोष्ट नाही, तर ती हजारो वर्षे जुन्या विचारसरणीचा विस्तार आहे, ज्यामध्ये समानता आणि न्यायाची भावना आहे. आंबेडकर, फुले, नेहरू यांसारख्या महापुरुषांची विचारसरणी राज्यघटनेत दिसून येते. सावरकरांच्या विचाराचा यात समावेश नाही, कारण ते सत्याच्या मार्गावर चालू शकले नाहीत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

आर्थिक असमानता...अमेरिकन शेअर बाजाराचे उदाहरण देताना राहुल गांधी म्हणाले की, तिथून कोट्यवधींचा नफा झाला, पण त्याचा फायदा सर्वसामान्यांना झाला नाही. भारतातही तीच परिस्थिती आहे. काही निवडक लोकांनाच आर्थिक फायदा होतो. त्यांनी दोन उदाहरणे दिली: एक ऑर्थोपेडिक सर्जन आणि एक आयआयटी प्राध्यापक. त्यांनी सांगितले की, दोघांमध्येही क्षमता आहे, पण जर ते मागासवर्गीय (OBC/EBC) मधून आले असतील, तर व्यवस्था त्यांना पुढे जाऊ देत नाही. 

त्यांना बँकेचे कर्ज मिळू शकत नाही, रुग्णालये उघडता येत नाहीत आणि सरकारी नोकरशाही त्यांचा मार्ग अडवते. तेलंगणामध्ये आमच्या सरकारने जात जनगणना केली, ज्यामध्ये हे स्पष्ट झाले की, सरकारी बँकांकडून कर्ज घेणारे लोक ईबीसी, ओबीसी किंवा दलित समुदायाचे नाहीत. या बँकांचे मालक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापनातही या वर्गांचे प्रतिनिधित्व नाही. जवळजवळ शून्य आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाBiharबिहार