शहरं
Join us  
Trending Stories
1
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
2
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
4
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
5
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
6
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
7
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
8
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
9
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
10
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
11
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
12
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?
13
Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार
14
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
15
Nashik Crime: मैत्रिणीने कॅफेमध्ये बोलावून घेतलं अन् हल्लेखोरांना केला 'मेसेज'; नाशिकमध्ये तरुणाची कॅफेमध्ये कोयत्याने हत्या
16
आता Aadhaar अपडेट करणं होणार सोपं! घरबसल्या बदलू शकता लिंक मोबाईल नंबर, केव्हापासून मिळणार सुविधा
17
नाशिक हादरलं! कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे अन् सुरक्षेचे १२ वाजवून १२ तासांत दोन खून
18
Israel attack Yemen: इस्रायलचा येमेनवर मोठा हवाई हल्ला, राजधानी सना हादरली, हुथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर पलटवार
19
Post Office च्या 'या' स्कीममध्ये ₹१०,००० च्या गुंतवणूकीवर मिळेल ₹१,१३,६५८ चं गॅरंटीड रिटर्न, पटापट चेक करा डिटेल्स
20
रोज रात्री बॉयफ्रेंडला व्हिडीओ कॉल करायची अन् नवऱ्याच्या चुगल्या सांगायची, पण झाली अशी चूक की...

बेरोजगारी, महागाई अन् देशातील आर्थिक असमानता..; बिहारमधून राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 16:02 IST

Rahul Gandhi in Bihar: 'भारतीय राज्यघटना हजारो वर्षे जुन्या विचारसरणीचा विस्तार आहे, ज्यामध्ये समानता आणि न्यायाची भावना आहे.'

Rahul Gandhi in Bihar: लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी बिहारमधील बेगुसराय येथे 'स्थलांतर थांबवा, नोकऱ्या द्या' मोर्चात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी बेरोजगारी, महागाई, शिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर तरुणांना जागरुक केले. याशिवाय त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या शुल्काच्या मुद्द्यावरही प्रतिक्रिया दिली. 

सत्याचा मार्ग अवलंबावाराहुल गांधी म्हणाले की, अलीकडेच मी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित यांच्या पॉडकास्टमध्ये भाग घेतला होता. तिथे मला विचारण्यात आले की, माझे आजोबा पंडित नेहरू नेमके कोण होते, पंतप्रधान, नेते की स्वातंत्र्यसैनिक? यावर राहुल यांनी उत्तर दिले की, जेव्हा मी याबद्दल विचार करतो, तेव्हा जाणवते की, माझे आजोबा आणि महात्मा गांधी या दोघांचाही सत्याशी खोलवर संबंध आहे. आंबेडकर, सावित्रीबाई फुले, भगवान बुद्ध, गुरु नानक, कबीर आणि नारायण गुरूंमध्येही हीच विचारधारा दिसून येते. प्रत्येकाने सत्य आणि न्यायाचा मार्ग अवलंबला पाहिजे.

राहुल गांधी पुढे म्हणतात, भारतीय संविधान ही नवीन गोष्ट नाही, तर ती हजारो वर्षे जुन्या विचारसरणीचा विस्तार आहे, ज्यामध्ये समानता आणि न्यायाची भावना आहे. आंबेडकर, फुले, नेहरू यांसारख्या महापुरुषांची विचारसरणी राज्यघटनेत दिसून येते. सावरकरांच्या विचाराचा यात समावेश नाही, कारण ते सत्याच्या मार्गावर चालू शकले नाहीत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

आर्थिक असमानता...अमेरिकन शेअर बाजाराचे उदाहरण देताना राहुल गांधी म्हणाले की, तिथून कोट्यवधींचा नफा झाला, पण त्याचा फायदा सर्वसामान्यांना झाला नाही. भारतातही तीच परिस्थिती आहे. काही निवडक लोकांनाच आर्थिक फायदा होतो. त्यांनी दोन उदाहरणे दिली: एक ऑर्थोपेडिक सर्जन आणि एक आयआयटी प्राध्यापक. त्यांनी सांगितले की, दोघांमध्येही क्षमता आहे, पण जर ते मागासवर्गीय (OBC/EBC) मधून आले असतील, तर व्यवस्था त्यांना पुढे जाऊ देत नाही. 

त्यांना बँकेचे कर्ज मिळू शकत नाही, रुग्णालये उघडता येत नाहीत आणि सरकारी नोकरशाही त्यांचा मार्ग अडवते. तेलंगणामध्ये आमच्या सरकारने जात जनगणना केली, ज्यामध्ये हे स्पष्ट झाले की, सरकारी बँकांकडून कर्ज घेणारे लोक ईबीसी, ओबीसी किंवा दलित समुदायाचे नाहीत. या बँकांचे मालक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापनातही या वर्गांचे प्रतिनिधित्व नाही. जवळजवळ शून्य आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाBiharबिहार