शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

UN Report : भारत चीनलाही मागे टाकणार, 8 वर्षातच 'सर्वाधिक लोकसंख्येचा' देश ठरणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 12:02 IST

संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालानुसार पुढील आठ वर्षात भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनणार आहे.

नवी दिल्ली - देशातील वाढती लोकसंख्या ही भारतासमोरील सर्वात मोठी समस्या बनत चालली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरिकांना सोयी सुविधा पुरविताना सरकारला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या, जगातील क्रमांक दोनची लोकसंख्या असलेला देश म्हणून भारताचा नंबर लागतो. तर, या यादीत चीन अग्रस्थानावर आहे. मात्र, लवकरच लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनला मागे टाकणार असल्याचे एका संशोधनातून पुढे आले आहे. 

संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालानुसार पुढील आठ वर्षात भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनणार आहे. दरम्यानच्या काळात चीनने काही कडक नियम बनवून आणि जनजागृतीद्वारे आपल्या देशाची लोकसंख्या नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे, आगामी काही वर्षात चीनच्या लोकसंख्येत 31.4 मिलियन्स घट होईल किंवा 2019 ते 2050 या कालावधीत चायनिज लोकसंख्येत 2.2 टक्क्यांची घट होणार आहे. 'द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स 2019' या मथळ्याखाली संयुक्त राष्ट्रांचा एक अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. या अहवालानुसार जगातील लोकसंख्येत 2050 पर्यंत अंदाजे 2 बिलियन्स एवढी वाढ सांगण्यात आली आहे. त्यानुसार, सध्या असलेल्या 7.7 बिलियन्स लोकसंख्येत वाढ होऊन जगातील एकूण लोकसंख्या 9.7 बिलियन्स एवढी होईल. त्यामध्ये भारतासह इतर आठ देशांची लोकसंख्या एकत्र केल्यास जगातील लोकसंख्येच्या 50 टक्के लोकसंख्या या 8 देशांची असेल. 2050 पर्यंत ज्या 9 देशांची लोकसंख्या सर्वाधिक वाढेल, त्यामध्ये भारत, नायजेरिया आणि पाकिस्तानच्या लोकसंख्येत सर्वाधिक वाढ होणार आहे. 

जागतिक लोकसंख्या दरवाढ लक्षात घेता, जन्मदर कमी झाल्याचे दिसून येते. सन 1990 मध्ये प्रत्येक महिलेचा जन्मदर 3.2 एवढा होता, तो 2050 पर्यंत 2.2 एवढा कमी होईल. जगातील लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी जन्मदर 2.1 पर्यंत कमी होणं गरजेचं आहे.  

टॅग्स :chinaचीनIndiaभारतunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ