शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

धक्कादायक! आसामच्या तिनसुकियामध्ये उल्फाच्या दहशतवाद्यांकडून  5 जणांची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 07:55 IST

आसाममधल्या तिनसुकिया शहरात युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (उल्फा) या दहशतवादी संघटनेनं पाच जणांची हत्या केल्यानं खळबळ उडाली आहे.

दिसपूर- आसाममधल्या तिनसुकिया शहरात युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (उल्फा) या दहशतवादी संघटनेनं पाच जणांची हत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. उल्फाच्या दहशतवाद्यांनी त्या पाच जणांचं अपहरण केलं. त्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. ज्यात पाच जणांचा मृत्यू झाला.गुरुवारी संध्याकाळी पावणे आठ वाजताच्या दरम्यान उल्फाच्या दहशतवाद्यांनी सहा तरुणांचं अपहरण केलं. त्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांना ब्रह्मपुत्रा नदीच्या किना-यावर नेऊन गोळ्या घातल्या. या गोळीबारात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात जात असताना जीव गेला. एका जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.आसाम पोलीस खात्यातील एडीजीपी मुकेश अग्रवाल म्हणाले, या हल्ल्यामागे उल्फा या दहशतवादी संघटनेचा हात आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आसाममध्ये तरुणांवर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. ज्यात श्यामलाल बिस्वास, अनंत बिस्वास, अभिनाश बिस्वास, सुबोध दास यांची हत्या झाली आहे. हे सगळं एनसीआरमुळेच तर झालं नाही ना, अशी शंकाही ममतांनी उपस्थित केली आहे. ममता म्हणाल्या, या लोकांच्या मृत्यूचं दुःख आहे. या हल्ल्यातील दोषींना लवकरात लवकर शिक्षा द्यावी. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. तत्पूर्वी आसामाच्या गुवाहाटीमध्येही 13 ऑक्टोबर रोजी एक स्फोट झाला होता. ज्यात 4 जण गंभीररीत्या जखमी होते.  

टॅग्स :terroristदहशतवादी