शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

धक्कादायक! आसामच्या तिनसुकियामध्ये उल्फाच्या दहशतवाद्यांकडून  5 जणांची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 07:55 IST

आसाममधल्या तिनसुकिया शहरात युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (उल्फा) या दहशतवादी संघटनेनं पाच जणांची हत्या केल्यानं खळबळ उडाली आहे.

दिसपूर- आसाममधल्या तिनसुकिया शहरात युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (उल्फा) या दहशतवादी संघटनेनं पाच जणांची हत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. उल्फाच्या दहशतवाद्यांनी त्या पाच जणांचं अपहरण केलं. त्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. ज्यात पाच जणांचा मृत्यू झाला.गुरुवारी संध्याकाळी पावणे आठ वाजताच्या दरम्यान उल्फाच्या दहशतवाद्यांनी सहा तरुणांचं अपहरण केलं. त्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांना ब्रह्मपुत्रा नदीच्या किना-यावर नेऊन गोळ्या घातल्या. या गोळीबारात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात जात असताना जीव गेला. एका जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.आसाम पोलीस खात्यातील एडीजीपी मुकेश अग्रवाल म्हणाले, या हल्ल्यामागे उल्फा या दहशतवादी संघटनेचा हात आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आसाममध्ये तरुणांवर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. ज्यात श्यामलाल बिस्वास, अनंत बिस्वास, अभिनाश बिस्वास, सुबोध दास यांची हत्या झाली आहे. हे सगळं एनसीआरमुळेच तर झालं नाही ना, अशी शंकाही ममतांनी उपस्थित केली आहे. ममता म्हणाल्या, या लोकांच्या मृत्यूचं दुःख आहे. या हल्ल्यातील दोषींना लवकरात लवकर शिक्षा द्यावी. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. तत्पूर्वी आसामाच्या गुवाहाटीमध्येही 13 ऑक्टोबर रोजी एक स्फोट झाला होता. ज्यात 4 जण गंभीररीत्या जखमी होते.  

टॅग्स :terroristदहशतवादी