शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

धक्कादायक! आसामच्या तिनसुकियामध्ये उल्फाच्या दहशतवाद्यांकडून  5 जणांची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 07:55 IST

आसाममधल्या तिनसुकिया शहरात युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (उल्फा) या दहशतवादी संघटनेनं पाच जणांची हत्या केल्यानं खळबळ उडाली आहे.

दिसपूर- आसाममधल्या तिनसुकिया शहरात युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (उल्फा) या दहशतवादी संघटनेनं पाच जणांची हत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. उल्फाच्या दहशतवाद्यांनी त्या पाच जणांचं अपहरण केलं. त्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. ज्यात पाच जणांचा मृत्यू झाला.गुरुवारी संध्याकाळी पावणे आठ वाजताच्या दरम्यान उल्फाच्या दहशतवाद्यांनी सहा तरुणांचं अपहरण केलं. त्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांना ब्रह्मपुत्रा नदीच्या किना-यावर नेऊन गोळ्या घातल्या. या गोळीबारात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात जात असताना जीव गेला. एका जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.आसाम पोलीस खात्यातील एडीजीपी मुकेश अग्रवाल म्हणाले, या हल्ल्यामागे उल्फा या दहशतवादी संघटनेचा हात आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आसाममध्ये तरुणांवर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. ज्यात श्यामलाल बिस्वास, अनंत बिस्वास, अभिनाश बिस्वास, सुबोध दास यांची हत्या झाली आहे. हे सगळं एनसीआरमुळेच तर झालं नाही ना, अशी शंकाही ममतांनी उपस्थित केली आहे. ममता म्हणाल्या, या लोकांच्या मृत्यूचं दुःख आहे. या हल्ल्यातील दोषींना लवकरात लवकर शिक्षा द्यावी. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. तत्पूर्वी आसामाच्या गुवाहाटीमध्येही 13 ऑक्टोबर रोजी एक स्फोट झाला होता. ज्यात 4 जण गंभीररीत्या जखमी होते.  

टॅग्स :terroristदहशतवादी