दिसपूर- आसाममधल्या तिनसुकिया शहरात युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (उल्फा) या दहशतवादी संघटनेनं पाच जणांची हत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. उल्फाच्या दहशतवाद्यांनी त्या पाच जणांचं अपहरण केलं. त्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. ज्यात पाच जणांचा मृत्यू झाला.गुरुवारी संध्याकाळी पावणे आठ वाजताच्या दरम्यान उल्फाच्या दहशतवाद्यांनी सहा तरुणांचं अपहरण केलं. त्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांना ब्रह्मपुत्रा नदीच्या किना-यावर नेऊन गोळ्या घातल्या. या गोळीबारात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात जात असताना जीव गेला. एका जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
धक्कादायक! आसामच्या तिनसुकियामध्ये उल्फाच्या दहशतवाद्यांकडून 5 जणांची निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 07:55 IST