शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

सरकारची मेहनत फळाला आली, देशात १ कोटींहून अधिक मोबाइल झाले 'आधार'ला लिंक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 20:03 IST

मोबाईल क्रमांकाशी आधार लिंक करण्यासाठी भारत सरकारची मेहनत अखेर फळाला आली आहे.

मोबाईल क्रमांकाशी आधार लिंक करण्यासाठी भारत सरकारची मेहनत अखेर फळाला आली आहे. फेब्रुवारी महिन्यात १ कोटीहून अधिक मोबाईल क्रमांक 'आधार'शी लिंक करण्यात आले आहेत. खुद्द UIDAI ने शुक्रवारी एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे. UIDAI ने सांगितले की, गेल्या महिन्यात १ कोटीहून अधिक मोबाईल नंबर 'आधार'शी लिंक करण्यात आले आहेत. जानेवारीमध्ये ही संख्या ५६.७ लाख होती. म्हणजे जानेवारीपासून या महिन्यात जवळपास दुप्पट लोकांनी आपला मोबाईल नंबर लिंक केला आहे.

भारत सरकार अनेक दिवसांपासून लोकांना त्यांचे आधार मोबाईल क्रमांकाशी लिंक करण्याचे आवाहन. त्यानंतर एवढ्या मोठ्या संख्येनं लोकांनी आधार लिंक केलं आहे. फेब्रुवारी महिन्यात 'आधार'शी मोबाईल क्रमांक जोडण्यात ९३ टक्के वाढ झाली आहे.

'आधार'द्वारे होणारे व्यवहारही वाढलेUIDAI च्या मते सतत प्रमोशन, सुविधा आणि विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर अपडेट ठेवण्यासाठी ही मोठी तेजी हे एक चांगलं लक्षण आहे. यासोबतच भारतात 'आधार'द्वारे होणारे व्यवहारही वाढले आहेत. केवळ फेब्रुवारी महिन्यात 'आधार'च्या माध्यमातून २२६.२९ कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. जानेवारीच्या तुलनेत १३ टक्के अधिक आहे. जानेवारीमध्ये त्याची संख्या १९९.६२ कोटी होती.

आधार अनेक गोष्टींमध्ये उपयुक्तआधार कार्डच्या वापराबद्दल बोलायचं झालं तर घर खरेदी करण्यापासून ते बँक खाते उघडण्यापर्यंत आणि सिम कार्ड मिळवण्यापर्यंत त्याचा उपयोग होतो. तसेच, तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यातही तुम्हाला आधार कार्ड आवश्यक आहे. अशा परिस्थितीत आधार कार्ड मोबाईल नंबर आणि पॅन कार्डशी लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड