शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आधारचा गैरवापर कराल, तर खबरदार! तब्बल १ कोटीचा दंड भरावा लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 14:53 IST

यूआयडीएआय मिळाले महत्त्वाचे अधिकार; आधारच्या गैरवापराला चाप बसणार

नवी दिल्ली: आधार नियमांचं पालन न करणाऱ्यांविरोधात आता कठोर कारवाई होणार आहे. आधार कार्डचा गैरवापर केल्यास १ कोटी रुपयांचा दंड भरावा लागेल. तसा अधिकार भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाला (यूआयडीएआय) देण्यात आला आहे. कायद्याला मंजुरी मिळाल्यानंतर दोन वर्षांनंतर याबद्दलची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 

यूआयडीएआय आधारच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करू शकतं. याशिवाय दोषींना १ कोटीपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो. सरकारनं २ नोव्हेंबरला याबद्दलची अधिसूचना काढली आहे. या प्रकरणी यूआयडीएआयनं नियुक्त केलेले अधिकारी निर्णय घेतील. 

केंद्र सरकारनं आधार आणि अन्य कायदा (सुधारणा) अधिनियम २०१९ मध्ये आणला. यूआयडीएआयला कारवाईचे अधिकार मिळावेत हा त्यामागचा उद्देश होता. सध्याच्या घडीला असलेल्या अधिनियमच्या अंतर्गत यूआयडीएआयला आधार कार्डचा गैरवापर करणाऱ्या संस्थाविरोधात कारवाई करण्याचे अधिकार नाहीत. 

यूआयडीएआयला कारवाईचे अधिकार देणारी अधिसूचना २ नोव्हेंबरला काढण्यात आली. या प्रकरणातील तक्रारींवर घेणारा अधिकारी केंद्र सरकारमध्ये संयुक्त सचिव पद किंवा त्याहून वरच्या पदावर कार्यरत असलेला असेल. त्याच्याकडे १० वर्षे किंवा त्याहून अधिकचा अनुभव असेल. त्याच्याकडे कायदा किंवा कोणत्याही प्रशासकीय किंवा तांत्रिक बाबींची माहिती असेल.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड