शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

पंतप्रधान मोदींकडून उद्धव ठाकरेंना कोणतेही निमंत्रण मिळालेले नाही- संजय राऊत

By admin | Updated: March 26, 2017 20:40 IST

पंतप्रधान मोदींनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना 29 मार्च रोजीच्या एनडीए बैठकीच्या स्नेहभोजनाचे निमंत्रण पाठवले

सुरेश भटेवरा/ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 26 - सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेतील तणाव दूर करण्यासाठी अखेरचा प्रयत्न म्हणून पंतप्रधान मोदींनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना 29 मार्च रोजीच्या एनडीए बैठकीच्या स्नेहभोजनाचे निमंत्रण पाठवले, अशी चर्चा राजधानी दिल्लीत सुरू आहे. तथापि असे कोणतेही निमंत्रण अधिकृतरीत्या शिवसेना प्रमुखांना प्राप्त झालेले नाही अथवा पंतप्रधानांनी उद्धव ठाकरेंना तसा फोनही केलेला नाही, असा खुलासा निसंदिग्ध शब्दात शिवसेनेचे राज्यसभेतील प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी लोकमतशी बोलताना केला.संभाव्य निमंत्रणाबाबत मिश्कील शैलीत बोलताना संजय राऊत म्हणाले, तूर्त तरी केवळ चर्चेत असलेले हे निमंत्रण राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा पाठिंबा मागण्यासाठी असेल तर ही चर्चा आणि स्नेहभोजन मातोश्रीवरच होईल. याचे कारण यापूर्वीच्या दोन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या पाठिंब्याची सारी चर्चा मातोश्रीवरच झाली होती. तथापि शिवसेनाच काय तर एनडीएच्या कोणत्याही घटक पक्षाच्या नेत्याला आजवर माझ्या माहितीनुसार पंतप्रधानांकडून असे निमंत्रण प्राप्त झालेले नाही. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर देखील भाजप आणि शिवसेना या सत्ताधारी आघाडीतील दोन प्रमुख पक्षांमधले ताणतणाव अद्याप दूर झालेले नाहीत. प्रचारसभांमध्ये उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर थेट हल्ला चढवल्यामुळे भाजपामध्ये कमालीची नाराजी आहे. शिवसेनेच्या कडवट हल्ल्यांमुळे भाजपा वैतागला असून राज्यात लवकरात लवकर उभय पक्षांची युती संपावी, अशी काही नेत्यांची मनोमन इच्छा आहे, असे समजले. तथापि याबाबत कोणतीही प्रतिक्रिया जाहीरपणे व्यक्त न करता अतिशय सावध पवित्रा भाजप नेत्यांनी स्वीकारला आहे. मुंबईत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी गुरुवारी भाजपाच्या प्रमुख नेत्यांची नुकतीच एक बैठक झाली. बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, कॅबिनेट मंत्री विनोद तावडे, पंकजा मुंडे आदी उपस्थित होते. बैठकीने राज्य सरकारवर शिवसेनेद्वारे सातत्याने सुरू असलेल्या शरसंधानाची गंभीर दखल घेतली व अन्य पर्यायांवरही चर्चा केल्याचे समजले. तथापि शिवसेनेशी असलेल्या युतीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी, २९ मार्चच्या प्रस्तावित स्नेहभोजनासाठी पंतप्रधान मोदींचे उद्धव ठाकरेंना येऊ घातलेले निमंत्रण, हा उभय पक्षात सामंजस्य प्रस्थापित करण्यासाठी भाजपतर्फे एक महत्त्वाचा की (अखेरचा) प्रयत्न असावा, असे बोलले जाते. महाराष्ट्र विधानसभेत २८८ सदस्यांच्या सभागृहात भाजपाचे १२२ सदस्य आहेत. बहुमतासाठी भाजपाला २३ मतांची कमतरता आहे. छोटे पक्ष आणि अपक्ष मिळून एकूण २0 सदस्य आहेत. यापैकी १३ सदस्यांचा पाठिंबा भाजपाला आहे. याचा अर्थ आणखी फक्त १0 आमदारांच्या पाठिंब्याची भाजपाला आवश्यकता आहे. युती तोडून शिवसेनेच्या ६३ आमदारांच्या पाठिंब्याला तिलांजली देण्यापूर्वी राज्यात अन्य कोणते पर्याय भाजपाकडे उपलब्ध आहेत, याची चाचपणी सुरू असतानाच, पंतप्रधान मोदी ठाकरेंना खास निमंत्रण पाठवणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने हा घटनाक्रम अधिकच लक्षवेधी बनला आहे.