शहरं
Join us  
Trending Stories
1
महाडमध्ये शिंदेसेना अन् राष्ट्रवादीत तुफान राडा; वाहनांची तोडफोड, तटकरे-गोगावले संघर्ष पेटला
2
आंचलच्या वडिलांनी आणि भावांनी सक्षमचा विश्वास जिंकण्यासाठी कट रचला, हत्येपूर्वी सोबत नाचले; व्हिडीओ होतोय व्हायरल
3
भगुर नगरपरिषद निवडणुकीत मोठा गोंधळ! शिवसेनेच्या उमेदवाराचे नावच मतदार यादीत सापडेना, डोके पकडायची वेळ...
4
8th Pay Commission: जानेवारीपासून बँक खात्यात येणार का वाढलेली सॅलरी? ८ व्या वेतन आयोगाशी निगडीत कनफ्युजन करा दूर
5
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ठेवणे बंधनकारक! विरोधकांचा पाळत ठेवत असल्याचा आरोप, मंत्री ज्योतिरादित्य शिंदें म्हणाले...
6
नोकिया बनवायची 'टॉयलेट पेपर', तर कोलगेट मेणबत्त्या; सॅमसंगचं काय? 'या' कंपन्यांचा मूळ व्यवसाय माहिती नसेल
7
काळा पैशाविरोधातील लढाई ठरली अपयशी, केंद्र सरकारने लोकसभेत काय दिली आकडेवारी?
8
Abhishek Sharma: पुन्हा 'द अभिषेक शर्मा शो!' बडोद्याविरुद्ध फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक
9
'डिमेंशिया'चा धोका टाळायचा? मग व्यायाम सुरू करा, मेंदूसाठीही व्यायाम ठरतोय महत्त्वाचा
10
'किमान पुढच्या वेळी तरी...'; निकालाची तारीख पुढे ढकलल्याने CM फडणवीसांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
11
प्रसूतीची तारीख, पण 'तिचं' मतदानाला प्राधान्य! लोकशाहीसाठी चाळीसगावच्या लेकीचं खास पाऊल
12
असंवेदनशील! आजी ICU मध्ये, कर्मचारी ढसाढसा रडला; मीटिंग मिस होताच कंपनीने पगार कापला
13
तिच्या अंगावर पांढरे डाग आहेत, म्हणत पतीने मागितला घटस्फोट; पत्नी कोर्टातच म्हणाली टॅटू दाखव! पुढे जे झालं..
14
Municipal Election Result 2025 Date: राज्यातील सर्व नगरपरिषदांची मतमोजणी एकत्रच होणार; आता २१ डिसेंबरला निकाल लागणार
15
SMAT 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचं आणखी एक विक्रमी शतक! महाराष्ट्र संघाविरुद्ध तळपली बॅट
16
पहिल्या दिवशीच जोरदार आपटला; शेअर बाजारात उतरताच 'धडाम'; १२१ रुपयांचा शेअर आला ७३ वर
17
HCL Tech-एअरटेलसह 'या' ५ कंपन्या देणार मोठा परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइस
18
"सॉरी पप्पा, 'त्या' मुलीनं माझ्या भावनांचा खेळ केला..."; २६ वर्षीय युवकानं केला आयुष्याचा शेवट
19
जग हादरलं! भीषण पाणी टंचाईमुळे 'या' देशाची राजधानी रिकामी करावी लागणार? दीड कोटी जनतेवर होणार परिणाम!
20
आमदार संतोष बांगरांनी नियम बसवले धाब्यावर; महिलेला बटन दाबण्यास सांगितले, मोबाईल घेऊन केंद्रात गेले
Daily Top 2Weekly Top 5

तडजोड केली म्हणजे शेपूट घातले नाही- उद्धव ठाकरे

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

मुंबई-माझा महाराष्ट्र अस्थिर होऊ नये याकरिता सत्तेत सहभागी होण्याची तडजोड स्वीकारली म्हणजे शिवसेनेने शेपूट घातलेली नाही. आम्ही सरकारजमा झालेलो नाही. राज्यातील हे भाजपाचे सरकार जनतेशी अन्यायाने वागत असेल तर त्या सरकारवर पहिला वार शिवसेनाच करील, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिला. देशातील भाजपा सरकारला संपूर्ण बहुमत असतानाही काश्मीरबाबतचे ३७० वे कलम रद्द का होत नाही आणि समान नागरी कायद्याची अंमलबजावणी का केली जात नाही, असा सवाल करीत ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य केले.

मुंबई-माझा महाराष्ट्र अस्थिर होऊ नये याकरिता सत्तेत सहभागी होण्याची तडजोड स्वीकारली म्हणजे शिवसेनेने शेपूट घातलेली नाही. आम्ही सरकारजमा झालेलो नाही. राज्यातील हे भाजपाचे सरकार जनतेशी अन्यायाने वागत असेल तर त्या सरकारवर पहिला वार शिवसेनाच करील, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिला. देशातील भाजपा सरकारला संपूर्ण बहुमत असतानाही काश्मीरबाबतचे ३७० वे कलम रद्द का होत नाही आणि समान नागरी कायद्याची अंमलबजावणी का केली जात नाही, असा सवाल करीत ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य केले.
शिवसेनाप्रमुख यांच्या जयंतीनिमित्त माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित केलेल्या मेळाव्यात ठाकरे बोलत होते. त्यानंतर दादर शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकापाशी बसवलेल्या प्रेरणा ज्योतीचे प्रज्वलन ठाकरे यांनी केले. ठाकरे म्हणाले की, आता आपण कुणाच्या मेहरबानीवर नाही. कुठल्याही लाटेवर तरंगणारे ओंडके नाही. हिंदूंना दहा बालकांना जन्म देण्याचा उपदेश करणार्‍या भाजपा नेत्यांना या मुलांना पोसणार कोण, असा सवाल करून ते म्हणाले की, केवळ मते टाकायला मेंढरांची पैदास नको. दुनिया हलवणारा एकच मुलगा पुरेसा आहे. घरवापसीचे आंदोलन करणार्‍या संघ परिवाराच्या नेत्यांना ठाकरे यांनी खडे बोल सुनावले. काश्मीरमधील पंडितांची घरवापसी का झाली नाही? वाजपेयी सरकारची परिस्थिती वेगळी होती. मात्र आता बहुमताचे सरकार असताना ३७०वे कलम, समान नागरी कायदा याबाबत भूमिका का घेतली जात नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न का दिले नाही, असा सवाल त्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)
.......................................
बाळासाहेबांच्या स्मारकाकरिता उंबरठे झिजवणार नाही
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक म्हणजे त्यांचा केवळ पुतळा नव्हे. माझ्या कल्पनेतील स्मारक उभे करण्याकरिता मी कुणाचे उंबरठे झिजवणार नाही किंवा वाडगा घेऊन फिरणार नाही. दिमाखाने व शानदारपणे स्मारक उभे राहणार असेल तर होऊ द्या, असे उदगार ठाकरे यांनी काढले.
...........................................
संजय दत्तचे फर्लो की फिरलो आणि परत गेलो
एकेकाळी शिवसेनाप्रमुखांनी अभिनेता संजय दत्तची पाठराखण केली होती. त्याच दत्तला भाजपा सत्तेत मिळत असलेला हा फर्लो आहे की फिरलो आणि परत आत गेलो आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली. देशद्रोहाचा खटला असलेला आत-बाहेर कसा, असे ते म्हणाले.