शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

सासरी जातानाच नववधूचं फिल्मी स्टाइल अपहरण, उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 11:59 IST

राजस्थानमधल्या उदयपूरमध्ये पाठवणी केल्यानंतर सासरी परतणाऱ्या नववधूचं फिल्मी स्टाइल अज्ञात लोकांनी अपहरण केलं आहे.

जयपूर- राजस्थानमधल्या उदयपूरमध्ये पाठवणी केल्यानंतर सासरी परतणाऱ्या नववधूचं फिल्मी स्टाइल अज्ञात लोकांनी अपहरण केलं आहे. नववधूला पळवताना त्या अज्ञातांनी नवरदेवाला मारहाणही केली आहे. या घटनेनंतर लग्न झालेल्या कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री तितरडी भागात एक लग्न समारंभ होता. लग्न लागल्यानंतर नववधूची पाठवणी करण्यात आली. नववधू नवरदेवाबरोबर चिंतामणच्या घाटीवर पोहोचली, त्याचदरम्यान सविना रेल्वे फाटकाजवळ त्यांच्या कारला थांबवलं. त्या अज्ञातांनी त्यांच्या गाडीची तोडफोड केली आणि नवरदेवाला मारहाण केली. त्यानंतर नववधूला स्वतःबरोबर ते अपहरणकर्ते घेऊन गेले. हा प्रकार समजल्यानंतर त्या नवरदेवाचं कुटुंब घटनास्थळी दाखल झालं आहे.

तसेच पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचत तपासकार्य सुरू केलं आहे. त्या गुंडांना पकडण्यासाठी सरकारनं पूर्ण परिसरात नाकाबंदी केली आहे. जखमी नवरदेवाला जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी एका संशयित तरुणाला ताब्यात घेतलं असून, पोलीस तपास करत आहेत.