शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

टेढ़ा है पर मेरा है! एकाच नवऱ्यासाठी दोन बायका भिडल्या; प्रकरण पोहोचलं कोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 16:00 IST

एका विवाहित पुरुषाने त्याची पहिली पत्नी जिवंत असताना त्याच्या प्रेयसीशी लग्न केलं, ज्यामुळे मोठा गोंधळ उडाला.

बिहारमधील सहरसा येथे एका विवाहित पुरुषाने त्याची पहिली पत्नी जिवंत असताना त्याच्या प्रेयसीशी लग्न केलं, ज्यामुळे मोठा गोंधळ उडाला. दोन्ही पत्नींनी पोलिस ठाण्यात धाव घेत एकमेकींशी जोरदार भांडण केलं. हे प्रकरण पुढे हाणामारीपर्यंत पोहोचलं. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी मध्यस्थी केली. यानंतर प्रेयसीचा जबाब न्यायालयात नोंदवण्यात आला.

पातरघाट पोलीस स्टेशन परिसरातील भद्दी येथील रहिवासी निरंजन कुमार सिंह यांनी त्यांची मुलगी छवी प्रियाच्या बेपत्ता होण्याबाबत सदर पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. पोलिसांना सांगितलं की, त्याची मुलगी छवी प्रिया तिच्या बहिणीसोबत १० जानेवारी रोजी एमएलटी कॉलेजचा फॉर्म भरण्यासाठी आली होती. पण तिला दुसऱ्या दिवशी कॉलेजला येण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर तिने बहिणीला घरी पाठवलं आणि फोनही बंद केला. 

पोलिसांनी मुलीचा शोध घेतला तेव्हा नवहट्टा पोलीस स्टेशन परिसरातील मोहनपूर येथील रहिवासी सोनू झा याच्यासोबत तिचं लग्न झाल्याचं समोर आलं. यानंतर सोनू आधीच विवाहित असल्याचं समोर आलं. सोनूची पहिली पत्नी कल्पना हिला हे कळताच तिने सोमवारी सदर पोलीस स्टेशन गाठलं. गोंधळ घालायला सुरुवात केली.

कल्पनाने सांगितलं की, तिचं २०२१ मध्ये लग्न झालं आहे. सोनूचे वडील सुपौलमधील कोसी प्रकल्पात काम करतात. तिला चार वर्षांचा मुलगा देखील आहे. तिचा नवरा तिला अनेकदा मारहाण करायचा. या संदर्भात तिने अनेकदा तक्रार केली होती. पण प्रत्येकवेळी तिची त्यांच्यात समेट घडवून आणला जात होता.

स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की, तरुण आणि तरुणी फेसबुकवर प्रेमात पडले. यानंतर दोघांनी लग्न केलं. या संपूर्ण प्रकरणात पोलीस स्टेशनचे प्रमुख सुबोध कुमार म्हणाले की, न्यायालयात जबाब दिल्यानंतर मुलीने सांगितलं की तिला तिच्या प्रियकरासोबतच राहायचं आहे.