शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

क्रिकेट सामन्यामुळे झाली दोन ट्रेनमध्ये टक्कर, त्या रेल्वे अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर, रेल्वेमंत्री म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 08:47 IST

Indian Railway Accident: आंध्र प्रदेशमधील विजयनगर जिल्ह्यातील कंटाकापल्ली येथे गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात दोन ट्रेनमध्ये टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आंध्र प्रदेशमधील विजयनगर जिल्ह्यातील कंटाकापल्ली येथे गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात दोन ट्रेनमध्ये टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यांनी शनिवारी सांगितले की, या रेल्वे गाड्यांची जेव्हा टक्कर झाली, त्यावेळी एका ट्रेनमधील लोको पायलट आणि सहाय्यक लोको पायलट मोबाईलवर क्रिकेट सामना पाहत होते. अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे अपघातांमागील कारणं अधोरेखित करताना ही माहिती दिली. 

२९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजता हावडा-चेन्नई मार्गावर रायगडा ट्रेनने विशाखापट्टणम-पलासा ट्रेनला मागून धडक दिली होती. या अपघातामध्ये १४ जणांचा मृत्यू झाला होता. तर ५० हून अधिक प्रवासी जखमी झाले होते. 

रेल्वेमंत्र्यांनी नव्या सुरक्षा उपायांबाबत माहिती देताना आंध्र प्रदेशमधील या रेल्वे अपघाताचा उल्लेख केला. तसेच असे अपघात टाळण्यासाठी भारतीय रेल्वेकडून सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. अश्विनी वैष्णव म्हणाले की, आंध्र प्रदेशमध्ये लोको पायलट आणि सह लोको पायलट यांचं लक्ष क्रिकेट सामन्यामुळे विचलित झाल्याने हा अपघात घडला होता. आता आम्ही अशी व्यवस्था निर्माण करत आहोत, जी अशा परिस्थितीची त्वरित माहिती घेईल. त्यामुळे पायलट आणि सहाय्यक पायलट यांचं संपूर्ण लक्ष ट्रेन चालवण्यावर एकाग्र राहील. ते पुढे म्हणाले की, आम्ही सुरक्षेवर आपलं लक्ष केंद्रित करणं कायम ठेवणार आहोत. आम्ही प्रत्येक घटनेचं मूळ कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तसेच त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून त्यावर तोडगा काढतो.

रेल्वे सुरक्षा आयुक्तांचा तपास अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. मात्र या घटनेच्या एका दिवसानंतर प्राथमिक रेल्वे तपासामधून या अपघातासाठी रायगडा ट्रेनचा लोको पायलट आणि सहाय्यक लोको पायलट जबाबदार असल्याचे समोर आले. त्यांनी खराब स्वचलित सिग्नल प्रणालीसाठी निश्चित करण्यात आलेल्या नियमांचं उल्लंघन केलं. या अपघातामध्ये चालक दलाचा दोन्ही सदस्यांचा मृत्यू झाला होता.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघातAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव