शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
3
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
4
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
5
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
6
गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!
7
एक राजयोग, चौपट लाभ: ६ राशींची इच्छापूर्ती, सरकारी कामात यश; व्यापारात नफा, प्रमोशन शक्य!
8
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
9
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
10
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
11
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
12
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
13
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
14
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
15
कार्तिक आर्यनसोबत हेमांगी कवी शेअर करणार स्क्रीन; 'चंदू चॅम्पियन'मध्ये साकारतेय महत्त्वाची भूमिका
16
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
17
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
18
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
19
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
20
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?

राजीनामा सत्र सुरूच; आमदार दीपक हलदर यांची तृणमूलला सोडचिठ्ठी, भाजप प्रवेशाची शक्यता

By देवेश फडके | Published: February 01, 2021 10:59 PM

तृणमूल काँग्रेसमधील नेते, आमदार यांचे राजीनामा सत्र सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी माजी वनमंत्री राजीव बॅनर्जी यांच्यासह काही बंडखोर नेत्यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केल्यानंतर आता आणखी एका आमदाराने राजीनामा दिला आहे. 

ठळक मुद्देदोनवेळा आमदार असलेल्या दीपक हलदर यांचा पक्षाला रामरामदीपक हलदर यांचा राजीनामा हा ममता बॅनर्जीसाठी मोठा धक्का लवकरच भाजप प्रवेशाची शक्यता

कोलकाता :पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आणखी तापत चालले आहे. तृणमूल काँग्रेसमधील नेते, आमदार यांचे राजीनामा सत्र सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी माजी वनमंत्री राजीव बॅनर्जी यांच्यासह काही बंडखोर नेत्यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केल्यानंतर आता आणखी एका आमदाराने राजीनामा दिला आहे. 

आमदार दीपक हलदर यांनी तृणमूल काँग्रेसला दिलेली सोडचिठ्ठी हा ममता बॅनर्जी यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. कारण दीपक हलदर हे डायमंड हार्बर या मतदारसंघातून सलग दोनवेळा निवडून आले आहेत. तृणमूल काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत असल्याचे दीपक हलदर यांनी सोमवारी जाहीर केले. 

दीपक हलदर यांचे म्हणणे काय?

तृणमूल काँग्रेसचा राजीनामा देताना दीपक हलदर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, मी दोनवेळा आमदार म्हणून निवडून आलो आहे. मात्र, सन २०१७ पासून सर्वांसोबत काम करण्यापासून मला परावृत्त केले जात होते. माझ्या कोणत्याही गोष्टीला मान्यता, परवानगी दिली जात नव्हती. पक्षनेतृत्वाला याची वेळोवेळी कल्पना देऊनही दखल घेतली नाही. अथवा कोणतीच कारवाई केली गेली नाही. पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमाची मला दिली जात नव्हती. विधानसभा मतदारसंघातील जनता आणि समर्थकांना उत्तरे देण्यास मी बांधील आहे. म्हणूनच तृणमूल काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे, असे दीपक हलदर यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांचा एल्गार! संपूर्ण देशभरात ०६ फेब्रुवारीला करणार रास्ता रोको

भाजप नेते सोवन चॅटर्जी संपर्कात

गेल्या काही दिवसांपासून दीपक हलदर पक्षनेतृत्वाविरोधात जाहीरपणे वक्तव्ये करत होते, असे सांगितले जात आहे. भाजप नेते सोवन चॅटर्जी यांच्याशी संपर्कात असून, दक्षिण कोलकाता येथील त्यांच्या निवासस्थानी भेटही दिली होती. सन २०१५ मध्ये मारहाणीच्या आरोपामुळे दीपक हलदर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र, जामीन मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला, अशी माहिती मिळाली आहे. 

आम्हाला केंद्रात, राज्यात भाजपचे सरकार हवे

पश्चिम बंगालमध्ये आम्हाला डबल इंजिन असलेले सरकार हवे आहे. सोनार बांगलासाठी केंद्रात आणि राज्यात म्हणजेच पश्चिम बंगालमध्ये भाजपचेच सरकार असणे गरजेचे आहे, असे भाजप नेते राजीव बॅनर्जी यांनी सांगितले. हावडा रॅलीत सुवेंदू अधिकारी यांनीही सहभागी होत तृणमूल काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. 

टॅग्स :Politicsराजकारणtmcठाणे महापालिकाwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जी