शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

नक्षलवाद्यांशी चकमकीत दोन जवान शहीद  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 04:48 IST

झारखंडची राजधानी रांचीजवळच्या हेसापीडी जंगलात शुक्रवारी पहाटे चार वाजता एसटीएफच्या जवानांची नक्षलवाद्यांशी चकमक झाली.

- एस. पी. सिन्हारांची : झारखंडची राजधानी रांचीजवळच्या हेसापीडी जंगलात शुक्रवारी पहाटे चार वाजता एसटीएफच्या जवानांची नक्षलवाद्यांशी चकमक झाली. यात एसटीएफचे दोन जवान शहीद झाले, तर अन्य काही जवानांना गोळी लागल्याने ते जखमी झाले आहेत. विशेष पोलीस अधीक्षक अनीश गुप्ता, डीआयजी ए.व्ही. होमकरसह अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि सर्च आॅपरेशन सुरू आहे.असे सांगण्यात येत आहे की, एका जवानाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या जवानाचा रांचीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला.मुख्यमंत्री रघुवर दास यांनी जवानांच्या धाडसाचे कौतुक करताना म्हटले आहे की, नक्षली आपल्या अस्तित्वाची अखेरची लढाई लढत आहेत. त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल. दशम फॉल भागात नक्षली झोनल कमांडर महाराज प्रामाणिक असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुरुवारी सायंकाळी सर्च आॅपरेशन सुरू करण्यात आले. स्थानिक रहिवाशांनी सूचना देऊनही खूपच कमी संख्येने जवानांना पाठविण्यात आले.या घटनेनंतर पोलीस महासंचालक कमलनयन चौबे हे मुख्यमंत्री रघुवर दास यांना भेटले. शहीद जवानांचे पार्थिव झारखंडच्या जगुआर मुख्यालयाकडे रवाना करण्यात आले.एसटीएफच्या शहीद जवानांची नावे खंजन कुमार महतो आणि अखिलेश राम अशी आहेत. अखिलेश राम हे पलामू जिल्ह्याच्या लेस्लीगंजचे रहिवासी होते. खंजन कुमार महतो हे रांची जिल्ह्याच्या सोनाहातू पोलीस ठाण्यांतर्गतच्या चैनपूरचे रहिवासी होते. हे जवान झारखंडमध्ये तैनात होते. अखिलेश राम यांना तीन गोळ्या लागल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीIndian Armyभारतीय जवान