शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेतील अँग्लो-इंडियन्सच्या २ राखीव जागा रद्द होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 02:53 IST

राज्यसभेत आज विधेयक येणार; ७० वर्षांपासून राष्ट्रपती करीत होते नियुक्त्या

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना आणखी दहा वर्षांसाठी राखीव जागा वाढवून देण्याबाबतचे विधेयक गुरुवारी राज्यसभेत मांडले जाईल, तेव्हा त्याकडे सर्वांचे लक्ष असेल. या समाज घटकांना राखीव जागांचा लाभ वाढवून देण्यावरून राजकीय पक्षांमध्ये मतभेद आहेत म्हणून या विधेयकाकडे लक्ष असेल, असे नाही. कारण लोकसभेत ते मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या चर्चेनंतर एकमताने संमत झाले आहे. तरीही याच विधेयकात एक मुद्दा आहे.

लोकसभेत अँग्लो-इंडियन समाजासाठी असलेल्या दोन जागा रद्द करण्याचा मोदी सरकारचा हेतू आहे. देशाने १९५२ मध्ये घटना स्वीकारल्यापासून कलम ३३४ (बी) अंतर्गत अँग्लो इंडियन समाजाचे दोन सदस्य लोकसभेवर नाम नियुक्त केले जात आहेत. या समाजाला ७० वर्षांनंतर या राखीव जागांची गरज नाही याची जाणीव सरकारला झाल्यामुळे अनेक दशकांपूर्वीची ही तरतूद रद्द करण्यात आली आहे.

अँग्लो-इंडियन समाजाच्या सदस्यांसाठीच्या राखीव जागा या तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत. या विषयावर गरज भासल्यास नंतर फेरविचार केला जाईल. नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कारकिर्दीत लोकसभेवर अँग्लो-इंडियन समाजाचे दोन सदस्य नियुक्त केले गेले होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, समाजकल्याण मंत्री थावरचंद गहलोत यांचा समावेश असलेल्या समितीने या दोन नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

संसदेमध्ये अनुसूचित जातीचे ८४ आणि अनुसूचित जमातीचे ४७ सदस्य आहेत. राखीव जागांचा लाभ त्यांना पुढेही मिळत राहील. या निर्णयामुळे राज्यसभेत ते विधेयक संमत झाले तर लोकसभेतील संख्याबळ सध्याच्या ५४५ वरून ५४३ होईल.भारताचे राष्ट्रपती अँग्लो-इंडियन समाजाचे दोन सदस्य नियुक्त करीत होते. लोकसभेवर ५४३ सदस्य निवडून गेल्यानंतर त्याचे संख्याबळ ५४५ व्हायचे.

टॅग्स :lok sabhaलोकसभाAmit Shahअमित शहाVenkaiah Naiduव्यंकय्या नायडू