शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

कर्नाटकात आणखी दोन जणांच्या राजीनाम्यांमुळे सरकार ‘गॅस’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 06:56 IST

सत्तासंघर्ष चिघळला : काँग्रेस-भाजप उतरले रस्त्यावर, संसदेतही पडसाद

बंगळुरू/मुंबई : एका मंत्र्यासह आणखी दोघांनी आमदारकीचे राजीनामे दिल्याने कर्नाटकमधील जद (एस)-काँग्रेस आघाडीचे डळमळीत झालेले सरकार बुधवारी ‘गॅस’वरच गेले.

कर्नाटकवरून काँग्रेस व विरोधी पक्षांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातल्याने संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामही तहकूब करावे लागले. दिलेले राजीनामे विधानसभाध्यक्षांनी मंजूर करावेत, यासाठी १२ बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली असून, त्यावर उद्या सुनावणी होणार आहे.गृहनिर्माणमंत्री एम.बी.टी. नागराज व आमदार के. सुधाकर यांनी आज विधानसभाध्यक्षांकडे राजीनामे दिल्याने, सत्ताधारी आघाडीतून बाहेर पडलेल्या आमदारांची संख्या १६ झाली. हे सर्व राजीनामे स्वीकारले गेले, तर कुमारस्वामी सरकार स्पष्टपणे अल्पमतात येईल. राजीनामे मंजूर करण्यात विधानसभाध्यक्ष मुद्दाम टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत, भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल वजुभाई गाला यांची भेट घेतली व मुख्यमंत्र्यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, अशी विनंती केली. नागराज व सुधाकर राजीनामे देण्यासाठी विधानभवनात आले तेव्हा काँग्रेस व भाजप नेत्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.हे राजीनामा सत्र सुरु असताना दुसरीकडे काँग्रेस व भाजप आमने-सामने रस्त्यावर उतरले. दिल्लीहून आलेल्या गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खारगे व के. सी. वेणुगोपाळ यांच्यासह सिद्धरामय्या व जी. परमेश्वर यांच्यासह काँग्रेसने राजभवनापर्यंत मोर्चा काढून धरणे धरले. त्यांना तिथे ताब्यात घेण्यात आले. 

मुंबईत आलेल्या मंत्र्याला परत बंगळुरूला पाठवलेआधी राजीनामे दिलेल्या १२ आमदारांचे मन वळविण्यासाठी काँग्रेसचे मंत्री डी. के. शिवकुमार सकाळी मुंबईत पोहोचले, परंतु पोलिसांनी त्यांना आमदार थांबलेल्या हॉटेलात जाण्याआधी ताब्यात घेतले.या परिसरात भर पावसात निदर्शनांसाठी बसलेले मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा व नसीम खान यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. शिवकुमार यांना पोलिसांनी विमानाने बंगळुरूला पाठविले. - संबंधित वृत्त/९

१२ बंडखोरांची सुप्रीम कोर्टात धावमुंबईत आलेल्या १२ बंडखोरांनी राजीनामे मंजूर करून घेण्यासाठी बंगळुरूला जाणे भाग पडेल, हे ओळखून ते टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेचा अ‍ॅड. मुकुल रोहटगी यांनी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठापुढेउल्लेख केला व लगेच सुनावणी घेण्याची विनंती केली. त्यानुसार, गुरुवारी सुनावणी घेण्याचे खंडपीठाने मान्य केले.विधानसभाध्यक्ष आमचे राजीनामे मंजूर करण्यास नियमबाह्य पद्धतीने टाळाटाळ करत असल्याने त्यांना ते मंजूर करण्याचा आदेश द्यावा, असे त्यांचे म्हणणे आहे. आम्ही स्वखुशीने राजीनामे दिले असल्याने, पक्षांतरबंदी कायद्याच्या उल्लंघनाचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे राजीनाम्यांना काटशह देण्यासाठी आम्हाला अपात्र घोषित करण्यासाठी काँग्रेसने केलेला अर्ज निरर्थक असल्याने विधानसभाध्यक्षांना त्यावर सुनावणी घेण्यास मनाई करावी, अशी मागणी आमदारांनी केली आहे.

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारण