शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

कर्नाटकातील शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी, कुमारस्वामींची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 05:48 IST

कर्नाटकात सरकार स्थापन करताच शेतक-यांच्या कर्जमाफीचे दिलेले आश्वासन मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी पूर्ण केले आहे. विधानसभेत गुरुवारी २0१८-१९ चा राज्याचा अर्थसंकल्प मांडताना मुख्यमंत्र्यांनी शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी ३४ हजार कोटी रुपयांची तरतूदही करीत असल्याचे जाहीर केले.

बंगळुरू : कर्नाटकात सरकार स्थापन करताच शेतक-यांच्या कर्जमाफीचे दिलेले आश्वासन मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी पूर्ण केले आहे. विधानसभेत गुरुवारी २0१८-१९ चा राज्याचा अर्थसंकल्प मांडताना मुख्यमंत्र्यांनी शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी ३४ हजार कोटी रुपयांची तरतूदही करीत असल्याचे जाहीर केले. मात्र त्यांनी इंधन, वीज व मद्य यावरील करात वाढ केली आहे.या निर्णयानुसार शेतक-यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात शेतक-यांचे २0१७ पर्यंतचे कर्ज माफ करण्यात येत असल्याचे एच.डी. कुमारस्वामी यांनी घोषित केले. ज्या शेतक-यांनी घेतलेले सारे कर्ज फेडले आहे, त्यांना २५ हजार रुपये प्रोत्साहन म्हणून दिले जाणार आहेत. तसेच सर्व शेतक-यांना कर्ज माफ झाल्याचे दाखले लगेच दिले जातील. त्यामुळे त्यांचा नवे कर्ज घेण्याचा मार्ग खुला होईल, असे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले. अर्थसंकल्प मांडण्याआधीच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज सकाळी टिष्ट्वट करून, शेतकºयांना तसेच सर्वसामान्यांना काँग्रेसने दिलेल्या आश्वासनांचे प्रतिबिंब अर्थसंकल्पात उमटेल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.राज्यातील इंदिरा कँटीनला मिळणारा प्रतिसाद पाहून सर्व जिल्हा आणि तालुक्यांत २४७ कँटीन उघडण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. या कँटीनसाठी २११ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. तसेच आधीच्या सिद्धरामय्या सरकारने सुरू केलेल्या सर्व योजना कायम राहतील, असेही कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच कुमारस्वामी यांनी शेतक-यांना कर्जमाफी दिली जाईल, अशी घोषणा केली होती. ती करणे आपणास शक्य न झाल्यास आपण राजकारणातूनच निवृत्त होऊ , असेही ते म्हणाले होते. कर्जमाफीच्या दृष्टीनेच त्यांनी अर्थसंकल्पाची तयारी चालवली होती.मात्र कुमारस्वामी यांनी संपूर्ण वर्षाचा अर्थसंकल्प मांडू नये, असे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे म्हणणे होते. त्यासाठी आपल्या समर्थक आमदारांमार्फत तशी मोहीमही राबवण्यास सुरुवात केली होती.त्यातूनच सत्ताधारी काँग्रेस-जनता दल आघाडीत एकवाक्यता नाही, दोन्ही पक्षांचे काही आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत, अशी चर्चा सुरू झाली होती. याही पुढे जात भाजपाचे नेते येडियुरप्पा यांनी या नाराज आमदारांशी संपर्क साधा, अशा सूचना आपल्या आमदारांना दिल्या होत्या. पण राहुल गांधी आणि कुमारस्वामी यांच्यातील चर्चेनंतर या सर्वच चर्चा थांबल्या. (वृत्तसंस्था)इंधन व दारूच्या दरात दणदणीत दरवाढशेतकºयांना कर्जमाफी देतानाच कुमारस्वामी यांनी पेट्रोल, डिझेल तसेच विजेच्या दरात वाढ करीत असल्याची घोषणा करून सामान्यांना धक्काच दिला. तसेच दारूवरील करातही कर्नाटक सरकारने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलच्या दरात लीटरमागे १.१४ रुपये तर डिझेलच्या दरात १.२० रुपये वाढ होणार आहे. म्हणजे पेट्रोलच्या दरात ३० ते ३२ तर डिझेलच्या दरात १९ ते २० टक्के वाढ होईल.

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामी