शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

भुरट्या चोरांचा उच्छाद, वर्षभरात रेल्वेतून चोरीस गेले दोन लाख टॉवेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 13:11 IST

रेल्वेतून होणारी किरकोळ वस्तूंची चोरी ही रेल्वे प्रशासनासाठी गंभीर समस्या बनली आहे.

मुंबई - रेल्वेतून होणारी किरकोळ वस्तूंची चोरी ही रेल्वे प्रशासनासाठी गंभीर समस्या बनली आहे. गेल्या आर्थिक वर्षात लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून सुमारे एक लाख 95 हजार टॉवेल चोरीस गेली आहेत. इतकेच नाहीतर 81 हजार 736 चादरी,  55 हजार 573 उशांची कव्हरे, 5 हजार 038 उशा आणि 7 हजार 043 पांघरुणांवरही चोरट्यांनी डल्ला मारला आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमधून चोरीस जाणाऱ्या सामानामध्ये 200 टॉयलेट मग, एक हजार टेप आणि 300 हून अधिक फ्लश पाइपचाही समावेश आहे. सोमवारी मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकात रतलामला जाणाऱ्या एका व्यक्तीला 3 पांघरुणे, 6 चादरी आणि तीन उशा चोरल्याच्या आरोपाथाली अटक करण्यात आली होती.दरम्यान, यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर या काळात रेल्वेमधून 79 हजार 350 टॉवेल, 27 हजार 545 चादरी, 21 हजार 50 उशांची कव्हरे 2 हजार 150 उशा आणि 2 हजार 65 पांघरुणे चोरीस गेली आहेत. चोरीस गेलेल्या मालाची एकूण किंमत तब्बल 62 लाख रुपये एवढी आहे.   गेल्या तीन आर्थिक वर्षांमध्ये रेल्वेला सुमारे चार हजार कोटींचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान हे रेल्वेत होणाऱ्या किरकोळ चोऱ्यांमुळे झाले आहे. रेल्वेतून चादरी आणि अन्य वस्तूंच्या चोरीमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई कोच अटेंडेंटला करावी लागते, तर बाथरूममधील सामानाच्या नुकसानीची भरपाई रेल्वे करते. रेल्वेत वापरण्यात येणाऱ्या बेडशीटची किंमत 132 रुपये, टॉवेल 22 रुपये आणि उशीची किंमत 25 रुपये असते. मात्र प्रवाशांना नव्याने उपलब्ध करून दिलेल्या वस्तू पुन्हा रेल्वेकडे येत नाहीत.सेंसर टेप आणि सीसीटीव्हीसारख्या सुविधा उपलब्ध असूनही वस्तू चोरीस जातात. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेThiefचोरcentral railwayमध्य रेल्वेwestern railwayपश्चिम रेल्वे