शहरं
Join us  
Trending Stories
1
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
2
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
3
Post Office ची ही स्कीम करेल मालामाल; दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
4
"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले
5
लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक
6
Asia Cup 2025: संजू सॅमसन पहिला सामना खेळणार की नाही? टीम इंडियाच्या सरावात चित्र स्पष्ट
7
मुंबईत दहशत माजवण्याचे षडयंत्र? अग्नीवीर जवानाला फसवून लोडेड 'इन्सास रायफल'ची चोरी!
8
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
9
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
10
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
11
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
12
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
13
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
14
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
15
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
16
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
17
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
18
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
19
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
20
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार

राज्यात तीन वर्षांत २ लाख कोटींचे रस्ते

By admin | Updated: July 23, 2016 04:17 IST

महाराष्ट्रात येत्या ३ वर्षांत रस्तेबांधणीसाठी केंद्रीय परिवहन मंत्रालयाची २ लाख कोटी रुपये खर्च करण्याची योजना आहे.

सुरेश भटेवरा,

नवी दिल्ली- महाराष्ट्रात येत्या ३ वर्षांत रस्तेबांधणीसाठी केंद्रीय परिवहन मंत्रालयाची २ लाख कोटी रुपये खर्च करण्याची योजना आहे. त्यांसाठी राज्य सरकार जितक्या लवकर भूसंपादनाची करेल, तितक्या वेगाने रस्तेबांधणी केली जाईल, असे आश्वासन केंद्रीय भूतल परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले.नितीन गडकरी व चंद्रकांत पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबंधित अधिकाऱ्यांच्या ताफ्यासह आणि पत्रकारांच्या साक्षीने संवाद साधला. त्यातून राज्यातील रस्त्यांसंबंधी अनेक प्रलंबित विषय चर्चेतून निकाली निघाले.नागपूर ते रत्नागिरी नवा महामार्गनागपूर ते रत्नागिरी व्हाया तुळजापूर या नव्या सिमेंट काँक्रीट महामार्गासाठी परिवहन मंत्रालयाने ८ हजार कोटी मंजूर केले आहेत. हा महामार्ग विदर्भ, मराठवाडा, प.महाराष्ट्र आणि कोकण अशा ४ विभागातून जात असल्याने ९ टप्प्यात त्याची विभागणी करण्यात आली आहे. या महामार्गासाठी कराव्या लागणाऱ्या भूसंपादनासाठी केंद्राने महाराष्ट्राकडे ४ हजार कोटी जमा केले आहेत. मात्र नागपूर ते तुळजापूर टप्प्यांत भूसंपादनच्या काही अडचणी असून, आपण तिथे स्वत: जाणार आहोत आणि त्यासाठी संबंधित जिल्ह्यात ग्रामीण भागात एकास चार तरशहरी भागात एकास दोन याप्रमाणे भूसंपादनाची रक्कम डिसेंबरपूर्वीदिली जाईल, असे वचन चंद्रकांत पाटील यांनी गडकरींना दिले. या महामार्गाची टेंडरप्रक्रिया तूर्त पुढे ढकलावी अशी विनंतीही पाटील यांनी केली.वारी मार्गावर प्रशस्त ४ लेन रस्तापंढरपूर ते देहू आणि पंढरपूर ते आळंदी हा विठ्ठलाच्या वारीचा मार्ग आहे. सुमारे ५00 किलोमीटर्सच्या या ४ लेन रस्त्यासाठी ६ हजार कोटींची योजना तयार आहे. या रस्त्याच्या दोन्ही कडेला महाराष्ट्राने थोडी आणखी जागा संपादन करून दिल्यास वारकऱ्यांना उतरण्यासाठी उत्तम ठिकाणे, प्रशस्त उद्याने, वाहनतळे, भोजनगृहे, इत्यादी सोयी करून देण्याची तयारी असल्याचे गडकरी म्हणाले.नद्यांचे मोफत खोलीकरण महाराष्ट्रातल्या नद्यांना सध्या पूर आलेत. पुराबरोबर जो गाळ वाहून येतो, त्याचे वर्षानुवर्षे ड्रेझिंग होत नाही. परिणामी नदी पात्रे लहान होतात आणि पाणीसाठाही कमी होतो. त्यावर गडकरींनी महाराष्ट्रातल्या नद्यांचे मोफत ड्रेझिंग आम्ही करून देण्यास तयार आहोत. यामुळे नद्यांचे खोलीकरण होईल. पाण्याचा साठा वाढेल व त्यावर जलवाहतुकीसारख्या सोयींची निर्मितीही होईल, असे सांगितले. या कामाच्या बदल्यात खोलीकरणाच्या वेळी पात्रातून निघणारी सारी वाळू परिवहन मंत्रालयाला राज्याने मोफत दिल्यास ती राज्यातील रस्ते बांधणीसाठीच वापरता येईल आणि त्यामुळे बांधकामाची किंमत खाली आणणे शक्य होईल, असे सांगितले. या सूचनेचे स्वागत करीत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ही सूचना आम्हाला मान्य असून, तसा जीआर लवकरच काढण्यात येईल. राष्ट्रीय महामार्गांचे विस्तारीकरणमहाराष्ट्रात ५२00 किलोमीटर्सचे राष्ट्रीय महामार्ग आहेत. तीन वर्षांत राज्यात त्यांची लांबी २२ हजार किलोमीटर्स पर्यंत वाढवण्याचा परिवहन मंत्रालयाचा इरादा आहे. राज्याला पूर्वी अवघी ५0 कोटींची रक्कम सीएसआरच्या रूपात मिळत असे. ती आता ६ हजार कोटींपर्यंत वाढवण्यात आली आहे. भूसंपादन लवकर केल्यास आम्ही रस्तेबांधणी वेगाने करू, असे गडकरी म्हणाले. कोकणात २२ पैकी १९ सागरी पूल आपल्या काळात बांधल्याचे नमूद करीत गडकरींनी उर्वरित ३ पुलांच्या कामांना गती देण्याबाबत सुचवले. त्नद्यांवर जिथे पूल बांधाल, त्या पुलांच्या खाली बंधारे अवश्य बांधल्यास पाणी अडवता येईलअसेही गडकरी म्हणाले. पर्यावरण, वन विभाग यांच्या ना हरकत प्रमाणपत्रांमुळे रस्त्यांचे जे प्रकल्प अडकले आहेत, त्याच्या मंजुऱ्यांची प्रक्रिया लवकर आटोपण्याचा सल्लाही त्यांनी दिला.वाढदिवसाची भेटगडकरींनी वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्र्यांचे अभिष्टचिंतन केले. त्याचबरोबर इंदापूर पनवेल या रखडलेल्या रस्ता प्रकल्पासाठी, स्टेट बँकेने ५६0 कोटींचा निधी मंजूर केल्याचे गडकरींनी फडणवीसांना सांगितले आणि ही वाढदिवसाची खास भेट असल्याचे नमूद केले.>मुंबई ते गोवा सागर तीरावर नवा महामार्गअमेरिका दौऱ्यातील निरीक्षणाचा संदर्भ देत गडकरी यांनी पॅसिफिक महासागराच्या तीरावरून लॉस एंजलिस ते सॅन फॅ्रन्सिस्को मार्गाचा उल्लेख केला. कोकणात विस्तीर्ण किनारा आहे. मुंबई ते गोवा असाच सुंदर महामार्ग आपण तयार केला आणि त्यावर सुंदर ठिकाणे विकसित केली तर पर्यटकांना सागर तीराचा आनंदही घेता येईल.