शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Russia-Ukraine Conflict: युक्रेन-रशिया युद्ध: भारताच्या भूमिकेवरून काँग्रेसमध्ये दोन गट; नेत्यांची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 11:03 IST

Russia-Ukraine Conflict: रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्धावरून भारताच्या भूमिकेवर काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे दिसते.

शीलेश शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्धावरून भारताच्या भूमिकेवर काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे दिसते. मी मांडलेली भूमिका ही अधिकृत असल्याचे पक्षाचे परराष्ट्र व्यवहार शाखेचे अध्यक्ष आनंद शर्मा यांनी म्हटले. रविवारी शर्मा यांनी ज्या रितीने पक्षाची भूमिका मांडली त्यावर खासदार शशी थरूर बरेच नाराज आहेत. 

थरूर म्हणतात की, “सयुंक्त राष्ट्रांत भारताने घेतलेली तटस्थ भूमिका योग्य नव्हती. भारताच्या भूमिकेला लोक चुकीच्या विचाराने उचललेले पाऊल म्हणतात. भारताने स्वत:ला चुकीच्या बाजुने ठेवले, असे म्हणता येईल.” थरूर यांच्या या भाष्याशी आनंद शर्मा सहमत नाहीत. शर्मा यांनी स्पष्ट केले की, “मी जे निवेदन जारी केले ती अधिकृत प्रतिक्रिया असून ते त्यांचे विचार असू शकतात.” थरूर यांचे भाष्य व्यक्तिगत असल्याचे सांगून आनंद शर्मा यांनी ते मुळातच खोडून टाकले.

उल्लेखनीय हे आहे की, आनंद शर्मा यांनी तीच भूमिका घेतली जी सरकारची आहे. सरकार म्हणते, शांतता स्थापन करण्यासाठी एकत्र येऊन काम करायला हवे. चर्चेच्या माध्यमातून या संकटावर तोडगा काढला पाहिजे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह पक्षाचे सगळे नेते भारतीय विद्यार्थ्यांना तेथून आणण्याबाबत सतत सरकारवर हल्ला करीत आहेत. परंतू, थरूर यांच्यासह पक्षातील अनेक नेते असे मानतात की, भारताने कठोर शब्दांत सयुंक्त राष्ट्रांत भूमिका स्पष्ट करायला हवी.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाcongressकाँग्रेस