शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

धबधब्यात बुडालेल्या दोघांचे मृतदेह तीन मित्र बाईकवरून आणत होते घरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 12:00 IST

दोघांच्या नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळेलला असताना त्यांच्या मित्रांनी मात्र सगळ्यांना धक्का बसेल अशी कृती केली.

चेन्नई- आंध्र प्रदेशातील टाडा धबधब्यात दोन जण बुडल्याची घटना सोमवारी दुपारी घडली होती. या दोन जणांमध्ये एका कॉलेजच्या विद्यार्थ्याचा समावेश आहे. या दोघांच्या नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळेलला असताना त्यांच्या मित्रांनी मात्र सगळ्यांना धक्का बसेल अशी कृती केली. मृत्यू झालेल्या दोघांच्या तीन मित्रांनी त्यां दोघांचे मृतदेह बाईकवरून घरी आणले.

बाईक चालविणारा व मागे बसलेल्याच्या मध्ये असलेल्या जागेत एक मृतदेह व दुसऱ्या बाईकच्या मागे एक मृतदेह अशी व्यवस्था करून त्यांनी मृतदेह घरी आणायचं ठरवलं. एका बाईकवर बाईक चालविणारा व मागे बसलेल्या मित्राच्यामध्ये मृतदेह व्यक्ती बाईकवर बसतो त्याच प्रमाणे बसवला. रस्त्यावरून येत असताना तिरूपती-चेन्नई रोडवर पोलिसांना झेंडा दाखविल्याने गाडी थांबविताना मृतदेह खाली पडला. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघड झाला. 

पाच मित्र मोटारसायकल ट्रिपवर गेले होते. त्यावेळी पाच मित्रांपैकी दोन जण धबधब्यात पडले. या दोघांना बाहेर काढून इतर तिघांनी यंत्रणेला या संदर्भातील माहिती देण्याऐवजी बाईकवरून मृतदेह घरी नेण्याचं ठरविलं. मृतदेह बाईकवरून घरी आणत असताना पोलिसांना या दोन तरूणांना रस्त्यावर झेंडा दाखवून थांबायला सांगितलं त्यावेळी यशवंथ व यसिन या दोघांचे मृतदेह खाली झुकले. यशवंथ भगवान सिंग (वय 19), यसिन (वय 30) अशी तरूणांची नाव आहेत. आम्ही पाच जण धबधब्यामध्ये खेळत असताना यशवंथने धबधब्यातील पोहण्याच्या ठिकाणी उडी मारली. तेथे चिखल असल्याने तो त्याल अडकला. यसिन यशवंथला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना तो ही त्यात अडकला व त्याचा मृत्यू झाल्याचं, या तीन मित्रांनी पोलिसांना सांगितलं. 

दोन मित्र चिखलात अडकल्यावर इतर तिघांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. मुलांच्या आवाजानंतर स्थानिकांनी तेथे येऊन मुलांना वाचविण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा उपयोग झाला नाही. दोघांचेही मृतदेह बाहेर काढले. मुलांनी बाईकवरून मृतदेह घरी आणण्याचा निर्णय नेमका का घेतला? याबद्दलची माहिती पोलीस घेत आहेत. मोटारबाईक ट्रिपवर निघालेल्या पाच जणांनी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास रोडट्रिप सुरू केली होती. त्यानंतर दुपारी ही घटना घडली. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठविले असून मृतांच्या कुटुंबीयांना याबद्दल कळविण्यात आलं आहे.