शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

कर्नाटकात काँग्रेसच्या २ आमदारांचे राजीनामे; भाजप म्हणते, सरकार पडल्यावर विचार करू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 01:08 IST

सिंग व जरकीहोळी यांनी आपापले राजीनामे विधानसभा अध्यक्षांकडे पाठविले, मात्र त्यांनी राजीनाम्याची कारणे उघड केली नाहीत.

बंगळुरू: आनंद सिंग (विजयनगर) आणि रमेश जरकीहोळी (गोकाक) या काँग्रेसच्या दोन आमदारांनी सोमवारी लागोपाठ आमदारकीचे राजीनामे दिल्याने मतभेदांमुळे आधीच डळमळीत झालेल्या कर्नाटकातील जनता दल (सेक्युलर) आणि काँग्रेस आघाडी सरकारचे बहुमत अवघ्या तीनवर आले.सिंग व जरकीहोळी यांनी आपापले राजीनामे विधानसभा अध्यक्षांकडे पाठविले, मात्र त्यांनी राजीनाम्याची कारणे उघड केली नाहीत. दोघेही भाजपमध्ये जातील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. नाराज असलेले काँग्रेसचे आणखी सहा आमदार पक्ष आणि पद सोडण्याच्या विचारात असल्याचेही बोलले जाते. त्यांच्यापैकी एक भीमा नाईक यांनी मात्र आपण राजीनामा दिला नसल्याचे स्पष्ट केले.गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने २२५ पैकी १०५ जागा जिंकल्या होत्या. मात्र त्यांना सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी ७७ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने ३७ जागा जिंकणाºया जनता दल (सेक्युलर)चे नेते एच. डी. कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपद देऊन आघाडी सरकार स्थापन केले होते. बसपचा व एक अपक्ष आमदार सोबत घेऊन ११९ आमदारांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले होते. आधी उमेश जाधव यांनी दिलेला राजीनामा गृहित धरला तर सोमवारच्या दोन राजीनाम्यांनी सरकारचे बहुमत अता अवघ्या तीनवर आले आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी काळभैरवेश्वर मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ््यासाठी सध्या अमेरिकेत सॅन जोस येथे आहे. या राजीनाम्यांनंतर त्यांनी तेथून टिष्ट्वट करून म्हटले की, भाजप आमचे सरकार पाडण्याचे दिवास्वप्न रंगवित आहे, पण त्यात त्यांना यश येणारनाही. (वृत्तसंस्था)सरकार पाडणार नाहीदुसरीकडे भाजपचे नेते बी. एस. येदियुरप्पा म्हणाले की, काँग्रेसच्या आमदारांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या मीही वाचल्या. आम्ही हे सरकार पाडणार नाही. मात्र सरकार स्वत:हून पडले तर आम्ही पर्यायी सरकार स्थापनेच्या शक्यतेवर विचार करू.गेल्या लोकसभा निवडणुकीत जद(एस)-काँग्रेस आघाडीचा दारुण पराभव झाल्यापासून सरकारमधील कुरबुरी वाढल्या आहेत. राज्यातील लोकसभेच्या २८ पैकी २५ जागा भाजपाने व एक जागा भाजपने पाठिंबा दिलेल्या एका अपक्षाने जिकली होती. राज्यात सत्तेत असलेल्या आघाडीतील पक्षांच्या वाट्याला प्रत्येकी फक्त एक जागा आली होती.

टॅग्स :congressकाँग्रेसKarnatakकर्नाटक