शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

'सुनो केजरीवाल... सुनो योगी'; नरेंद्र मोदींच्या आरोपांनंतर ट्विटरवर योगी-केजरीवाल यांच्यात खडाजंगी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 10:32 IST

twitter war between yogi adityanath and arvind kejriwal : सोमवारी रात्री उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  (Yogi Adityanath) यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची (UP Assembly Election 2022) सर्व राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय पक्ष एकमेकांवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाहीत. सोमवारी रात्री उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  (Yogi Adityanath) यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. या ट्विटला अरविंद केजरीवाल यांनीही योगी आदित्यनाथ यांना प्रत्युत्तर दिले. सुनो केजरीवाल म्हणणाऱ्या योगी आदित्यनाथ यांना सुनो योगी असं म्हणत अरविंद केजरीवालांनी उत्तर दिले.

दरम्यान, कोरोनाच्या पहिल्या लाटेत स्थलांतरितांच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारवर निशाणा साधला. याला प्रत्युत्तर देत अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीने पंतप्रधानांचा दावा खोटा असल्याचे सांगितले. अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले की, "पंतप्रधानांचे हे विधान पूर्णपणे खोटे आहे. देशाला आशा आहे की ज्यांना कोरोनाच्या काळात वेदना सहन कराव्या लागल्या, ज्यांनी आपले प्रियजन गमावले, पंतप्रधान त्यांच्याबद्दल संवेदनशील असतील. जनतेचे दुःख. राजकारण करणे पंतप्रधानांना शोभत नाही."

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्याचा निषेध केला. योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करत, "आदरणीय पंतप्रधानांबद्दल अरविंद केजरीवाल यांचे आजचे वक्तव्य अत्यंत निषेधार्ह आहे. अरविंद केजरीवाल यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी," असे म्हटले आहे. या ट्विटनंतर योगींनी आणखी एक ट्विट केले. "केजरीवाल ऐका, जेव्हा संपूर्ण मानवता करोनाच्या वेदना सहन करत होती, त्यावेळी तुम्ही उत्तर प्रदेशच्या लोकांना दिल्ली सोडण्यास भाग पाडले. तुमच्या सरकारने मध्यरात्री उत्तर प्रदेश सीमेवर लहान मुलांना आणि महिलांनाही असहाय्य सोडण्यासारखे अमानुष कृत्य केले. तुम्हाला मानवविरोधी म्हणावे की…"असे योगी आदित्यनाथ म्हणाले.

तिसऱ्या ट्विटमध्ये योगी आदित्यनाथ यांनी, "वीज-पाणी कनेक्शन तोडण्यात आले आणि झोपलेल्या लोकांना उचलून बसमधून उत्तर प्रदेश सीमेवर पाठवण्यात आले. आनंद विहारसाठी बसेस जात आहेत, त्यापलीकडे उत्तर प्रदेश-बिहारसाठी बसेस उपलब्ध होतील, अशी घोषणा करण्यात आली. उत्तर प्रदेश सरकारने स्थलांतरित मजुरांसाठी बसेसची व्यवस्था केली आणि त्यांना सुखरूप परत आणले. केजरीवाल यांना खोटं बोलण्याची हातोटी आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देश करोनासारख्या जागतिक महामारीशी झुंज देत असताना केजरीवाल यांनी स्थलांतरित मजुरांना दिल्लीतून बाहेरचा रस्ता दाखवला," असे म्हटले आहे.

योगी आदित्यनाथ यांच्या ट्विटला अरविंद केजरीवाल यांनीही प्रत्युत्तर दिले. सुनो केजरीवाल म्हणणाऱ्या योगी आदित्यनाथ यांना सुनो योगी असं म्हणत अरविंद केजरीवालांनी उत्तर दिले. अरविंद केजरीवाल यांनी ट्विटची सुरुवात सुनो योगींनी केली. "ऐका योगी, तुम्ही राहू द्या. उत्तर प्रदेशातील लोकांचे मृतदेह नदीत वाहत होते आणि तुम्ही करोडो रुपये खर्च करून टाईम्स मासिकात तुमच्या खोट्या जाहिराती देत ​​होता. तुमच्यासारखा निर्दयी आणि क्रूर शासक मी पाहिला नाही", असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथArvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदी