शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

सरकारच्या इशाऱ्यानंतर ट्विटरला जाग; ५०० हून अधिक अकाऊंट्स बंद आणि हॅशटॅगही हटवले

By देवेश फडके | Updated: February 10, 2021 12:18 IST

भारत सरकार आणि ट्विटरमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. ट्विटरने दखल न घेतल्यास कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला. यानंतर ट्विटरने केंद्र सरकारच्या नोटिसीला उत्तर दिले आहे.

ठळक मुद्देसरकारी इशाऱ्यानंतर ट्विटरकडून कारवाई५०० हून अधिक ट्विटर अकाऊंट बंद, हॅशटॅगही हटवलेस्थानिक कायद्याचा आदर करण्याचे ध्येय - ट्विटर

नवी दिल्ली : भारत सरकार आणि ट्विटरमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. अलीकडेच द्वेष पसरवणारे ट्विटर अकाऊंट्स बंद करण्याविषयी केंद्र सरकारकडून ट्विटरला नोटीस पाठवण्यात आली होती. ट्विटरने दखल न घेतल्यास कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला. यानंतर ट्विटरने केंद्र सरकारच्या नोटिसीला उत्तर दिले आहे. (twitter response to indian government over action on farmers agitation hashtag)

केंद्र सरकारकडून सुचवण्यात आलेले ५०० हून अधिक अकाऊंट्स ब्लॉक केल्याचे ट्विटरने नोटिसीला उत्तर देताना सांगितले आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने आयटी अॅक्ट कलम ६९ अ (३) नुसार पाठवलेल्या नोटिसीत ज्या ट्विटर हँडल्सचा उल्लेख केला आहे. त्या संबंधित अकाउंट्सची तपासणी करण्यात येईल, असे ट्विटरकडून सांगण्यात आले. 

इंधन दरात पुन्हा वाढ; मुंबईतील पेट्रोल आणि डिझेलचा आजचा दर जाणून घ्या

स्थानिक कायद्याचा आदर करण्याचे ध्येय

मुक्त अभिव्यक्तीच्या आमच्या मूलभूत तत्त्वांचे रक्षण करत असताना स्थानिक कायद्यांचा आदर करणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. ट्विटरवर चुकीच्या माहितीबद्दल आमच्याकडे कोणी तक्रार केली, तर यासंदर्भात ट्विटरचे नियम आणि स्थानिक कायदा यांची पडताळणी केली जाईल. मजकुराने ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन केले गेले असेल, तर तो मजकूर काढून टाकला जाईल, अशी माहिती ट्विटरच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आली.

सूचनांचे पालन करणे बंधनकारक

सार्वजनिक द्वेष व तणावाचे वातावरण बिघडू नये, यासाठी या सूचनांचे पालन करणे ट्विटरला बंधनकारक आहे. ट्विटरवर 'प्रेरणा मोहीम' आणि पंतप्रधान मोदींबाबत हॅशटॅगचा वापर 'असभ्य भाषा, चिथावणी आणि तणाव निर्माण करण्यासाठी' केला जात आहे, असे केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर यांनी ट्विटरच्या अधिकाऱ्यांशी बोलताना सांगितले.

पाकिस्तानचा संबंध

सरकारने दिलेल्या निर्देशानंतर ट्विटरने जी ५०० हून अधिक अकाउंट्स बंद केली आहेत. त्यामध्ये १२६ अकाउंट्समधील मजकुरात #ModiPlanningFarmerGenocide तर, ५८३ अकाउंट्स हे खलिस्तानी आणि पाकिस्तानशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. या सर्व अकाउंट्सद्वारे दिशाभूल करणारी माहिती आणि चिथावणीखोर मजकूर असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :Twitterट्विटरCentral Governmentकेंद्र सरकारFarmers Protestशेतकरी आंदोलनSocial Mediaसोशल मीडिया