शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

बिहारमधील पूरग्रस्तांच्या साह्यासाठी एनडीआरएफची वीस पथके

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 04:34 IST

गेल्या चार दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे बिहारमध्ये सोळा जिल्ह्यांत पुराने थैमान घातले आहे.

पाटणा - गेल्या चार दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे बिहारमध्ये सोळा जिल्ह्यांत पुराने थैमान घातले आहे. त्यामुळे त्या राज्यात केंद्र सरकारने मदतकार्यासाठी एनडीआरएफची वीस पथके पाठविली आहेत. हवाई दलाच्या हेलिकॉप्टरनाही बचावकार्यात सहभागी करून घेण्यात आले आहे. पुनर्वसन व मदत यात सरकारकडून होणाऱ्या विलंबामुळे लोक संतप्त झाले आहेत. पाटण्याच्या सरकारी रुग्णालयातही तीन फुटांहून अधिक पाणी आहे.राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे (एनसीएमसी) अध्यक्ष व कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी बिहारमधीलपूरस्थितीचा दिल्लीत मंगळवारी झालेल्या एका बैठकीत आढावा घेतला. एनडीआरएफच्या वीस पथकांमध्ये ९०० जवानांचा समावेश आहे. त्यातील सहा पथके पाटणा येथे पाठविण्यात आली आहेत. मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन पाटण्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.पाटणा येथे अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी चार ज्यादा क्षमतेचे पंप केंद्रीय कोळसा खात्याने पाठविले आहेत. यापैकी प्रत्येक पंप दर मिनिटाला तीन हजार गॅलन पाण्याचा उपसा करू शकतो. पूरग्रस्त भागांमध्ये खंडित झालेला वीजपुरवठा लवकरात लवकर सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नीट व्हावा म्हणून बिहार सरकारने योग्य पावले उचलली आहेत. बिहारमध्ये संततधारेचा जोर येत्या काही दिवसांत कमी होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पावसाच्या तांडवामुळे गेल्या चार दिवसांत बिहारमध्ये २८ जणांचा बळी गेला आहे. (वृत्तसंस्था)बंगालच्या माल्दा जिल्ह्यातही हाहाकारमुसळधार पावसामुळे पश्चिम बंगालमधील माल्दा जिल्ह्यामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचा तडाखा तेथील अडीच लाख लोकांना बसला आहे. या जिल्ह्यातील सखल भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. गंगा नदीच्या पुराच्या पाण्यात अनेक घरे वाहून गेली आहेत.पूरग्रस्तांसाठी मदतकार्यात एनडीआरएफचे पथक, तसेच स्थानिक पोलीस सहभागी झाले आहेत.

टॅग्स :Biharबिहारfloodपूर