शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
4
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
5
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
8
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
9
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
10
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
11
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
12
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
13
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
14
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
15
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
16
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
17
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
18
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
19
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
20
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?

बिहारमधील पूरग्रस्तांच्या साह्यासाठी एनडीआरएफची वीस पथके

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 04:34 IST

गेल्या चार दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे बिहारमध्ये सोळा जिल्ह्यांत पुराने थैमान घातले आहे.

पाटणा - गेल्या चार दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे बिहारमध्ये सोळा जिल्ह्यांत पुराने थैमान घातले आहे. त्यामुळे त्या राज्यात केंद्र सरकारने मदतकार्यासाठी एनडीआरएफची वीस पथके पाठविली आहेत. हवाई दलाच्या हेलिकॉप्टरनाही बचावकार्यात सहभागी करून घेण्यात आले आहे. पुनर्वसन व मदत यात सरकारकडून होणाऱ्या विलंबामुळे लोक संतप्त झाले आहेत. पाटण्याच्या सरकारी रुग्णालयातही तीन फुटांहून अधिक पाणी आहे.राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे (एनसीएमसी) अध्यक्ष व कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी बिहारमधीलपूरस्थितीचा दिल्लीत मंगळवारी झालेल्या एका बैठकीत आढावा घेतला. एनडीआरएफच्या वीस पथकांमध्ये ९०० जवानांचा समावेश आहे. त्यातील सहा पथके पाटणा येथे पाठविण्यात आली आहेत. मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन पाटण्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.पाटणा येथे अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी चार ज्यादा क्षमतेचे पंप केंद्रीय कोळसा खात्याने पाठविले आहेत. यापैकी प्रत्येक पंप दर मिनिटाला तीन हजार गॅलन पाण्याचा उपसा करू शकतो. पूरग्रस्त भागांमध्ये खंडित झालेला वीजपुरवठा लवकरात लवकर सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नीट व्हावा म्हणून बिहार सरकारने योग्य पावले उचलली आहेत. बिहारमध्ये संततधारेचा जोर येत्या काही दिवसांत कमी होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पावसाच्या तांडवामुळे गेल्या चार दिवसांत बिहारमध्ये २८ जणांचा बळी गेला आहे. (वृत्तसंस्था)बंगालच्या माल्दा जिल्ह्यातही हाहाकारमुसळधार पावसामुळे पश्चिम बंगालमधील माल्दा जिल्ह्यामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचा तडाखा तेथील अडीच लाख लोकांना बसला आहे. या जिल्ह्यातील सखल भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. गंगा नदीच्या पुराच्या पाण्यात अनेक घरे वाहून गेली आहेत.पूरग्रस्तांसाठी मदतकार्यात एनडीआरएफचे पथक, तसेच स्थानिक पोलीस सहभागी झाले आहेत.

टॅग्स :Biharबिहारfloodपूर