शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

राज्यसभेचे 12 निलंबित खासदार आज राज्यसभा अध्यक्षांना भेटण्याची शक्यता, दिलगिरी व्यक्त करणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 09:39 IST

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मार्शलशी गैरवर्तन केल्याप्रकरणी राज्यसभेच्या 12 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे.

नवी दिल्ली: 11 ऑगस्ट रोजी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात मार्शलशी गैरवर्तन केल्याप्रकरणी राज्यसभेतून निलंबित करण्यात आलेले 12 खासदार आज उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची भेट घेण्याची शक्यता आहे. सोमवारपासून सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातून या खासदारांना पूर्णपणे निलंबित करण्यात आले आहे.

110 दिवसांपूर्वी म्हणजे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात घडलेल्या त्या घटनेमुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात या खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन 23 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या संपूर्ण सत्रातूनच त्या खासदारांचे निलंबन झाले आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निलंबित खासदार आज(मंगळवार) राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करू शकतात.

निलंबनाबाबत आज विरोधकांची बैठक

विरोधी खासदारांवर झालेल्या या कारवाईविरोधात आज विरोधी पक्षाची महत्वाची बैठक होणार आहे. सकाळी 10 वाजता ही बैठक होईल. दरम्यान, या कारवाईबाबत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. इतरांसाठी आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दाबला जात असेल, तर ते लोकशाहीचा गळा घोटण्यासारखे आहे. आम्ही या कारवाईचा तीव्र निषेध करतो, असं ते म्हणाले. शिवाय, पुढील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी आज बैठक घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

काँग्रेस 6; तृणमूल, शिवसेना आणि डाव्यांचे 6 खासदार

राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी सोमवारी निलंबित खासदारांची नावे जाहीर केली. यामध्ये काँग्रेसच्या 6 खासदारांचा समावेश आहे: फुलो देवी नेताम, छाया वर्मा, रिपुन बोरा, राजमणी पटेल, सय्यद नासिर हुसेन, अखिलेश प्रसाद सिंग. डोला सेन आणि शांता छेत्री यांना ममता बॅनर्जी यांच्या TMC पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी आणि अनिल देसाई यांचा समावेश आहे. त्याचवेळी सीपीएमचे एलराम करीम आणि सीपीआयचे बिनॉय विश्वम यांचाही निलंबित खासदारांच्या यादीत समावेश आहे.

पावसाळी अधिवेशनात काय घडलं होतं?11 ऑगस्टला विमा विधेयकावर चर्चा सुरू असताना राज्यसभेत प्रचंड गोंधळ झाला. प्रकरण शांत करण्यासाठी मार्शल्स बोलावण्याची वेळ आली. सभागृहात घडलेल्या घटनांमुळे लोकशाहीचं मंदिर अपवित्र झाल्याचं राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी त्यावेळी म्हटलं होतं. या गोंधळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील कामकाज स्थगित करण्यात आली. लोकसभेत केवळ 21 टक्के, तर राज्यसभेत केवळ 28 टक्के कामकाज झालं.  

टॅग्स :ParliamentसंसदRajya Sabhaराज्यसभाcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेनाtmcठाणे महापालिका