शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभेचे 12 निलंबित खासदार आज राज्यसभा अध्यक्षांना भेटण्याची शक्यता, दिलगिरी व्यक्त करणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 09:39 IST

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मार्शलशी गैरवर्तन केल्याप्रकरणी राज्यसभेच्या 12 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे.

नवी दिल्ली: 11 ऑगस्ट रोजी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात मार्शलशी गैरवर्तन केल्याप्रकरणी राज्यसभेतून निलंबित करण्यात आलेले 12 खासदार आज उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची भेट घेण्याची शक्यता आहे. सोमवारपासून सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातून या खासदारांना पूर्णपणे निलंबित करण्यात आले आहे.

110 दिवसांपूर्वी म्हणजे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात घडलेल्या त्या घटनेमुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात या खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन 23 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या संपूर्ण सत्रातूनच त्या खासदारांचे निलंबन झाले आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निलंबित खासदार आज(मंगळवार) राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करू शकतात.

निलंबनाबाबत आज विरोधकांची बैठक

विरोधी खासदारांवर झालेल्या या कारवाईविरोधात आज विरोधी पक्षाची महत्वाची बैठक होणार आहे. सकाळी 10 वाजता ही बैठक होईल. दरम्यान, या कारवाईबाबत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. इतरांसाठी आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दाबला जात असेल, तर ते लोकशाहीचा गळा घोटण्यासारखे आहे. आम्ही या कारवाईचा तीव्र निषेध करतो, असं ते म्हणाले. शिवाय, पुढील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी आज बैठक घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

काँग्रेस 6; तृणमूल, शिवसेना आणि डाव्यांचे 6 खासदार

राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी सोमवारी निलंबित खासदारांची नावे जाहीर केली. यामध्ये काँग्रेसच्या 6 खासदारांचा समावेश आहे: फुलो देवी नेताम, छाया वर्मा, रिपुन बोरा, राजमणी पटेल, सय्यद नासिर हुसेन, अखिलेश प्रसाद सिंग. डोला सेन आणि शांता छेत्री यांना ममता बॅनर्जी यांच्या TMC पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी आणि अनिल देसाई यांचा समावेश आहे. त्याचवेळी सीपीएमचे एलराम करीम आणि सीपीआयचे बिनॉय विश्वम यांचाही निलंबित खासदारांच्या यादीत समावेश आहे.

पावसाळी अधिवेशनात काय घडलं होतं?11 ऑगस्टला विमा विधेयकावर चर्चा सुरू असताना राज्यसभेत प्रचंड गोंधळ झाला. प्रकरण शांत करण्यासाठी मार्शल्स बोलावण्याची वेळ आली. सभागृहात घडलेल्या घटनांमुळे लोकशाहीचं मंदिर अपवित्र झाल्याचं राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी त्यावेळी म्हटलं होतं. या गोंधळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील कामकाज स्थगित करण्यात आली. लोकसभेत केवळ 21 टक्के, तर राज्यसभेत केवळ 28 टक्के कामकाज झालं.  

टॅग्स :ParliamentसंसदRajya Sabhaराज्यसभाcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेनाtmcठाणे महापालिका