शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

आयआयटी प्रवेशासाठी बारावीत किमान ७५% गुणांची अट रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 05:22 IST

केंद्र सरकारचा निर्णय; आता अनेकांना संधी

- एस. के. गुप्तालोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : आयआयटीमध्ये इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्यासाठी १२ वीच्या परीक्षेमध्ये किमान ७५ टक्के गुण मिळविणे आवश्यक असण्याची अट आता रद्द करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी गुरुवारी ही घोषणा केली.

त्यांनी सांगितले की, ३ जुलैला आयआयटी खरगपूर जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचे आयोजन करणार आहे. देशातील २३ आयआयटींमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्याला १२ वीच्या परीक्षेत किमान ७५ टक्के गुण मिळविणे आवश्यक होते. या अटीमुळे अनेक प्रतिभावंत मुलांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळत नव्हता.रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितले की, जेईई मुख्य परीक्षेस देशातून सुमारे आठ लाख विद्यार्थी बसतात. त्यातून जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेला बसण्यासाठी सुमारे दोन ते अडीच लाख विद्यार्थी पात्र ठरविले जातात. देशातील २३ आयआयटीमध्ये २० हजार जागा व एनआयटीमध्ये ५० हजार जागा आहेत. या ७० हजार जागांच्या प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांना २० पर्सेंटाइल किंवा बारावीत किमान ७५ टक्के गुण मिळणे आवश्यक होते.

मेरिटनुसार प्रवेशनव्या नियमबदलानुसार जे विद्यार्थी जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना उत्तमोत्तम इंजिनिअरिंग शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश मिळण्याचा मार्ग खुला होईल. जेजेई अ‍ॅडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेरिटच्या आधारे प्रवेश दिला जाईल.

टॅग्स :IIT Mumbaiआयआयटी मुंबई