शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

आयआयटी प्रवेशासाठी बारावीत किमान ७५% गुणांची अट रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 05:22 IST

केंद्र सरकारचा निर्णय; आता अनेकांना संधी

- एस. के. गुप्तालोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : आयआयटीमध्ये इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्यासाठी १२ वीच्या परीक्षेमध्ये किमान ७५ टक्के गुण मिळविणे आवश्यक असण्याची अट आता रद्द करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी गुरुवारी ही घोषणा केली.

त्यांनी सांगितले की, ३ जुलैला आयआयटी खरगपूर जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचे आयोजन करणार आहे. देशातील २३ आयआयटींमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्याला १२ वीच्या परीक्षेत किमान ७५ टक्के गुण मिळविणे आवश्यक होते. या अटीमुळे अनेक प्रतिभावंत मुलांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळत नव्हता.रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितले की, जेईई मुख्य परीक्षेस देशातून सुमारे आठ लाख विद्यार्थी बसतात. त्यातून जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेला बसण्यासाठी सुमारे दोन ते अडीच लाख विद्यार्थी पात्र ठरविले जातात. देशातील २३ आयआयटीमध्ये २० हजार जागा व एनआयटीमध्ये ५० हजार जागा आहेत. या ७० हजार जागांच्या प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांना २० पर्सेंटाइल किंवा बारावीत किमान ७५ टक्के गुण मिळणे आवश्यक होते.

मेरिटनुसार प्रवेशनव्या नियमबदलानुसार जे विद्यार्थी जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना उत्तमोत्तम इंजिनिअरिंग शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश मिळण्याचा मार्ग खुला होईल. जेजेई अ‍ॅडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेरिटच्या आधारे प्रवेश दिला जाईल.

टॅग्स :IIT Mumbaiआयआयटी मुंबई