शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

तुर्कीने नाकारले तर इजिप्तने स्वीकारले; जागतिक बाजारपेठेत भारतीय गव्हाच्या मागणीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 18:34 IST

Export of Wheat: इजिप्तने भारतीय गव्हाच्या आयातीला मान्यता दिल्यानंतर आता भारताला नवीन परदेशी बाजारपेठ मिळाली आहे. यापूर्वी भारतातील गहू इजिप्तमध्ये निर्यात केला जात नव्हता.

Export of Wheat: गेल्या काही वर्षांत भारतात अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन झाले आहे. भारतात पिकवले जाणारे अन्नधान्य, फळे, भाजीपाला आणि इतर खाद्यपदार्थ परदेशातही निर्यात होतात. रशिया-युक्रेन युद्धाच्या काळातही भारतीय गव्हाच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली. यातच, तुर्कीने भारताचा 55,000 टन गहू खराब असल्याचे कारण देत खरेदी करण्यास नकार दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. दुसरीकडे, तुर्कीने गव्हाची खेप नाकारल्यानंतर इजिप्तने हा गहू आयात केला आहे. एवढेच नाही तर इजिप्तने आंतरराष्ट्रीय मानकांच्या आधारे भारतीय गव्हाची चाचणी घेतल्यानंतर त्याच्या गुणवत्तेचे कौतुकही केले.

भारताला नवीन परदेशी बाजारपेठ मिळालीइजिप्तने भारतीय गव्हाच्या आयातीला मान्यता दिल्यानंतर आता भारताला नवीन परदेशी बाजारपेठ मिळाली आहे. इजिप्त हा आफ्रिकन देश आहे, जिथे भारताने अजून गहू निर्यात केला नव्हता. आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तता केल्यानंतर इजिप्त भविष्यातही भारतीय गहू खरेदी करू शकतो. भारतीय गहू खरेदी करण्यापूर्वी अधिकृत इजिप्शियन संघ भारतात आले होते. गहू खरेदीसाठी इजिप्शियन संघाने प्रयोगशाळांमध्ये गव्हाची चाचणी घेतली आणि निकालांवर समाधानी झाल्यानंतर गहू आयात करण्यास मान्यता दिली. यासोबतच गव्हाच्या दर्जेदार उत्पादनासाठी भारताचेही कौतुक करण्यात आले.

भारतीय गहू जगाला आनंद देणारा जगभरातील अनेक देश गव्हाच्या आयात-निर्यातीत सर्वोच्च स्थानावर आहेत. ईयू गहू आंतरराष्ट्रीय बाजारात 43 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. तर भारतातील गव्हाची किंमत 26 रुपये प्रति किलो आहे. परवडणाऱ्या दरात चांगल्या प्रतीचा गहू निर्यात करून आता बहुतांश देश भारतातून गहू आयात करत आहेत. युरोपियन युनियनच्या गव्हाच्या तुलनेत भारतीय गहू 17 रुपयांनी स्वस्त आणि चांगला आहे. इतर देश सुद्धा 450-480 डॉलर प्रति टन दराने गहू निर्यात करत आहेत.

मध्य प्रदेशातील गव्हाची मागणी वाढली भारतातील बहुतांश राज्यांमध्ये उच्च प्रतीच्या गव्हाची लागवड केली जात असली तरी, इजिप्तला निर्यात होणारा गहू मध्य प्रदेशात घेतला जातो. हा सामान्य गहू नाही, हा गहू मॅकरोनी आणि पास्ता सारख्या विदेशी पदार्थ बनवण्यासाठी वापरला जातो. अन्नधान्याच्या निर्यातीबाबत भारत सरकारने जारी केलेल्या अहवालानुसार, 2021 सालापासून भारतीय गव्हाच्या निर्यातीत पाच पट वाढ झाली आहे. एप्रिल 2022 पर्यंत भारताने आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 14.5 लाख टन गहू विकला आहे. कमी किमतीत चांगली गुणवत्ता पाहता आता अनेक देश भारताकडून गहू खरेदी करू लागले आहेत.

टॅग्स :IndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीयbusinessव्यवसाय