शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांना खूश करण्याचा प्रयत्न

By admin | Updated: January 23, 2017 01:10 IST

समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी रविवारी जारी केलेल्या ३२ पानी निवडणूक जाहीरनाम्यात समाजातील प्रत्येक वर्गाला

मीना-कमल / लखनौसमाजवादी पक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी रविवारी जारी केलेल्या ३२ पानी निवडणूक जाहीरनाम्यात समाजातील प्रत्येक वर्गाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर अखिलेश आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंग यादव यांचे छायाचित्र आहे.मागील पृष्ठावर अखिलेश यांच्यासमवेत राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, चौधरी चरणसिंग, जनेश्वर मिश्र आणि चंद्रशेखर यांचे फोटो आहेत, मात्र मुलायमसिंग यांचे बंधू समाजवादी पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांचे छायाचित्र नाही. लखनौतील पक्ष मुख्यालयात निवडणूक जाहीरनाम्याची घोषणा करताना अखिलेश यांच्यासोबत पत्नी डिंपल यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. मुलायमसिंग आणि शिवपाल यादव यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावण्याचे टाळले. गरीब, अल्पसंख्यकांचे हित जोपासण्याचा प्रयत्न दिसून येतो मात्र या जाहीरनाम्यात २०१२ मध्ये मुस्लिमांना देण्यात आलेल्या ठोस आश्वासनासारखे काहीही नाही.स्मार्ट फोनसाठी १ कोटी ४० लाख लोकांनी नोंदणी केली आहे. या योजनेप्रमाणे लोकांनी मतदान केल्यास समाजवादी पक्षाला ३०० जागा जिंकून सरकार स्थापन करता येईल, असा विश्वास अखिलेश यांनी भाषणात व्यक्त केला.

गरिबांना मोफत गहू आणि तांदूळ...

च्राज्यातील एक कोटी लोकांना दर महिन्याला एक हजार रुपये पेन्शन दिली जाणार असून अति गरिबांना नि:शुल्क गहू आणि तांदूळ दिला जाईल. घरगुती कामगार आणि असंघटित मजुरांसाठी विशेष योजना सुरू केली जाईल, असे आश्वासन अखिलेश यांनी या वेळी दिले. च्आग्रा, कानपूर, मेरठ आणि वाराणसीमध्ये मेट्रो सेवा सुरू करण्याचे तसेच लखनौ विमानतळावर एअर अ‍ॅम्ब्युलन्सची व्यवस्था करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.अच्छे दिन कुठे आहेत? मोदींवर हल्लाबोल...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अच्छे दिन ’ आणि ‘सबका साथ सबका विकास’ चा नारा दिला. केंद्रातील सरकारला तीन वर्षे झाली आहेत. जनता आता विकास कुठे आहे, असा सवाल करीत आहे. केंद्र सरकारने विकासाच्या बहाण्याने कधी लोकांच्या हाती झाडू दिला तर कधी योगा करवून घेतला. आता अर्थसंकल्पात काही नव्या बाबी दिसून येतील, अशी आशा आहे.दृष्टिक्षेपात जाहीरनामा...-शेतकऱ्यांना स्वस्त दरात कर्ज.दुष्काळग्रस्त बुंदेलखंडमध्ये पाण्याची उपलब्धता.शेतकऱ्यांसाठी नवी व्यावहारिक पीक विमा योजना.गुरांवर उपचारासाठी १०२,१०८ च्या सेवेनुसार विशेष अ‍ॅम्ब्युलन्स सेवा.विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये मोफत वाय-फाय.प्रत्येक विभागात नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर समाजवादी अभिनव विद्यालयाची स्थापना.मध्यान्ह भोजनाप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला एक लीटर देशी तूप आणि एक किलो दूध पावडर.गरीब आणि कमकुवत घटकांतील रुग्णांना दुर्धर रोगांसाठी नवी आरोग्य विमा योजना.प्रत्येक जिल्ह्यात एका सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची स्थापना.अल्पसंख्यक वर्गातील युवकांसाठी एक लाख नव्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम व्यवसायांची निर्मिती.सुन्नी- शिया वक्फ मंडळाला स्वावलंबी बनविणे. वाराणसीमध्ये हज हाऊसची निर्मिती.ग्रामीण भागात घरगुती ग्राहकांना २४ तास वीज उपलब्ध करवून देणे.सर्व प्रमुख शहरांमधील वाहतुकीची कायमस्वरूपी कोंडी सोडविणे.समाजवादी पेन्शन योजना आणि अन्य पेन्शन योजनेंतर्गत एक कोटी कुटुंबाना एक हजार रुपये मासिक पेन्शन.६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या वकिलाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना १० लाखांची मदत.