शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

सर्वांना खूश करण्याचा प्रयत्न

By admin | Updated: January 23, 2017 01:10 IST

समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी रविवारी जारी केलेल्या ३२ पानी निवडणूक जाहीरनाम्यात समाजातील प्रत्येक वर्गाला

मीना-कमल / लखनौसमाजवादी पक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी रविवारी जारी केलेल्या ३२ पानी निवडणूक जाहीरनाम्यात समाजातील प्रत्येक वर्गाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर अखिलेश आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंग यादव यांचे छायाचित्र आहे.मागील पृष्ठावर अखिलेश यांच्यासमवेत राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, चौधरी चरणसिंग, जनेश्वर मिश्र आणि चंद्रशेखर यांचे फोटो आहेत, मात्र मुलायमसिंग यांचे बंधू समाजवादी पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांचे छायाचित्र नाही. लखनौतील पक्ष मुख्यालयात निवडणूक जाहीरनाम्याची घोषणा करताना अखिलेश यांच्यासोबत पत्नी डिंपल यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. मुलायमसिंग आणि शिवपाल यादव यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावण्याचे टाळले. गरीब, अल्पसंख्यकांचे हित जोपासण्याचा प्रयत्न दिसून येतो मात्र या जाहीरनाम्यात २०१२ मध्ये मुस्लिमांना देण्यात आलेल्या ठोस आश्वासनासारखे काहीही नाही.स्मार्ट फोनसाठी १ कोटी ४० लाख लोकांनी नोंदणी केली आहे. या योजनेप्रमाणे लोकांनी मतदान केल्यास समाजवादी पक्षाला ३०० जागा जिंकून सरकार स्थापन करता येईल, असा विश्वास अखिलेश यांनी भाषणात व्यक्त केला.

गरिबांना मोफत गहू आणि तांदूळ...

च्राज्यातील एक कोटी लोकांना दर महिन्याला एक हजार रुपये पेन्शन दिली जाणार असून अति गरिबांना नि:शुल्क गहू आणि तांदूळ दिला जाईल. घरगुती कामगार आणि असंघटित मजुरांसाठी विशेष योजना सुरू केली जाईल, असे आश्वासन अखिलेश यांनी या वेळी दिले. च्आग्रा, कानपूर, मेरठ आणि वाराणसीमध्ये मेट्रो सेवा सुरू करण्याचे तसेच लखनौ विमानतळावर एअर अ‍ॅम्ब्युलन्सची व्यवस्था करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.अच्छे दिन कुठे आहेत? मोदींवर हल्लाबोल...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अच्छे दिन ’ आणि ‘सबका साथ सबका विकास’ चा नारा दिला. केंद्रातील सरकारला तीन वर्षे झाली आहेत. जनता आता विकास कुठे आहे, असा सवाल करीत आहे. केंद्र सरकारने विकासाच्या बहाण्याने कधी लोकांच्या हाती झाडू दिला तर कधी योगा करवून घेतला. आता अर्थसंकल्पात काही नव्या बाबी दिसून येतील, अशी आशा आहे.दृष्टिक्षेपात जाहीरनामा...-शेतकऱ्यांना स्वस्त दरात कर्ज.दुष्काळग्रस्त बुंदेलखंडमध्ये पाण्याची उपलब्धता.शेतकऱ्यांसाठी नवी व्यावहारिक पीक विमा योजना.गुरांवर उपचारासाठी १०२,१०८ च्या सेवेनुसार विशेष अ‍ॅम्ब्युलन्स सेवा.विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये मोफत वाय-फाय.प्रत्येक विभागात नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर समाजवादी अभिनव विद्यालयाची स्थापना.मध्यान्ह भोजनाप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला एक लीटर देशी तूप आणि एक किलो दूध पावडर.गरीब आणि कमकुवत घटकांतील रुग्णांना दुर्धर रोगांसाठी नवी आरोग्य विमा योजना.प्रत्येक जिल्ह्यात एका सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची स्थापना.अल्पसंख्यक वर्गातील युवकांसाठी एक लाख नव्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम व्यवसायांची निर्मिती.सुन्नी- शिया वक्फ मंडळाला स्वावलंबी बनविणे. वाराणसीमध्ये हज हाऊसची निर्मिती.ग्रामीण भागात घरगुती ग्राहकांना २४ तास वीज उपलब्ध करवून देणे.सर्व प्रमुख शहरांमधील वाहतुकीची कायमस्वरूपी कोंडी सोडविणे.समाजवादी पेन्शन योजना आणि अन्य पेन्शन योजनेंतर्गत एक कोटी कुटुंबाना एक हजार रुपये मासिक पेन्शन.६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या वकिलाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना १० लाखांची मदत.