शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

तेलंगणात टीआरएसला काँग्रेस-टीडीपीच्या आघाडीचे आव्हान, भाजपाला मिळेल शेवटचं स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 06:30 IST

शेतकऱ्यांच्या समस्या, शिक्षण, बेरोजगारी हे मुद्दे गाजणार

हैदराबाद : के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीने (टीआरएस) गेल्यावेळी स्वतंत्र राज्याच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली आणि त्यांना यश मिळाले. आता मात्र तशी परिस्थिती नाही. येत्या ७ डिसेंबरला होणाºया निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीसमोर अनेक आव्हाने आहेत.

यंदा काँग्रेस, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम (टीडीपी), सीपीआय व तेलंगणा जन समिती (टीजेएस) यांची आघाडी आहे. त्यामुळे केसीआर यांच्यापुढे या आघाडीचे आव्हान असेल. तेलंगणात शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे हाही मुद्दा निवडणुकीत गाजेल. शिक्षणासंदर्भात केसीआर सरकारने कोणतीच पावले उचलली नाहीत, असा विरोधकांचा आरोप आहे. शिक्षण व्यवस्थेत १०० दिवसांत मूलभूत बदल करण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले होते. पण काँग्रेसनेही आश्वासने पाळली नसल्याची जनतेची भावना आहे. साडेतीन कोटी लोकसंख्येपैकी ८६ लाख लोक अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे आहेत. हे मतदार पूर्वापार काँग्रेसला मदत करत आले आहेत. या निवडणुकीत ते कुणासोबत राहतात, हेही महत्त्वाचे ठरणार आहे. दलित, मुस्लिम व आदिवासींची मते निर्णायक मानली जातात.

तेलंगणात स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाल्यावर पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. याआधी २०१४ मध्ये ११९ पैकी ६३ जागा केसीआर यांच्या टीआरएसला मिळाल्या होत्या. ती निवडणूक स्वतंत्र राज्याच्या मुद्द्यावरच लढवली होती. सत्तेत आल्यावर केसीआर यांनी शेतकºयांसाठी, मिशन काकतिया, कल्याणलक्ष्मी व शादी मुबारक योजना आणल्या. त्याआधारे जनतेकडे मते मागितली जातील.२०१४ मध्ये कसे होते पक्षीय बलाबलविधानसभेत ३० एप्रिल २०१४ रोजी झालेल्या निवडणुकीत टीआरएस व इतर९०, काँग्रेस १३, एमआयएम ७, भाजपा, ५, टीडीपी ३, सीपीआय १ असे पक्षीय बलाबल होते. तेलंगणामध्ये ३१ जिल्हे असून, ११९ जागांसाठी निवडणूक होणार आहे.टीआरएसला पसंती : टीम फ्लॅश व व्हीडीएस असोसिएटस् यांच्या सर्वेक्षणात टीआरएसला ११७ पैकी ८५, काँग्रेसला १८, एमआयएमला ७ आणि भाजपाला ५ जागा मिळतील असा अंदाज आहे.

टॅग्स :TelanganaतेलंगणाBJPभाजपाvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक