शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
6
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
7
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
8
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
9
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
10
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
11
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
12
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
13
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
14
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
15
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
16
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
17
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
18
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
19
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!

त्रिशूळ, वज्राचा प्रहार करणार, ड्रॅगनला अद्दल घडवणार; चीनच्या कपटनीतीविरोधात भारतीय लष्कराला पौराणिक शस्त्रांचा आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 14:55 IST

Indian Army: गलवानमधील भारताच्या संरक्षण दलांनी नोएडामधील एका कंपनीला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिनी सैन्याचा सामना करण्यासाठी वापरण्यास हलक्या आणि कमी प्राणघातक असलेली शस्त्रे तयार करण्यास सांगितले होते.

नवी दिल्ली - भारत आणि चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव अद्याप कायम आहे. गेल्यावर्षीय लडाखमधील  गलवान खोऱ्यात चिनी सैन्याने भारतीय जवानांवर काटेरी दांडे. टीझर गन आणि इतर हत्यारे घेऊन हल्ला केला होता. तेव्हा भारताच्या वीर जवानांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढला होता. हे तणावाचे वातावरण अद्याप कायम आहे. या घटनेनंतर भारताच्या संरक्षण दलांनी नोएडामधील एका कंपनीला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिनी सैन्याचा सामना करण्यासाठी वापरण्यास हलक्या आणि कमी प्राणघातक असलेली शस्त्रे तयार करण्यास सांगितले होते. ('Trishul' and 'Sapper Punch'- non-lethal weapons-developed by UP-based Apasteron Pvt Ltd to make the enemy temporarily ineffective in case of violent face offs)

सुरक्षा दलांनी कंपनीला कमी प्राणघातक शस्त्रांची ऑर्डर दिली होती. दरम्यान, कंपनीने शिवशंकराच्या त्रिशुळापासून प्रेरणा घेत तसेच एक हत्यार विकसित केले आहे. एपेस्टेरॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे चिफ टेक्नॉलॉजी ऑफिसर मोहित कुमार यांनी एएनआयला सांगितले की, गलवान खोऱ्यात घडलेल्या घटनेनंतर संरक्षण दलांनी आम्हाला कमी प्राणघातक शस्त्रे विकसित करण्यास सांगितले होते. सध्या चिनी सैन्य अशी शस्त्रे बाळगते. 

आम्ही अशी टिझर गन आणि कमी प्राणघातक शस्त्रे बनवली आहेत. जी आमच्या पारंपरिक हत्यारांपासून प्रेरित झालेली आहेत. त्यामध्येच लोखंडाचे काटे असलेला दांडा तयार करण्यात आला आहे. त्याचे वज्र असे नामकरण करण्यात आले आहे. हे हत्यार विरोधी सैनिकांसोबतच्या चकमकीत उपयोगी ठरेल. तसेच याचा वापर करून बुलेटप्रुफ वाहनांना पंचरही करता येते. तसेच या वज्राची खासिय म्हणजे याच्या काट्यामधून विजेचे झटकेही देता येतात. त्यामुळे हातघाईच्या लढाईत प्रतिस्पर्धी सैनिकाला काही काळ बेशुद्ध करता येते.

याशिवाय कंपनीकडून एक त्रिशूळ तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून शत्रूच्या वाहनांना आपल्या क्षेत्रात घुसखोरी करण्यापासून रोखण्यासाठी तसेच सैनिकांचा सामना करण्यासाठी मदत होणार आहे. याशिवाय खास प्रकारचे ग्लव्हज विकसित करण्यात आले आहेत. त्यांचे नाव सॅपर पंच आहे. हे ग्लव्हज हातात घालून समोरील व्यक्तीवर मारल्यास विजेचा धक्का बसतो. त्यामुळे समोरील व्यक्ती बेशुद्ध पडू शकते. तसेच थंडीच्या दिवसांत यांचा हातमोजे म्हणूनही वापर होऊ शकतो.

या हत्यारांच्या मारक क्षमतेबाबत मोहित कुमार यांनी सांगितले की, या हत्यारांमुळे कुणाचाही मृत्यू होणार नाही. तसेच कुणी गंभीररीत्या जखमीही होणार नाही. मात्र जेव्हा कधी हातघाईची झटापट होईल तेव्हा ही हत्यारे काही सेकंदात शत्रूला गारद करू शकतील. तसेच ही हत्यारे केवळ संरक्षण दले आणि कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या एजन्सींनाच दिली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानladakhलडाखchinaचीन