शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

त्रिशूळ, वज्राचा प्रहार करणार, ड्रॅगनला अद्दल घडवणार; चीनच्या कपटनीतीविरोधात भारतीय लष्कराला पौराणिक शस्त्रांचा आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 14:55 IST

Indian Army: गलवानमधील भारताच्या संरक्षण दलांनी नोएडामधील एका कंपनीला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिनी सैन्याचा सामना करण्यासाठी वापरण्यास हलक्या आणि कमी प्राणघातक असलेली शस्त्रे तयार करण्यास सांगितले होते.

नवी दिल्ली - भारत आणि चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव अद्याप कायम आहे. गेल्यावर्षीय लडाखमधील  गलवान खोऱ्यात चिनी सैन्याने भारतीय जवानांवर काटेरी दांडे. टीझर गन आणि इतर हत्यारे घेऊन हल्ला केला होता. तेव्हा भारताच्या वीर जवानांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढला होता. हे तणावाचे वातावरण अद्याप कायम आहे. या घटनेनंतर भारताच्या संरक्षण दलांनी नोएडामधील एका कंपनीला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिनी सैन्याचा सामना करण्यासाठी वापरण्यास हलक्या आणि कमी प्राणघातक असलेली शस्त्रे तयार करण्यास सांगितले होते. ('Trishul' and 'Sapper Punch'- non-lethal weapons-developed by UP-based Apasteron Pvt Ltd to make the enemy temporarily ineffective in case of violent face offs)

सुरक्षा दलांनी कंपनीला कमी प्राणघातक शस्त्रांची ऑर्डर दिली होती. दरम्यान, कंपनीने शिवशंकराच्या त्रिशुळापासून प्रेरणा घेत तसेच एक हत्यार विकसित केले आहे. एपेस्टेरॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे चिफ टेक्नॉलॉजी ऑफिसर मोहित कुमार यांनी एएनआयला सांगितले की, गलवान खोऱ्यात घडलेल्या घटनेनंतर संरक्षण दलांनी आम्हाला कमी प्राणघातक शस्त्रे विकसित करण्यास सांगितले होते. सध्या चिनी सैन्य अशी शस्त्रे बाळगते. 

आम्ही अशी टिझर गन आणि कमी प्राणघातक शस्त्रे बनवली आहेत. जी आमच्या पारंपरिक हत्यारांपासून प्रेरित झालेली आहेत. त्यामध्येच लोखंडाचे काटे असलेला दांडा तयार करण्यात आला आहे. त्याचे वज्र असे नामकरण करण्यात आले आहे. हे हत्यार विरोधी सैनिकांसोबतच्या चकमकीत उपयोगी ठरेल. तसेच याचा वापर करून बुलेटप्रुफ वाहनांना पंचरही करता येते. तसेच या वज्राची खासिय म्हणजे याच्या काट्यामधून विजेचे झटकेही देता येतात. त्यामुळे हातघाईच्या लढाईत प्रतिस्पर्धी सैनिकाला काही काळ बेशुद्ध करता येते.

याशिवाय कंपनीकडून एक त्रिशूळ तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून शत्रूच्या वाहनांना आपल्या क्षेत्रात घुसखोरी करण्यापासून रोखण्यासाठी तसेच सैनिकांचा सामना करण्यासाठी मदत होणार आहे. याशिवाय खास प्रकारचे ग्लव्हज विकसित करण्यात आले आहेत. त्यांचे नाव सॅपर पंच आहे. हे ग्लव्हज हातात घालून समोरील व्यक्तीवर मारल्यास विजेचा धक्का बसतो. त्यामुळे समोरील व्यक्ती बेशुद्ध पडू शकते. तसेच थंडीच्या दिवसांत यांचा हातमोजे म्हणूनही वापर होऊ शकतो.

या हत्यारांच्या मारक क्षमतेबाबत मोहित कुमार यांनी सांगितले की, या हत्यारांमुळे कुणाचाही मृत्यू होणार नाही. तसेच कुणी गंभीररीत्या जखमीही होणार नाही. मात्र जेव्हा कधी हातघाईची झटापट होईल तेव्हा ही हत्यारे काही सेकंदात शत्रूला गारद करू शकतील. तसेच ही हत्यारे केवळ संरक्षण दले आणि कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या एजन्सींनाच दिली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानladakhलडाखchinaचीन