शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

त्रिशूळ, वज्राचा प्रहार करणार, ड्रॅगनला अद्दल घडवणार; चीनच्या कपटनीतीविरोधात भारतीय लष्कराला पौराणिक शस्त्रांचा आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 14:55 IST

Indian Army: गलवानमधील भारताच्या संरक्षण दलांनी नोएडामधील एका कंपनीला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिनी सैन्याचा सामना करण्यासाठी वापरण्यास हलक्या आणि कमी प्राणघातक असलेली शस्त्रे तयार करण्यास सांगितले होते.

नवी दिल्ली - भारत आणि चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव अद्याप कायम आहे. गेल्यावर्षीय लडाखमधील  गलवान खोऱ्यात चिनी सैन्याने भारतीय जवानांवर काटेरी दांडे. टीझर गन आणि इतर हत्यारे घेऊन हल्ला केला होता. तेव्हा भारताच्या वीर जवानांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढला होता. हे तणावाचे वातावरण अद्याप कायम आहे. या घटनेनंतर भारताच्या संरक्षण दलांनी नोएडामधील एका कंपनीला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिनी सैन्याचा सामना करण्यासाठी वापरण्यास हलक्या आणि कमी प्राणघातक असलेली शस्त्रे तयार करण्यास सांगितले होते. ('Trishul' and 'Sapper Punch'- non-lethal weapons-developed by UP-based Apasteron Pvt Ltd to make the enemy temporarily ineffective in case of violent face offs)

सुरक्षा दलांनी कंपनीला कमी प्राणघातक शस्त्रांची ऑर्डर दिली होती. दरम्यान, कंपनीने शिवशंकराच्या त्रिशुळापासून प्रेरणा घेत तसेच एक हत्यार विकसित केले आहे. एपेस्टेरॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे चिफ टेक्नॉलॉजी ऑफिसर मोहित कुमार यांनी एएनआयला सांगितले की, गलवान खोऱ्यात घडलेल्या घटनेनंतर संरक्षण दलांनी आम्हाला कमी प्राणघातक शस्त्रे विकसित करण्यास सांगितले होते. सध्या चिनी सैन्य अशी शस्त्रे बाळगते. 

आम्ही अशी टिझर गन आणि कमी प्राणघातक शस्त्रे बनवली आहेत. जी आमच्या पारंपरिक हत्यारांपासून प्रेरित झालेली आहेत. त्यामध्येच लोखंडाचे काटे असलेला दांडा तयार करण्यात आला आहे. त्याचे वज्र असे नामकरण करण्यात आले आहे. हे हत्यार विरोधी सैनिकांसोबतच्या चकमकीत उपयोगी ठरेल. तसेच याचा वापर करून बुलेटप्रुफ वाहनांना पंचरही करता येते. तसेच या वज्राची खासिय म्हणजे याच्या काट्यामधून विजेचे झटकेही देता येतात. त्यामुळे हातघाईच्या लढाईत प्रतिस्पर्धी सैनिकाला काही काळ बेशुद्ध करता येते.

याशिवाय कंपनीकडून एक त्रिशूळ तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून शत्रूच्या वाहनांना आपल्या क्षेत्रात घुसखोरी करण्यापासून रोखण्यासाठी तसेच सैनिकांचा सामना करण्यासाठी मदत होणार आहे. याशिवाय खास प्रकारचे ग्लव्हज विकसित करण्यात आले आहेत. त्यांचे नाव सॅपर पंच आहे. हे ग्लव्हज हातात घालून समोरील व्यक्तीवर मारल्यास विजेचा धक्का बसतो. त्यामुळे समोरील व्यक्ती बेशुद्ध पडू शकते. तसेच थंडीच्या दिवसांत यांचा हातमोजे म्हणूनही वापर होऊ शकतो.

या हत्यारांच्या मारक क्षमतेबाबत मोहित कुमार यांनी सांगितले की, या हत्यारांमुळे कुणाचाही मृत्यू होणार नाही. तसेच कुणी गंभीररीत्या जखमीही होणार नाही. मात्र जेव्हा कधी हातघाईची झटापट होईल तेव्हा ही हत्यारे काही सेकंदात शत्रूला गारद करू शकतील. तसेच ही हत्यारे केवळ संरक्षण दले आणि कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या एजन्सींनाच दिली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानladakhलडाखchinaचीन