शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तिहेरी तलाक, नागरिकत्व विधेयक राज्यसभेमध्ये झालेच नाही मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 05:13 IST

या सरकारचे अखेरचे असलेले संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवारी संपले. या अधिवेशनात तिहेरी तलाकविरोधी विधेयक व नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेत संमत होऊ शकले नाही.

नवी दिल्ली : या सरकारचे अखेरचे असलेले संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवारी संपले. या अधिवेशनात तिहेरी तलाकविरोधी विधेयक व नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेत संमत होऊ शकले नाही. तिहेरी तलाकविरोधी विधेयकाचा सरकारने याआधीच वटहुकूम काढण्यात आला असून, त्याची मुदत ३ जून रोजी संपत आहे. त्यामुळे त्याची मुदत वाढवण्याबाबतचा निर्णय नवे सरकारच घेऊ शकेल.तिहेरी तलाक विधेयकाला लोकसभेची संमती मिळाली होती; पण राज्यसभेत याआधीही ते मंजूर झाले नव्हते. त्यामुळे मोदी सरकारने त्याचा वटहुकूम काढला होता. सरकारला दोनदा असा वटहुकूम काढावा लागला. आता त्याची मुदत ३ जून रोजी संपत आहे. त्याआधी संसदेचे अधिवेशन सुरू झाले आणि राज्यसभेत ते संमत झाले, तरच त्याचे कायमस्वरूपी कायद्यात रूपांतर होईल.अन्यथा नव्याने वटहुकूम काढण्याबाबत निर्णय घ्यावा लागेल. लोकसभा निवडणुकांनंतर भाजपाचे सरकार आल्यास तसा वटहुकूम काढला जाईल; पण तसे न झाल्यास येणारे नवे सरकार काय निर्णय घेईल, हे सांगणे अवघड आहे.नागरिकत्व दुरुस्ती विधेयकालाही राज्यसभेची मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे मोदी सरकार लोकसभा निवडणुकांआधी त्याचा वटहुकूम आणणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या विधेयकात ३१ डिसेंबर २0१४ पर्यंत अन्य देशांतून भारतात आलेल्या हिंदू, बौद्ध, पारसी, जैन शरणार्थींना देशाचे नागरिकत्व देण्याची तरतूद आहे.मात्र आसामा करारान्वये १९७१ नंतर आलेल्यांना भारताचे नागरिकत्व देण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले होते.त्यामुळे मात्र ईशान्येकडील सर्वच राज्यांनी या विधेयकाला जोरदार विरोध केला आहे. या प्रश्नावरून आसाम गण परिषदेने सत्ताधारी रालोआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि नागालँड, मेघालय, मणिपूर, अरुणाचल प्रदेश या सर्वच राज्यांनी व तेथील सरकारांनी या विधेयकाच्या विरोधात जाहीरपणे भूमिका घेतली आहे.वटहुकमाची शक्यता कमीचहे विधेयक मंजूर झाल्यास आम्हीही भाजपाची साथ सोडू, असे ईशान्येतील अनेक प्रादेशिक पक्षांनी घोषित केले आहे. तसे झाल्यास त्या सातही राज्यांमध्ये भाजपाची राजकीय अडचण होऊ शकेल आणि कदाचित लोकसभा निवडणुकांत फटकाही बसू शकेल.त्यामुळे मोदी सरकार नागरिकत्व विधेयकाचा वटहुकूम काढणार नाही, असे दिसत आहे. त्यामुळे या विधेयकाबाबतचा निर्णयही लोकसभा निवडणुकांनंतरच होईल, हे स्पष्ट आहे.

टॅग्स :Parliamentसंसद