शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

तिहेरी तलाक, नागरिकत्व विधेयक राज्यसभेमध्ये झालेच नाही मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 05:13 IST

या सरकारचे अखेरचे असलेले संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवारी संपले. या अधिवेशनात तिहेरी तलाकविरोधी विधेयक व नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेत संमत होऊ शकले नाही.

नवी दिल्ली : या सरकारचे अखेरचे असलेले संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवारी संपले. या अधिवेशनात तिहेरी तलाकविरोधी विधेयक व नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेत संमत होऊ शकले नाही. तिहेरी तलाकविरोधी विधेयकाचा सरकारने याआधीच वटहुकूम काढण्यात आला असून, त्याची मुदत ३ जून रोजी संपत आहे. त्यामुळे त्याची मुदत वाढवण्याबाबतचा निर्णय नवे सरकारच घेऊ शकेल.तिहेरी तलाक विधेयकाला लोकसभेची संमती मिळाली होती; पण राज्यसभेत याआधीही ते मंजूर झाले नव्हते. त्यामुळे मोदी सरकारने त्याचा वटहुकूम काढला होता. सरकारला दोनदा असा वटहुकूम काढावा लागला. आता त्याची मुदत ३ जून रोजी संपत आहे. त्याआधी संसदेचे अधिवेशन सुरू झाले आणि राज्यसभेत ते संमत झाले, तरच त्याचे कायमस्वरूपी कायद्यात रूपांतर होईल.अन्यथा नव्याने वटहुकूम काढण्याबाबत निर्णय घ्यावा लागेल. लोकसभा निवडणुकांनंतर भाजपाचे सरकार आल्यास तसा वटहुकूम काढला जाईल; पण तसे न झाल्यास येणारे नवे सरकार काय निर्णय घेईल, हे सांगणे अवघड आहे.नागरिकत्व दुरुस्ती विधेयकालाही राज्यसभेची मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे मोदी सरकार लोकसभा निवडणुकांआधी त्याचा वटहुकूम आणणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या विधेयकात ३१ डिसेंबर २0१४ पर्यंत अन्य देशांतून भारतात आलेल्या हिंदू, बौद्ध, पारसी, जैन शरणार्थींना देशाचे नागरिकत्व देण्याची तरतूद आहे.मात्र आसामा करारान्वये १९७१ नंतर आलेल्यांना भारताचे नागरिकत्व देण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले होते.त्यामुळे मात्र ईशान्येकडील सर्वच राज्यांनी या विधेयकाला जोरदार विरोध केला आहे. या प्रश्नावरून आसाम गण परिषदेने सत्ताधारी रालोआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि नागालँड, मेघालय, मणिपूर, अरुणाचल प्रदेश या सर्वच राज्यांनी व तेथील सरकारांनी या विधेयकाच्या विरोधात जाहीरपणे भूमिका घेतली आहे.वटहुकमाची शक्यता कमीचहे विधेयक मंजूर झाल्यास आम्हीही भाजपाची साथ सोडू, असे ईशान्येतील अनेक प्रादेशिक पक्षांनी घोषित केले आहे. तसे झाल्यास त्या सातही राज्यांमध्ये भाजपाची राजकीय अडचण होऊ शकेल आणि कदाचित लोकसभा निवडणुकांत फटकाही बसू शकेल.त्यामुळे मोदी सरकार नागरिकत्व विधेयकाचा वटहुकूम काढणार नाही, असे दिसत आहे. त्यामुळे या विधेयकाबाबतचा निर्णयही लोकसभा निवडणुकांनंतरच होईल, हे स्पष्ट आहे.

टॅग्स :Parliamentसंसद