शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

मोदींच्या व्यूहरचनेची राज्यसभेत कठीण परीक्षा, ‘ट्रिपल तलाक’चे विधेयक बुधवारी मांडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 02:38 IST

ट्रिपल तलाकचे विधेयक राज्यसभेत सादर केले जाईल त्यावेळी नरेंद्र मोदी सरकारच्या बाजुने बहुमत नाही. त्याला राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) नसलेल्या अखिल भारतीय अण्णा द्रमुक व द्रमुकसारख्या पक्षांसह अवघ्या १०८ सदस्यांचा पाठिंबा आहे. राज्यसभेत विधेयक तीन जानेवारी रोजी मांडले जाईल.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : ट्रिपल तलाकचे विधेयक राज्यसभेत सादर केले जाईल त्यावेळी नरेंद्र मोदी सरकारच्या बाजुने बहुमत नाही. त्याला राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) नसलेल्या अखिल भारतीय अण्णा द्रमुक व द्रमुकसारख्या पक्षांसह अवघ्या १०८ सदस्यांचा पाठिंबा आहे. राज्यसभेत विधेयक तीन जानेवारी रोजी मांडले जाईल.२३८ सदस्यांच्या राज्यसभेत मोदी सरकार बहुमतापासून दूरच आहे. लोकसभेतील बहुतेक विरोधी पक्षांना हे विधेयक निवड समितीकडे पाठवून ते ‘अधिक चांगले’ केले जावे असे वाटते. त्यांनी लोकसभेत त्याला विरोध केलेला नाही. या पक्षांना आपल्या दृष्टिकोनाचा राज्यसभेत योग्य तो सन्मान राखला जावा, असे वाटते.या पक्षांचा युक्तिवाद असा आहे की विधेयक निवड समितीकडे पाठवल्यास काही आभाळ कोसळणार नाही व ते ३० जानेवारीपासून सुरू होणाºया अर्थसंकल्पीय अधिवेशनातही संमत होऊ शकते. परंतु मोदी सरकार राज्यसभेतील विरोधकांच्या विधेयक निवड समितीकडे पाठवण्याच्या दडपणाला बळी पडण्याची शक्यता नाही. राजकीय परिणाम काहीही होवा पंतप्रधान मोदी यांनी तीन वेळा तलाक विधेयक संमत करून घ्यायचा शब्द दिला आहे.अतिशय उच्च पातळीवरील सूत्रांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार हे विधेयक राज्यसभेत तीन जानेवारी रोजी सादर केले जाईल आणि राजकीय परिणामांची काळजी न करता ते त्याच दिवशी संमत करण्याचा आग्रह सरकार धरेल.भाजपमधील सूत्रांवर विश्वास ठेवला तर भाजप या विधेयकाच्या मुद्यावर संघर्षासाठी उत्सुक असून मतदानासाठी विधेयक सभागृहात सादर केले जाईल त्यावेळी विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षासारखेच वागतील, असे वाटते.पंतप्रधान मोदी यांनी पक्ष नेत्यांना ते तत्वांबद्दल तडजोड करणार नाहीत एवढेच काय विधेयकाचा पराभव होऊन राज्यसभेतील हानीही सोसण्याची जोखीम घ्यायला तयार आहेत, असे स्पष्ट केले आहे.मुस्लिम महिलांच्याहक्कांना विरोध करणारे पक्षअसे आपल्याबद्दल म्हटलेलेविरोधी पक्षांना वाटणार नाही, अशी मोदींना खात्री वाटते.पश्चिम बंगालमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या २७ टक्के आहे.त्यामुळे मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी पक्षाच्या खासदारांना लोकसभेत विधेयकाला विरोध करू नका, असे आदेश दिले होते.

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकIndiaभारतGovernmentसरकार