शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

Triple Talaq : महिलांना कोणते अधिकार, पतीला काय शिक्षा मिळणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 15:38 IST

Tripal Talaq Ordinance: केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी याबाबतची माहिती देताना काँग्रेसच्या अडेलतट्टू भुमिकेवरही टीका केली आहे. तसेच मुस्लिम महिलांसाठी हा कायदा न्याय घेऊन येणार असल्याचे म्हटले आहे. या कायद्यात काय तरतूद केली आहे ते पाहू.

नवी दिल्ली : राज्यसभेमध्ये अडकलेल्या तिहेरी तलाक विधेयकामधील दंडात्कम गुन्ह्याच्या तरतुदीला कायद्याचे स्वरुप देण्यासाठी आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी याबाबतची माहिती देताना काँग्रेसच्या अडेलतट्टू भुमिकेवरही टीका केली आहे. तसेच मुस्लिम महिलांसाठी हा कायदा न्याय घेऊन येणार असल्याचे म्हटले आहे. या कायद्यात काय तरतूद केली आहे ते पाहू.

तिहेरी तलाकचा खटला कधी दाखल होईल

तिहेरी तलाक घेतल्यास त्या महिलेच्या पतीला पोलीस तात्काळ अटक करू शकतात. यासाठी महिलेने तक्रार करायला हवी. याचबरोबर रक्ताचे नाते किंवा लग्नाच्या नात्यातील व्यक्तींनी तक्रार केल्यास पतीला अचक होऊ शकते. शेजारी किंवा अज्ञात व्यक्ती या प्रकरणात तक्रार दाकल करू शकत नाही.

समझोत्याचीही संधीहे विधेयक महिलांच्या सशक्तीकरणासाठी आहे. मात्र, याचबरोबर महिलांकडे समझोत्याचा पर्याय ठेवण्यात आला आहे. पत्नीच्या मर्जीनुसारच समझोता होऊ शकणार आहे. परंतू यासाठी न्यायदंडाधिखाऱ्यांनी घालून दिलेल्या अटींनुसार हा समझोता होणार आहे. 

जामिनासाठी काय अटकायद्यानुसार दंडाधिकारी पतीला जामिन देऊ शकतात. परंतू त्यांना आधी त्या महिलेची बाजू ऐकून घ्यावी लागणार आहे. घटस्फोट हा जरी पती-पत्नी यांच्यातील खासगी बाब असली तरीही पत्नीची बाजू ऐकाविच लागणार आहे. 

पोटगीसाठी काय तरतूदतिहेरी तलाकविरोधी कायद्यामध्ये छोट्या मुलांचा ताबा पत्नीकडे देण्याची तरतूद आहे. या मुलांच्या खर्चाचे अधिकार दंडाधिकारी ठरवतील. ठरेल तेवढी रक्कम पतीने महिलेला द्यायची आहे.

सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी एका प्रकरणात केंद्र सरकारला कायदा बनविण्याच्या सुचना केल्या होत्या. यानुसार केंद्र सरकारने विधेयक बनविले होते. लोकसभेमध्ये या विधेयकाला मंजुरी मिळाली होती. मात्र, राज्यसभेमध्ये हे विधेयक परत पाठविण्यात आले होते. यावेळी गुन्हेगार हा शब्दप्रयोग वापरल्याने काँग्रेसने आक्षेप नोंदविला होता. 

केंद्रीय मंत्रिमंडळाने अधिसुचना काढल्याने  हे विधेयक राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात आले असून पुढील सहा महिन्यात पुन्हा ते संसदेत सादर करावे लागणार आहे. यामुळे हे विधेयक मंजुर करण्यासाठी भाजपला पुन्हा कसरत करावी लागणार आहे.

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकCentral Governmentकेंद्र सरकारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय