शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
4
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
5
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
6
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
7
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
8
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
9
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
10
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
11
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
12
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
13
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
15
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
16
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
17
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
18
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
19
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
20
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार

तृणमूल नेत्यांना आसामात रोखले, मारहाणीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 05:28 IST

‘नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स’च्या अंतिम मसुद्याच्या प्रसिद्धीनंतर आसाममध्ये उद््भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या खासदार-आमदारांच्या आसाम भेटीवरून तृणमूल व भाजपामध्ये गुरुवारी खडाजंगी झाली.

नवी दिल्ली : ‘नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स’च्या अंतिम मसुद्याच्या प्रसिद्धीनंतर आसाममध्ये उद््भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या खासदार-आमदारांच्या आसाम भेटीवरून तृणमूल व भाजपामध्ये गुरुवारी खडाजंगी झाली. आमच्या शिष्टमंडळास सिलचर विमानतळावरच अडवून पोलिसांनी धक्काबुक्की, मारहाण केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला.आसाममध्ये त्यांनी जाण्याचे काही कारणच नाही, असे म्हणून भाजपाने त्यांना तत्काळ हाकलून देण्याची भाषा केली. या खासदार-आमदारांसोबत पोलिसांच्या झालेल्या झटापटीचे चित्रण स्थानिक वृत्तवाहिन्यांवर दाखविण्यात आले.तृणमूलचे सहा खासदार व दोन आमदारांचे शिष्टमंडळ दुपारी सिलचर येथे पोहोचले. तेथील नागरिक सम्मेलनात सहभागी होऊन नंतर नागांव व गुवाहाटीलाही जाण्याचा त्यांचा कार्यक्रम होता. सुखेंदू शेखर राय, काकोली घोष दस्तीदार, रत्ना डे नाग, नदिमूल हक, अर्पिता घोष व ममताबाला ठाकूर या खासदारांखेरीज प. बंगालचे नगरविकासमंत्री फिरहाद हकीम व आमदार महुआ मोईत्रा शिष्टमंडळात होते. पण सिलचर विमानतळावरच जिल्हा दंडाधिकारी व पोलिसांनी आम्हाला अडविले. एका पोलिसाने माझ्या छातीवर ठोसा मारला. काकोली दस्तीदार, ममताबाला ठाकूर व महुआ मोईत्रा यांनाही पोलिसांनी धक्काबुक्की केली, असा आरोप सुखेदू राय यांनी केला. ते हृदयरुग्ण आहेत.खा. घोष दस्तीदार म्हणाले की, पोलिसांनी आमचे मोबाइलही हिसकावून घेतले. ममताबाला व महुआ यांच्याप्रमाणे मलाही धक्काबुक्की केली व सुखेंंदू यांना मारहाण केली. आम्हाला बाहेर जाऊ देईपर्यंत आम्ही येथेच बसून राहू, असे खा. राय म्हणाले. खा. दस्तीदार म्हणाले की, विमानतळावर एक मॅजिस्ट्रेटही होता. शिष्टमंडळ सदस्य म्हणाले की, पुढे काय करायचे हे पक्ष नेतृत्वाशी बोलून ठरवू. संसदेतही हक्कभंग आणण्याची तयारी सुरू आहे. हे शिष्टमंडळ आसाममध्ये तणाव निर्माण करण्यासाठी गेल्याने त्यांना रोखणे योग्यच आहे, असे प. बंगाल प्रदेश भाजपाचे अध्यक्ष दिलीप घोष म्हणाले. त्यांना तेथे जाण्याचे कारणच काय?, असा सवालही त्यांनी केला. भाजपाचे चिटणीस राहुल सिन्हा म्हणाले की, त्यांना आसामधून सक्तीने बाहेर काढायला हवे.

टॅग्स :AssamआसामMamata Banerjeeममता बॅनर्जी