शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

समाजवादी, बसपा, राष्ट्रवादी, काँग्रेसनंतर आता ओवेसींच्या रडारवर तृणमूल काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 12:09 PM

ओवेसींनी आता आपला मोर्चा पश्चिम बंगालकडे वळविला आहे. येथे मोठ्या प्रमाणात मुस्लीम समुदाय आहे. ओवेसी यांची भाषणांनी मुस्लीम वर्ग त्यांच्याकडे लगेच आकर्षीत होतो. त्यामुळे ओवेसींच्या एन्ट्रीने ममता दीदींच्या अडचणीत वाढ होणार हे नक्की.

नवी दिल्ली - देशातील अनेक राज्यात निवडून येण्यासाठी नव्हे तर कमकुवत झालेल्या विरोधी पक्षांना आणखी कमकुवत करण्यासाठी आघाडीवर असलेले एमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांनी आता आपला मोर्चा पश्चिम बंगालकडे वळविला आहे. त्यांच्या बंगालमधील एंट्रीमुळे भाजपचा मार्ग सुकर होणार असून ममता बॅनर्जी यांचा मार्ग खडतर होण्याची शक्यता आहे. 

पश्चिम बंगालमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये सरळ लढत होणार असंच चित्र आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत भाजपने तृणमूलला पाडलेले खिंडार, विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे ममता दीदी सावध झाल्या आहेत. 

एमआयएमकडून पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. एमआयएमकडे प्रामुख्याने मुस्लीम मतदारांचा ओढा पाहायला मिळतो. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील मुस्लीम मते आपल्याकडे वळविण्यात ओवेसींना यश आले आहे. परंतु, कोणत्याही राज्यात एमआयएमला फारसं यश मिळालं नाही. त्यामुळे निवडून आणण्यापेक्षा भाजपविरोधी पक्षांचे उमेदवार पाडण्यातच एमआयएमचा हातखंडा मानला जातो. 

एमआयएममुळे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाला मोठा फटका बसला होता. तर भाजपने कधी नव्हे ते उत्तर प्रदेशात बहुमत मिळवून सरकार स्थापन केले. एमआयएमने त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात प्राचार केला. महाराष्ट्रात एमआयएमचे केवळ दोन उमेदवार विजयी झाले. परंतु, मुस्लीम मत विभागल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक उमेदवारांचा निसटता पराभव पत्करावा लागला.  

ओवेसींनी आता आपला मोर्चा पश्चिम बंगालकडे वळविला आहे. येथे मोठ्या प्रमाणात मुस्लीम समुदाय आहे. ओवेसी यांची भाषणांनी मुस्लीम वर्ग त्यांच्याकडे लगेच आकर्षीत होतो. त्यामुळे ओवेसींच्या एन्ट्रीने ममता दीदींच्या अडचणीत वाढ होणार हे नक्की.