शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

'डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींनाही भाजपच्या राजकारणाची लाज वाटली असती'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 16:47 IST

भाजपकडून डॉ. मुखर्जी यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी आदेश दिले नव्हते, असा आरोप केला आहे.

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील राजकीय चकमक अद्याप सुरूच आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकतीच भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी साजरी केली. टीएमसीकडून डॉ. मुखर्जी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बंगालचे मंत्री सोवनदेब चॅटर्जी यांनी डॉ. मुखर्जी यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर भाजपवर जोरदार टीका केली.

भारतीय जनता पक्षाकडून डॉ. मुखर्जी यांना हिंदुत्ववादी नेता म्हणून प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न होत आहे. भाजपच्या फोडा आणि राज्य करा या धोरणाला ही भूमिका सुट होते. परंतु, सत्य वेगळच आहे. डॉ. मुखर्जी कोलकाता विद्यापीठाचे कुलगुरू असताना त्यांनी विद्यापीठात इस्लामिक अभ्यासाची स्थापना केली होती. ते बंगालचे सच्चे सुपूत होते. त्यांचा वारसा लोकांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. डॉक्टर मुखर्जी आज जिवंत असते तर त्यांना भाजपच्या राजकारणाची लाज वाटली असती, अशी टीका सोवनदेब चॅटर्जी यांनी केली.

ममता बॅनर्जी सरकारमध्ये डॉ. मुखर्जी यांची पुण्यातिथी अशा वेळी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला, ज्यावेळी राज्यात भाजप मजबूत होत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने चांगली कामगिरी केली आहे. येथील ४२ पैकी १८ जागांवर भाजपचा विजय झाला आहे.

याआधी भाजपकडून डॉ. मुखर्जी यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी आदेश दिले नव्हते, असा आरोप केला आहे. त्यावेळी संपूर्ण देश त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी करत होता. डॉ. मुखर्जी यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असही भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटले आहे.