शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

'डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींनाही भाजपच्या राजकारणाची लाज वाटली असती'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 16:47 IST

भाजपकडून डॉ. मुखर्जी यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी आदेश दिले नव्हते, असा आरोप केला आहे.

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील राजकीय चकमक अद्याप सुरूच आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकतीच भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी साजरी केली. टीएमसीकडून डॉ. मुखर्जी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बंगालचे मंत्री सोवनदेब चॅटर्जी यांनी डॉ. मुखर्जी यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर भाजपवर जोरदार टीका केली.

भारतीय जनता पक्षाकडून डॉ. मुखर्जी यांना हिंदुत्ववादी नेता म्हणून प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न होत आहे. भाजपच्या फोडा आणि राज्य करा या धोरणाला ही भूमिका सुट होते. परंतु, सत्य वेगळच आहे. डॉ. मुखर्जी कोलकाता विद्यापीठाचे कुलगुरू असताना त्यांनी विद्यापीठात इस्लामिक अभ्यासाची स्थापना केली होती. ते बंगालचे सच्चे सुपूत होते. त्यांचा वारसा लोकांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. डॉक्टर मुखर्जी आज जिवंत असते तर त्यांना भाजपच्या राजकारणाची लाज वाटली असती, अशी टीका सोवनदेब चॅटर्जी यांनी केली.

ममता बॅनर्जी सरकारमध्ये डॉ. मुखर्जी यांची पुण्यातिथी अशा वेळी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला, ज्यावेळी राज्यात भाजप मजबूत होत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने चांगली कामगिरी केली आहे. येथील ४२ पैकी १८ जागांवर भाजपचा विजय झाला आहे.

याआधी भाजपकडून डॉ. मुखर्जी यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी आदेश दिले नव्हते, असा आरोप केला आहे. त्यावेळी संपूर्ण देश त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी करत होता. डॉ. मुखर्जी यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असही भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटले आहे.