शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

आदिवासी महिलेने दागिने गहाण ठेवून बांधलं शौचालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 16:11 IST

मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील एका महिलेने आपले दागिने गहाण ठेवून शौचालय बांधलं आहे. या महिलेचं नाव अन्नपुर्णा असं आहे. अन्नपुर्णा यांनी फक्त शौचालय बांधलं नाही, तर गावातील इतर कुटुंबांनाही शौचालय बांधण्यासाठी प्रेरणा देत आहेत.

ठळक मुद्देमध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील एका महिलेने आपले दागिने गहाण ठेवून शौचालय बांधलंअन्नपुर्णा यांनी शौचालय बांधण्यासाठी सरकारी निधीचीही वाट पाहिली नाहीअन्नपुर्ण यांच्यापासून प्रेरणा घेत गावातील अन्य कुटुंबांनीही घरात शौचालय बांधण्यास सुरुवात केलीये

भोपाळ - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आव्हानानंतर देशातील अनेक भागांमधून स्वच्छ भारत मोहिमेला पाठिंबा मिळताना दिसत आहे. मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील एका महिलेने आपले दागिने गहाण ठेवून शौचालय बांधलं आहे. या महिलेचं नाव अन्नपुर्णा असं आहे. अन्नपुर्णा यांनी फक्त शौचालय बांधलं नाही, तर गावातील इतर कुटुंबांनाही शौचालय बांधण्यासाठी प्रेरणा देत आहेत. गावाची लोकसंख्या फक्त 630 इतकी आहे. अन्नपुर्णा आपल्या कुटुंबासोबत राहतात. त्यांना चार अपत्य आहेत ज्यामध्ये दोन मुली आणि मुलं आहेत. अन्नपुर्णा यांचा पती मजुरीचं काम करतो. 

अन्नपुर्णा यांनी सांगितलं की, 'मला खुल्यावर शौचाला जायला आवडायचं नाही. त्यामुळेच मी तात्काळपणे शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला'. अन्नपुर्णा यांनी शौचालय बांधण्यासाठी सरकारी निधीचीही वाट पाहिली नाही आणि आपल्या कुटुंबासाठी दागिने गहाण ठेवून शौचालय बांधकामास सुरुवात केली. अन्नपुर्ण यांच्यापासून प्रेरणा घेत गावातील अन्य कुटुंबांनीही घरात शौचालय बांधण्यास सुरुवात केली आहे. याच गावातील 65 वर्षीय कालीबाई यांनी सांगितलं आहे की, मीदेखील माझ्या घरात शौचालय बांधलं आहे, जेणेकरुन आमच्या मुली, सुनेला उघड्यावर जावं लागू नये. 

अन्नपुर्णा आणि कालीबाई यांच्यापासून प्रेरित होत गावातील मीराबाई यांनीदेखील अधिका-यांच्या उपस्थितीत शौचालय बांधकामाला सुरुवात केली आहे. आता गावात एक समितीच नेमण्यात आला आहे. ही समिती सकाळी उठून स्वच्छतेचा संदेश देणार आणि गावातील लोकांकडून उघड्यावर शौचालयाला जाणार नसल्याची शपथ घेणार.

शौचालय नाही 'इज्जत घर' म्हणा, केंद्र सरकारचं सर्व राज्यांना पत्रकेंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधल्या जात असलेल्या शौचालयांचं नाव बदलून 'इज्जत घर' ठेवलं जाऊ शकतं. प्रत्येक राज्य आपापल्या मातृभाषेप्रमाणे हे नाव ठेऊ शकतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात वाराणसीत दौ-यात शौचालयाचं नाव 'इज्जत घर' ठेवल्याने कौतुक केलं होतं. यानंतर 16 ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारने सर्व राज्यांना पत्र लिहून शौचालयांना 'इज्जत घर' म्हणून संबोधलं पाहिजे असा सल्ला दिला आहे. अनेक भाषांचा वापर होत असणारी राज्ये 'इज्जत घर'शी समांतर दुसरं नाव ठेवू शकतात, असंही पत्रातून सुचवण्यात आलं आहे. 

वाराणसी दौ-यावर पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेव्हा एका शौचालयाचं उद्घाटन केलं होतं. त्यावेळी त्यांनी शौचालयाचं नाव 'इज्जत घर' ठेवल्याबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं होतं. पंतप्रधान मोदींनी यावेळी असेही म्हटले होते की, शहंशाहपूरमध्ये शौचालयाची पायाभरणी केली तेथे शौचालयावर इज्जतघर असे नाव देण्यात आले आहे. मला हे फार आवडले. ज्यांना आपल्या इज्जतची चिंता आहे ते नक्कीच इज्जतघर बांधतील.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानNarendra Modiनरेंद्र मोदी