शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

आदिवासींनाही हवे स्वतंत्र राज्य, एकवटले चार राज्यांतील कार्यकर्ते!

By रमाकांत.फकीरा.पाटील | Updated: June 17, 2025 14:16 IST

स्वतंत्र भिल्ल प्रदेश स्थापन करण्यात यावा यासाठी आदिवासी टायगर सेनेच्या चारही राज्यांतील कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन देवमोगरा येथे एल्गार पुकारला.

रमाकांत पाटीललोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार: महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या चार राज्यांतील आदिवासीबहुल जिल्हे जोडून स्वतंत्र भिल्ल प्रदेश स्थापन करण्यात यावा यासाठी आदिवासी टायगर सेनेच्या चारही राज्यांतील कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन देवमोगरा (गुजरात) येथे एल्गार पुकारला आहे. 

आदिवासींसाठी स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. स्वतंत्र भिल्ल प्रदेश निर्मितीसाठी महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या चार राज्यांतील कार्यकर्त्यांची एक स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. पहिली बैठक गुजरातमधील नानीनरोली येथे  झाली होती. त्यानंतर आता आदिवासींचे कुलदैवत असलेल्या याहामोगी मातेच्या देवमोगरा या गावात घेण्यात आली. यावेळी चारही राज्यांतील सुमारे दोन हजारांपेक्षा अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. आता तिसरी बैठक महाराष्ट्रात घेण्याचा निर्णयही यावेळी झाला.

असा हवा भिल्ल प्रदेशमहाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात व राजस्थान या चार राज्यांतील एकूण ४४ जिल्हे जोडून स्वतंत्र भिल्ल प्रदेश स्थापन करण्यात यावा, अशी मागणी आहे. 

-महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगावसह नाशिक, ठाणे आणि पालघर या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे तर मध्य प्रदेशातील इंदूर, गुना, शिवपुरी, मंदसोर, नीमच, रतलाम, धार, देवास, खंडवा, खरगोन, बऱ्हाणपूर, बडवानी, अलिराजपूर. 

-राजस्थानमधील बांसवाडा, डुंगरपूर, बाडमेर, जालोर, सिरोही, उदयपूर, झालावाड, राजसमद, चितोडगड, कोटा, बारा, पाली या जिल्ह्यांचा समावेश आहे.

 -गुजरातमधील अरवल्ली, महिसागर, दाहोद, पंचमहल, सुरत, वडोदरा, तापी, नवसारी, छोटा उदयपूर, नर्मदा, साबरकाठा, बनासकांठा, भरूच, वलसाड या जिल्ह्यांचा स्वतंत्र भिल्ल प्रदेशात समावेश व्हावा, अशी मागणी आहे.

भिल्ल प्रदेशची स्थापना व्हावी यासाठी त्या त्या भागातील लोकप्रतिनिधींवर दबाव टाकून ही मागणी विधानसभा व संसदेत करावी, गाव पातळीवर आंदोलन उभे करावे. सामाजिक चळवळीच्या माध्यमातून या प्रश्नावर लढा देण्याचा ठराव करण्यात आला आहे, अशी माहिती आदिवासी टायगर सेनेचे राष्ट्रीय प्रवक्ता अजय गावित यांनी दिली.

टॅग्स :GujaratगुजरातIndiaभारत