शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

आदिवासी पाड्यांवर नेत्यांच्या गाड्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 04:13 IST

विधानसभा निवडणुकीत जातींचा फॅक्टरही महत्त्वाचा ठरणार असून, एकगठ्ठा मते मिळावीत, यासाठी राजकीय नेते जातवार प्रचारावर भर देताना दिसत आहेत.

- धनाजी कांबळेहैदराबाद : विधानसभा निवडणुकीत जातींचा फॅक्टरही महत्त्वाचा ठरणार असून, एकगठ्ठा मते मिळावीत, यासाठी राजकीय नेते जातवार प्रचारावर भर देताना दिसत आहेत. विशेषत: आदिवासी बहुल भागांतील मतांवर डोळा ठेवून नेत्यांच्या गाड्या आदिवासी पाड्यांवर लवाजम्यासह येत आहेत.एरव्ही अभयारण्यात पर्यटकांची गर्दी असते. मात्र, सध्या कवाल अभयारण्यात नेत्यांची गर्दी आहे. हैदराबादपासून २५० किलोमीटर अंतरावरील अभयारण्याच्या परिसरात आदिवासींची संख्या मोठी आहे. हा भाग खानापूर मतदारसंघात येतो. येथे १.८३ लाख नागरिक मतदार आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात आदिवासींची संख्या आहे. त्यामुळेच इकडे सध्या नेते प्रचारफेऱ्या काढत आहेत.हा मतदारसंघ देखील एसटीसाठी राखीव आहे. ८९३ किलोमीटर परिसरात हा भाग पसरला असून, याच भागात सागवानी वृक्ष आढळतात. तसेच येथील जंगलात वाघ, चित्ता, सांबर, नीलगाय यांच्यासह पशूपक्षी देखील आहेत. जंगल परिसरात प्रचार करणे ही साधी गोष्ट नसल्याचे येथील उमेदवार थोडसम नागोराव यांनी सांगितले. लंबाडा समाजाचे लोक जंगलातून बाहेर येतजात असतात. मात्र, गोंड समाजाचे लोक जंगलातून बाहेर येत नाहीत. त्यामुळे गाडीतून उतरून छोट्या छोट्या पाड्यांवर जावे लागत आहे, असेही त्यांनी सांगितले.वेगवेगळी आश्वासने दिली जात आहेत. डोंगापल्ली येथील आदिवासी टीआरएस सरकारवर नाराज असून, ते आम्हालाच मदत करतील, असे दावे सर्वच उमेदवार करीत आहेत. टीआरएस सरकारने आदिवासींना ४००० रुपये प्रतिएकरला अनुदान दिले जाईल, असे म्हटले होते. मात्र, आजही आमच्या नावावर जमिनी झालेल्या नाहीत, असे रेखा नायक या आदिवासी महिलेने सांगितले. शेतकºयांप्रमाणे आम्ही कसत असलेली जमीन आमच्या नावावर झाल्यास आम्हाला आनंद वाटेल, असेही त्या म्हणाल्या.जमिनीचे प्रश्न सुटलेले नाहीत, मात्र टीआरएस किमान विकास करीत आहे, असे मल्याला ग्रामपंचायतीचे माजी सरपंच माणिक राव यांनी म्हटले. या भागात पहिल्यांदाच मतदान केंद्र असणार आहे. तसेच आम्हाला गॅस सिलिंडर मिळाले, पण त्यात गॅस भरण्यासाठी आमच्याकडे इतके पैसेच नाहीत, असे एका महिलेने सांगितले. तेलंगणात २६ लाख आदिवासी समाज आहे. खानापूर मतदारसंघातून दोन अपक्ष आणि १० पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. टीआरएसकडून आजमिरा रेखा, भाजपकडून अशोक सटला, रमेश राठोड हे काँग्रेसकडून, तर अजमेरा नायक बीएसपीकडून आणि थोडसम राव हे सीपीआयकडून निवडणूक लढवीत आहेत.> बळीचा बकरा बनवलातेलगु देसम पक्षाचे नेते आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी एनटीआर यांची नात असलेल्या नंदामुरी सुहासिनी यांना बळीचा बकरा बनविले आहे, असा आरोप के. टी. रामाराव यांनी केला. कुकटपल्लीमध्ये त्यांनी हा आरोप केला. चंद्राबाबूंनी आपले पुत्र एन. लोकेश यांना मंत्रीपदी बसवले त्यावरून त्यांचे नंदामुरी प्रेम बेगडी असल्याचे स्पष्ट होत असून, त्यांना खरेच नंदामुरी यांच्या कुटुंंबाबद्दल प्रेम असते, तर त्यांनी सुहासिनी यांना मंत्री केले असते. आता मात्र त्यांनी सुहासिनी यांना उमेदवारी देऊन त्यांना बळीचा बकरा बनवले आहे, असेही रामाराव म्हणाले.

टॅग्स :Telangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018