शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

चाचण्या घटल्या, बाधितांचे प्रमाण घटले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 06:51 IST

महाराष्ट्रात गेल्या पाच दिवसांत बाधितांच्या संख्येत १८ टक्के घट नोंदविण्यात आली. ४ मे रोजी महाराष्ट्रात चाचण्यांचे प्रमाण १७ टक्क्यांनी घटले तर ३ मे रोजी ३० टक्क्यांनी घट झाली होती.

हरीश गुप्ता

नवी दिल्ली : गेल्या पाच दिवसांत देशात कोरोना चाचण्यांचे प्रमाण २१ टक्क्यांनी घसरले आहे. परिणामी बाधितांच्या संख्येतही घट झाल्याचे चित्र आहे. बाधितांच्या संख्येत घट नोंदवली जात असल्याने देशव्यापी टाळेबंदीचा निर्णय घ्यावा किंवा नाही, या मुद्द्यावरून केंद्र सरकार संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे.

दिल्लीत चाचण्यांमध्ये सर्वाधिक घट

महाराष्ट्रात गेल्या पाच दिवसांत बाधितांच्या संख्येत १८ टक्के घट नोंदविण्यात आली. ४ मे रोजी महाराष्ट्रात चाचण्यांचे प्रमाण १७ टक्क्यांनी घटले तर ३ मे रोजी ३० टक्क्यांनी घट झाली होती. दिल्लीतही पाच दिवसांत २७ टक्क्यांनी चाचण्या कमी झाल्या आहेत. उत्तर प्रदेश कोरोनास्थिती उत्तमरित्या हाताळत असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलीकडेच केले होते. परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. उत्तर प्रदेशात २२ टक्क्यांनी रुग्णसंख्या घटली असली तरी चाचण्यांचे प्रमाण १५ टक्क्यांनी घटले असल्याचे निदर्शनास आले आहे.

आकडेवारी नेमकी किती?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीवरून देशात कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसत असले तरी त्यामागे चाचण्यांची घटलेली संख्या हे कारण आहे. उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये तर लोकांना कोरोना निगेटिव्ह असल्याचे चुकीचे अहवालही दिले जात आहेत किंवा ते पॉझिटिव्ह असल्याचे तोंडी सांगितले जात आहे. या अनागोंदीमुळे कोरोनाबाधितांची नेमकी आकडेवारी किती, याबाबत संभ्रम आहे.

    देशाचे चित्रn देशात गेल्या पाच दिवसांत चाचण्यांचे प्रमाण २१ टक्क्यांनी घसरले. ३० एप्रिल रोजी देशभरात १९ लाख ५० हजार चाचण्या करण्यात आल्या होत्या. तर ४ मे रोजी हेच प्रमाण १५ लाख ४० हजार एवढे होते. n नेमक्या याच कालावधीत देशातील कोरोनाबाधितांचा आलेख घसरू लागल्याचे आढळले. n चाचण्यांची संख्या घटल्याने रुग्णनोंद घटल्याचे वास्तव मात्र विचारात घेतले गेलेले नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसdelhiदिल्ली