शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 07:17 IST

इम्फाळ : मणिपूर येथील जिरिबाम जिल्ह्यात एक महिला, दोन लहान मुले यांचे मृतदेह मणिपूर-आसाम राज्यांच्या सीमेवर जिरी, बराक नद्यांच्या ...

इम्फाळ : मणिपूर येथील जिरिबाम जिल्ह्यात एक महिला, दोन लहान मुले यांचे मृतदेह मणिपूर-आसाम राज्यांच्या सीमेवर जिरी, बराक नद्यांच्या संगमाजवळ आढळून आले. बेपत्ता झालेल्या सहापैकी तीन जणांचे हे मृतदेह असावेत, असा पोलिसांचा कयास आहे. हत्या झालेल्या या तीन जणांना न्याय मिळावा या मागणीसाठी संतप्त जमावाने शनिवारी दोन मंत्री व तीन आमदारांच्या निवासस्थानांसमोर निदर्शने केली. त्यामुळे जिरिबाममध्ये जमावबंदी लागू करण्यात आली. लम्फेल सनकीथेल भागात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री सपम रंजन यांच्या निवासस्थानासमोर जमावाने निदर्शने केली. लॅम्फेल सनकीथेल डेव्हलपमेंट अथॉरिटीचे प्रतिनिधी डेव्हिड यांनी सांगितले की, याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेचे आश्वासन सपम रंजन यांनी दिले.

वृत्तपत्राच्या कार्यालयावर हल्ला

-संतप्त निदर्शकांनी मणिपूरचे ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री एल. सुसिंद्रो सिंग यांच्या घरासमोरही निदर्शने केली. इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील सगोलबंद भागात आंदोलकांनी भाजपचे आमदार व मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांचे जावई आर. के. इमो यांच्या घरासमोर निदर्शने केली.

-दोषींना २४ तासांच्या आत अटक करा अशा घोषणा जमावाने दिल्या. अपक्ष आमदार सपम निशिकांता सिंग यांना त्यांच्या निवासस्थानी भेटण्यासाठी आंदोलक आले होते. मात्र सपम यांची भेट न झाल्याने आंदोलकांनी त्यांच्या मालकीच्या स्थानिक वृत्तपत्राच्या कार्यालयावर हल्ला केला. कार्यालयासमोरील बांधकामांचीही नासधूस केली.

सुरक्षा दलांना सतर्कतेचे आदेश

गेल्या काही दिवसांतून मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराने डोके वर काढले आहे. दोन समुदायांत होणाऱ्या हिंसाचारामुळे निष्पाप लोकांचे बळी जात आहेत.त्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था व शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरक्षा दलांना आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत.यासंदर्भात केंद्रीय गृह खात्याने सांगितले की, गेल्या सोमवारी सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत ११ दहशतवादी ठार झाले. त्यानंतर दहशतवाद्यांनी एक महिला, दोन मुलांसह सहा जणांचे अपहरण केले होते. 

मृतदेहांची उत्तरीय तपासणी होणार

आढळलेले मृतदेह आसामच्या सिलचर वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले आहेत. त्यानंतर मृतदेहांची ओळख पटविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. स्थितीबाबत मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी शुक्रवारी रात्री राज्य मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांशी चर्चा केली होती. विविध ठिकाणी निदर्शने सुरू झाल्य़ाने शनिवारी सरकारने शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर केली.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारagitationआंदोलनCentral Governmentकेंद्र सरकारHome Ministryगृह मंत्रालय