शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 07:17 IST

इम्फाळ : मणिपूर येथील जिरिबाम जिल्ह्यात एक महिला, दोन लहान मुले यांचे मृतदेह मणिपूर-आसाम राज्यांच्या सीमेवर जिरी, बराक नद्यांच्या ...

इम्फाळ : मणिपूर येथील जिरिबाम जिल्ह्यात एक महिला, दोन लहान मुले यांचे मृतदेह मणिपूर-आसाम राज्यांच्या सीमेवर जिरी, बराक नद्यांच्या संगमाजवळ आढळून आले. बेपत्ता झालेल्या सहापैकी तीन जणांचे हे मृतदेह असावेत, असा पोलिसांचा कयास आहे. हत्या झालेल्या या तीन जणांना न्याय मिळावा या मागणीसाठी संतप्त जमावाने शनिवारी दोन मंत्री व तीन आमदारांच्या निवासस्थानांसमोर निदर्शने केली. त्यामुळे जिरिबाममध्ये जमावबंदी लागू करण्यात आली. लम्फेल सनकीथेल भागात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री सपम रंजन यांच्या निवासस्थानासमोर जमावाने निदर्शने केली. लॅम्फेल सनकीथेल डेव्हलपमेंट अथॉरिटीचे प्रतिनिधी डेव्हिड यांनी सांगितले की, याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेचे आश्वासन सपम रंजन यांनी दिले.

वृत्तपत्राच्या कार्यालयावर हल्ला

-संतप्त निदर्शकांनी मणिपूरचे ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री एल. सुसिंद्रो सिंग यांच्या घरासमोरही निदर्शने केली. इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील सगोलबंद भागात आंदोलकांनी भाजपचे आमदार व मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांचे जावई आर. के. इमो यांच्या घरासमोर निदर्शने केली.

-दोषींना २४ तासांच्या आत अटक करा अशा घोषणा जमावाने दिल्या. अपक्ष आमदार सपम निशिकांता सिंग यांना त्यांच्या निवासस्थानी भेटण्यासाठी आंदोलक आले होते. मात्र सपम यांची भेट न झाल्याने आंदोलकांनी त्यांच्या मालकीच्या स्थानिक वृत्तपत्राच्या कार्यालयावर हल्ला केला. कार्यालयासमोरील बांधकामांचीही नासधूस केली.

सुरक्षा दलांना सतर्कतेचे आदेश

गेल्या काही दिवसांतून मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराने डोके वर काढले आहे. दोन समुदायांत होणाऱ्या हिंसाचारामुळे निष्पाप लोकांचे बळी जात आहेत.त्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था व शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरक्षा दलांना आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत.यासंदर्भात केंद्रीय गृह खात्याने सांगितले की, गेल्या सोमवारी सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत ११ दहशतवादी ठार झाले. त्यानंतर दहशतवाद्यांनी एक महिला, दोन मुलांसह सहा जणांचे अपहरण केले होते. 

मृतदेहांची उत्तरीय तपासणी होणार

आढळलेले मृतदेह आसामच्या सिलचर वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले आहेत. त्यानंतर मृतदेहांची ओळख पटविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. स्थितीबाबत मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी शुक्रवारी रात्री राज्य मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांशी चर्चा केली होती. विविध ठिकाणी निदर्शने सुरू झाल्य़ाने शनिवारी सरकारने शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर केली.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारagitationआंदोलनCentral Governmentकेंद्र सरकारHome Ministryगृह मंत्रालय