शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

भारतातून तीन देशांत रेल्वेने प्रवास, पण...; जाणून घ्या तिकीट अन् व्हीसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 14:55 IST

भारत आणि नेपाळ या दोन देशांना जोडत एप्रिल २०२२ मध्ये भारत ते नेपाळ रेल्वेसेवा सुरू करण्यात आली.

भारतातील रेल्वेचं जाळ जगात प्रसिद्ध आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात भारतीय रेल्वेचा विस्तार झाला असून प्रवाशांच्या सेवेत प्रत्येक राज्यात रेल्वे धावते. मात्र, हीच भारतीय रेल्वे प्रवाशांना घेऊन विदेशातही जाते. देशात काश्मीर ते कन्याकुमारी आणि गुजरात ते सिक्कीमपर्यंतच्या मार्गावर रेल्वेतून भारतभ्रमंती करता येते. पण, भारतातून शेजारच्या देशातही रेल्वेने प्रवास करता येतो. भारतातून तुम्हाला नेपाळ, बांग्लादेश आणि पाकिस्तानला जाण्यासाठी थेट रेल्वे उपलब्ध आहे. 

भारत आणि नेपाळ या दोन देशांना जोडत एप्रिल २०२२ मध्ये भारत ते नेपाळ रेल्वेसेवा सुरू करण्यात आली. तर, भारतातून बांग्लादेशला जाण्यासाठीही अनेक रेल्वे धावतात. मात्र, पाकिस्तानला जाण्यासाठी केवळ दोनच रेल्वे आहेत, त्यावरही भारत सरकारने तुर्तात बंदी आणली आहे. त्यामुळे, भारतातून सध्या नेपाळ आणि बांग्लादेश या दोनच देशांत रेल्वे मार्गाने जाता येते. 

नेपाळसाठी 

भारतातून नेपाळसाठी २ एप्रिल २०२२ रोजी रेल्वेसेवा सुरू करण्यात आली. जयनगर ते जनकपूर ही कुर्था रेल्वे मार्गावरील प्रवासी सेवा सुरू करण्यात आली आहे. भारत आणि नेपाळ यांच्यात उभारण्यात येत असलेल्या जयनगर-बिजलपुरा-बर्दीबास रेल्वे योजनेच्या पहिल्या टप्प्यात जयनगर-जनकपुर/कुर्था रेलखंड जयनगर-बिजलपुरा-बर्दीबास (69.08 किमी) रेल्वे योजनेचा एक भाग आहे. या प्रवासात भारतीय नागरिकांना ओळखपत्र ठेवणे बंधनकारक आहे. नेपाळ जाण्यासाठी पासपोर्टची आवश्यकता नाही. त्यासाठी, रेल्वे स्टेशनहून तिकीट काढता येते. 

जयनगर येथून सकाळी 8:15 आणि दुपारी 2:45 वाजता जनकपूरसाठी ट्रेन रवाना होते. जयनगर येथून जनकपूरला जाण्यासाठी 1 तास 20 मिनटांचा अवधी लागतो. तर, जनकपूर येथून जयनगरला येण्यासाठी 1 तास 40 मिनिटांचा अवधी लागतो. जनकपूर येथून सकाळी 11.05 वाजता आणि सायंकाळी 5.35 वाजता जयनगरसाठी ट्रेन सुटते.

भारत-बांग्लादेशसाठी ट्रेन

मैत्री एक्सप्रेस - भारत आणि बांग्लादेश मार्गावर ही ट्रेन धावते, पश्चिम बंगालच्या कोलकाता स्थानकातून बांग्लादेशच्या ढाकापर्यंत ही ट्रेन धावते. आठवड्यातून 4 वेळा या ट्रेनचं वेळापत्रक ठेवण्यात आलं आहे. 

बंधन एक्सप्रेस- ही ट्रेन 2017 मध्ये सुरू झाली. जी कोलकाता ते बांग्लादेशच्या खुलनापर्यंत धावते. यापूर्वीही ही ट्रेन सुरू होती, मात्र, 1965 मध्ये ही सेवा बंद करण्यात आली होती. 

मिताली एक्सप्रेस - ही ट्रेन भारताच्या जलपाईगुड़ी आणि सिलीगुड़ी ते बांग्लादेशच्या ढाकापर्यंत धावते. या ट्रेनची सेवा आठवड्यात एकवेळ अशी देण्यात आली आहे. या मार्गावरील प्रवासात 513 किमीचे अंतर पार केले जाते. 

या ट्रेनने प्रवास करण्यासाठी व्हिजी किंवा पासपोर्टची गरज नाही. रेल्वे स्टेशनहून तुम्हाला तिकीट मिळू शकते. ओळखपत्र आणि काही कागदपत्रे तपासणी होताच तुम्हाला प्रवास करता येईल. 

भारत ते पाकिस्तान ट्रेन

भारत आणि पाकिस्तान देशांत दोन रेल्वे सेवा आहेत. त्यापैकी, एक ट्रेन समझौता एक्सप्रेस, तर दुसरी थार एक्सप्रेस. समझौता एक्सप्रेस आठवड्यात दोनवेळा राजधानी दिल्ली, अटारी येथून पाकिस्तानच्या लाहोरपर्यंत धावते. तर, थार एक्सप्रेस भगत की कोठी (जयपूर,राजस्थान) येथून कराचीपर्यंत धावते. दरम्यान, सध्या दोन्ही रेल्वेसेवा बंद आहेत. ९ ऑगस्ट २०१९ पासून दोन्ही देशातील वाढता तणाव लक्षात घेऊन ही प्रवास सेवा बंद करण्यात आली आहे. मात्र, पाकिस्तानमध्ये रेल्वेने जाण्यासाठी देखील अगोदर व्हिसा आणि पासपोर्ट बंधनकारक आहे.  

टॅग्स :railwayरेल्वेPakistanपाकिस्तानNepalनेपाळSamjhauta Expressसमझौता एक्सप्रेसBangladeshबांगलादेश