शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

प्रीमियम रेल्वेतील प्रवास ५० टक्क्यांपर्यंत महागला

By admin | Updated: September 9, 2016 04:43 IST

राजधानी, शताब्दी आणि दुरांतो या अतिजलद रेल्वेतून प्रवास करणे हे ५० टक्क्यांपर्यंत महाग झाले आहे.

नवी दिल्ली : राजधानी, शताब्दी आणि दुरांतो या अतिजलद रेल्वेतून प्रवास करणे हे ५० टक्क्यांपर्यंत महाग झाले आहे. सरकारने बुधवारी हा निर्णय घेतला. आता हे भाडे कमी खर्चाच्या विमान प्रवासाएवढे वा त्याहून अधिक झाले आहे. भाड्याच्या या नव्या रचनेतून केवळ पहिले दहा टक्के बर्थस् हे सध्याच्या भाड्यात उपलब्ध असतील. राहिलेली ९० टक्के तिकिटे ही मूळ भाड्याच्या (बेस फेअर) १० टक्के जास्त किमतीपासून सुरू होऊन एसी-टू टायरसाठी ५० टक्के तर एसी-थ्री टायरसाठी ४० टक्के जास्तीच्या भाड्यावर संपतील. हे दहापासून ते ५० टक्क्यांपर्यंतचे वाढीव भाडे नऊ सप्टेंबरपासून अमलात येईल परंतु त्याआधीच ज्यांनी तिकिटे काढून ठेवलेली (बुक) आहेत त्यांना हे जास्तीचे भाडे भरावे लागणार नाही. ही भाडेवाढ रचना प्रीमियम क्लास रेल्वेंना लागू आहे. दुरांतोतील नॉन एसी क्लासेसवरही याचा परिणाम होईल. परंतु सगळ््या प्रिमियम रेल्वेतील फर्स्ट एसी व एक्झिक्युटिव्ह चेअर क्लासेसना यातून वगळण्यात आले आहे. सध्या ४२ राजधानी, ४६ शताब्दी आणि ५४ दुरांतो रेल्वेंची सेवा उपलब्ध आहे. ही वाढ किमान भाड्यावर झाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)नव्या रचनेनुसार सर्वसामान्यांना द्यावे लागेल जास्त भाडेनव्या रचनेनुसार पहिले दहा टक्के बर्थ हे सध्याच्याच दराने मिळतील. नंतरचे दहा टक्के बर्थ दहा टक्के वाढीने त्यांची निम्मी संख्या गाठेपर्यंत विकले जातील. शेवटचे ५० टक्के बर्थ (एसी टू टायर) बेस फेअरचे थेट निम्मे भाडे जास्त आकारून विकले जातील. एसी-थ्री टायरमधील शेवटचे ६० टक्के बर्थ हे बेस फेअरच्या ४० टक्के जास्त आकारून विकले जातील. केटरिंग, रिझर्व्हेशन आणि सुपरफास्ट चार्जेस आणि सेवा कर मात्र सध्याच्याच दराने आकारले जातील. सध्याच्या बुकिंग पद्धतीनुसार प्रिमियम रेल्वेंत बुकिंग (प्रत्यक्ष प्रवासाआधी ९० दिवस) सुरू होताच पहिली ३० ते ४० टक्के तिकिटे काही मिनिटांतच विकली जातात. त्यामुळे साहजिकच जास्त भाडे भरून ते घ्यावे लागेल.मनमानी भाडेवाढ करून गरिबांना दाबून टाकण्याचा प्रयत्न1प्रीमियम रेल्वे भाड्यांत ५० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आल्यामुळे सगळे विरोधी पक्ष सरकारवर हल्ला करण्याच्या व भाडेवाढ मागे घेण्यास भाग पाडण्याच्या प्रयत्नांत आहेत. काँग्रेसने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. 2काँग्रेसशिवाय डावे पक्ष, जनता दल (युनायटेड), राष्ट्रीय जनता दलासह इतर पक्षांनीही या भाडेवाढीबद्दल रेल्वेमंत्र्यांवर टीका करून भाडेवाढ तत्काळ मागे घ्यावी अशी मागणीही केली आहे. 3काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी सरकारचा हा निर्णय तुघलकी असल्याचा आरोप केला. जास्त खर्च करण्याची क्षमता असलेल्या प्रवाशांच्या प्रथम श्रेणी आणि एक्झिक्युटिव्ह श्रेणीला या वाढीतून वगळण्यात आले आहे हे न समजण्यासारखे आहे, असे सांगून मोदी सरकार सत्तेत आल्यापासून रेल्वे भाडेवाढ कशी कशी झाली याची आकडेवारीच त्यांनी सादर केली. 4सण आणि उत्सवांच्या तोंडावर सरकार मनमानी भाडेवाढ करून गरीब आणि मध्यमवर्गाला दाबून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप अन्य विरोधी पक्षांनीही केला आहे.