शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

प्रीमियम रेल्वेतील प्रवास ५० टक्क्यांपर्यंत महागला

By admin | Updated: September 9, 2016 04:43 IST

राजधानी, शताब्दी आणि दुरांतो या अतिजलद रेल्वेतून प्रवास करणे हे ५० टक्क्यांपर्यंत महाग झाले आहे.

नवी दिल्ली : राजधानी, शताब्दी आणि दुरांतो या अतिजलद रेल्वेतून प्रवास करणे हे ५० टक्क्यांपर्यंत महाग झाले आहे. सरकारने बुधवारी हा निर्णय घेतला. आता हे भाडे कमी खर्चाच्या विमान प्रवासाएवढे वा त्याहून अधिक झाले आहे. भाड्याच्या या नव्या रचनेतून केवळ पहिले दहा टक्के बर्थस् हे सध्याच्या भाड्यात उपलब्ध असतील. राहिलेली ९० टक्के तिकिटे ही मूळ भाड्याच्या (बेस फेअर) १० टक्के जास्त किमतीपासून सुरू होऊन एसी-टू टायरसाठी ५० टक्के तर एसी-थ्री टायरसाठी ४० टक्के जास्तीच्या भाड्यावर संपतील. हे दहापासून ते ५० टक्क्यांपर्यंतचे वाढीव भाडे नऊ सप्टेंबरपासून अमलात येईल परंतु त्याआधीच ज्यांनी तिकिटे काढून ठेवलेली (बुक) आहेत त्यांना हे जास्तीचे भाडे भरावे लागणार नाही. ही भाडेवाढ रचना प्रीमियम क्लास रेल्वेंना लागू आहे. दुरांतोतील नॉन एसी क्लासेसवरही याचा परिणाम होईल. परंतु सगळ््या प्रिमियम रेल्वेतील फर्स्ट एसी व एक्झिक्युटिव्ह चेअर क्लासेसना यातून वगळण्यात आले आहे. सध्या ४२ राजधानी, ४६ शताब्दी आणि ५४ दुरांतो रेल्वेंची सेवा उपलब्ध आहे. ही वाढ किमान भाड्यावर झाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)नव्या रचनेनुसार सर्वसामान्यांना द्यावे लागेल जास्त भाडेनव्या रचनेनुसार पहिले दहा टक्के बर्थ हे सध्याच्याच दराने मिळतील. नंतरचे दहा टक्के बर्थ दहा टक्के वाढीने त्यांची निम्मी संख्या गाठेपर्यंत विकले जातील. शेवटचे ५० टक्के बर्थ (एसी टू टायर) बेस फेअरचे थेट निम्मे भाडे जास्त आकारून विकले जातील. एसी-थ्री टायरमधील शेवटचे ६० टक्के बर्थ हे बेस फेअरच्या ४० टक्के जास्त आकारून विकले जातील. केटरिंग, रिझर्व्हेशन आणि सुपरफास्ट चार्जेस आणि सेवा कर मात्र सध्याच्याच दराने आकारले जातील. सध्याच्या बुकिंग पद्धतीनुसार प्रिमियम रेल्वेंत बुकिंग (प्रत्यक्ष प्रवासाआधी ९० दिवस) सुरू होताच पहिली ३० ते ४० टक्के तिकिटे काही मिनिटांतच विकली जातात. त्यामुळे साहजिकच जास्त भाडे भरून ते घ्यावे लागेल.मनमानी भाडेवाढ करून गरिबांना दाबून टाकण्याचा प्रयत्न1प्रीमियम रेल्वे भाड्यांत ५० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आल्यामुळे सगळे विरोधी पक्ष सरकारवर हल्ला करण्याच्या व भाडेवाढ मागे घेण्यास भाग पाडण्याच्या प्रयत्नांत आहेत. काँग्रेसने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. 2काँग्रेसशिवाय डावे पक्ष, जनता दल (युनायटेड), राष्ट्रीय जनता दलासह इतर पक्षांनीही या भाडेवाढीबद्दल रेल्वेमंत्र्यांवर टीका करून भाडेवाढ तत्काळ मागे घ्यावी अशी मागणीही केली आहे. 3काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी सरकारचा हा निर्णय तुघलकी असल्याचा आरोप केला. जास्त खर्च करण्याची क्षमता असलेल्या प्रवाशांच्या प्रथम श्रेणी आणि एक्झिक्युटिव्ह श्रेणीला या वाढीतून वगळण्यात आले आहे हे न समजण्यासारखे आहे, असे सांगून मोदी सरकार सत्तेत आल्यापासून रेल्वे भाडेवाढ कशी कशी झाली याची आकडेवारीच त्यांनी सादर केली. 4सण आणि उत्सवांच्या तोंडावर सरकार मनमानी भाडेवाढ करून गरीब आणि मध्यमवर्गाला दाबून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप अन्य विरोधी पक्षांनीही केला आहे.