शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
5
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
6
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
7
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
8
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
9
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
10
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
11
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
12
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
13
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
14
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
15
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
16
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
17
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
18
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
19
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
20
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी

प्रीमियम रेल्वेतील प्रवास ५० टक्क्यांपर्यंत महागला

By admin | Updated: September 9, 2016 04:43 IST

राजधानी, शताब्दी आणि दुरांतो या अतिजलद रेल्वेतून प्रवास करणे हे ५० टक्क्यांपर्यंत महाग झाले आहे.

नवी दिल्ली : राजधानी, शताब्दी आणि दुरांतो या अतिजलद रेल्वेतून प्रवास करणे हे ५० टक्क्यांपर्यंत महाग झाले आहे. सरकारने बुधवारी हा निर्णय घेतला. आता हे भाडे कमी खर्चाच्या विमान प्रवासाएवढे वा त्याहून अधिक झाले आहे. भाड्याच्या या नव्या रचनेतून केवळ पहिले दहा टक्के बर्थस् हे सध्याच्या भाड्यात उपलब्ध असतील. राहिलेली ९० टक्के तिकिटे ही मूळ भाड्याच्या (बेस फेअर) १० टक्के जास्त किमतीपासून सुरू होऊन एसी-टू टायरसाठी ५० टक्के तर एसी-थ्री टायरसाठी ४० टक्के जास्तीच्या भाड्यावर संपतील. हे दहापासून ते ५० टक्क्यांपर्यंतचे वाढीव भाडे नऊ सप्टेंबरपासून अमलात येईल परंतु त्याआधीच ज्यांनी तिकिटे काढून ठेवलेली (बुक) आहेत त्यांना हे जास्तीचे भाडे भरावे लागणार नाही. ही भाडेवाढ रचना प्रीमियम क्लास रेल्वेंना लागू आहे. दुरांतोतील नॉन एसी क्लासेसवरही याचा परिणाम होईल. परंतु सगळ््या प्रिमियम रेल्वेतील फर्स्ट एसी व एक्झिक्युटिव्ह चेअर क्लासेसना यातून वगळण्यात आले आहे. सध्या ४२ राजधानी, ४६ शताब्दी आणि ५४ दुरांतो रेल्वेंची सेवा उपलब्ध आहे. ही वाढ किमान भाड्यावर झाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)नव्या रचनेनुसार सर्वसामान्यांना द्यावे लागेल जास्त भाडेनव्या रचनेनुसार पहिले दहा टक्के बर्थ हे सध्याच्याच दराने मिळतील. नंतरचे दहा टक्के बर्थ दहा टक्के वाढीने त्यांची निम्मी संख्या गाठेपर्यंत विकले जातील. शेवटचे ५० टक्के बर्थ (एसी टू टायर) बेस फेअरचे थेट निम्मे भाडे जास्त आकारून विकले जातील. एसी-थ्री टायरमधील शेवटचे ६० टक्के बर्थ हे बेस फेअरच्या ४० टक्के जास्त आकारून विकले जातील. केटरिंग, रिझर्व्हेशन आणि सुपरफास्ट चार्जेस आणि सेवा कर मात्र सध्याच्याच दराने आकारले जातील. सध्याच्या बुकिंग पद्धतीनुसार प्रिमियम रेल्वेंत बुकिंग (प्रत्यक्ष प्रवासाआधी ९० दिवस) सुरू होताच पहिली ३० ते ४० टक्के तिकिटे काही मिनिटांतच विकली जातात. त्यामुळे साहजिकच जास्त भाडे भरून ते घ्यावे लागेल.मनमानी भाडेवाढ करून गरिबांना दाबून टाकण्याचा प्रयत्न1प्रीमियम रेल्वे भाड्यांत ५० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आल्यामुळे सगळे विरोधी पक्ष सरकारवर हल्ला करण्याच्या व भाडेवाढ मागे घेण्यास भाग पाडण्याच्या प्रयत्नांत आहेत. काँग्रेसने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. 2काँग्रेसशिवाय डावे पक्ष, जनता दल (युनायटेड), राष्ट्रीय जनता दलासह इतर पक्षांनीही या भाडेवाढीबद्दल रेल्वेमंत्र्यांवर टीका करून भाडेवाढ तत्काळ मागे घ्यावी अशी मागणीही केली आहे. 3काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी सरकारचा हा निर्णय तुघलकी असल्याचा आरोप केला. जास्त खर्च करण्याची क्षमता असलेल्या प्रवाशांच्या प्रथम श्रेणी आणि एक्झिक्युटिव्ह श्रेणीला या वाढीतून वगळण्यात आले आहे हे न समजण्यासारखे आहे, असे सांगून मोदी सरकार सत्तेत आल्यापासून रेल्वे भाडेवाढ कशी कशी झाली याची आकडेवारीच त्यांनी सादर केली. 4सण आणि उत्सवांच्या तोंडावर सरकार मनमानी भाडेवाढ करून गरीब आणि मध्यमवर्गाला दाबून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप अन्य विरोधी पक्षांनीही केला आहे.