शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; जन्मदात्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
4
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
5
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
6
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
7
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
8
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
9
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
11
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
12
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
13
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
14
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
15
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
16
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
17
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
18
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी: कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
19
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
20
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू

प्रीमियम रेल्वेतील प्रवास ५० टक्क्यांपर्यंत महागला

By admin | Updated: September 9, 2016 04:43 IST

राजधानी, शताब्दी आणि दुरांतो या अतिजलद रेल्वेतून प्रवास करणे हे ५० टक्क्यांपर्यंत महाग झाले आहे.

नवी दिल्ली : राजधानी, शताब्दी आणि दुरांतो या अतिजलद रेल्वेतून प्रवास करणे हे ५० टक्क्यांपर्यंत महाग झाले आहे. सरकारने बुधवारी हा निर्णय घेतला. आता हे भाडे कमी खर्चाच्या विमान प्रवासाएवढे वा त्याहून अधिक झाले आहे. भाड्याच्या या नव्या रचनेतून केवळ पहिले दहा टक्के बर्थस् हे सध्याच्या भाड्यात उपलब्ध असतील. राहिलेली ९० टक्के तिकिटे ही मूळ भाड्याच्या (बेस फेअर) १० टक्के जास्त किमतीपासून सुरू होऊन एसी-टू टायरसाठी ५० टक्के तर एसी-थ्री टायरसाठी ४० टक्के जास्तीच्या भाड्यावर संपतील. हे दहापासून ते ५० टक्क्यांपर्यंतचे वाढीव भाडे नऊ सप्टेंबरपासून अमलात येईल परंतु त्याआधीच ज्यांनी तिकिटे काढून ठेवलेली (बुक) आहेत त्यांना हे जास्तीचे भाडे भरावे लागणार नाही. ही भाडेवाढ रचना प्रीमियम क्लास रेल्वेंना लागू आहे. दुरांतोतील नॉन एसी क्लासेसवरही याचा परिणाम होईल. परंतु सगळ््या प्रिमियम रेल्वेतील फर्स्ट एसी व एक्झिक्युटिव्ह चेअर क्लासेसना यातून वगळण्यात आले आहे. सध्या ४२ राजधानी, ४६ शताब्दी आणि ५४ दुरांतो रेल्वेंची सेवा उपलब्ध आहे. ही वाढ किमान भाड्यावर झाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)नव्या रचनेनुसार सर्वसामान्यांना द्यावे लागेल जास्त भाडेनव्या रचनेनुसार पहिले दहा टक्के बर्थ हे सध्याच्याच दराने मिळतील. नंतरचे दहा टक्के बर्थ दहा टक्के वाढीने त्यांची निम्मी संख्या गाठेपर्यंत विकले जातील. शेवटचे ५० टक्के बर्थ (एसी टू टायर) बेस फेअरचे थेट निम्मे भाडे जास्त आकारून विकले जातील. एसी-थ्री टायरमधील शेवटचे ६० टक्के बर्थ हे बेस फेअरच्या ४० टक्के जास्त आकारून विकले जातील. केटरिंग, रिझर्व्हेशन आणि सुपरफास्ट चार्जेस आणि सेवा कर मात्र सध्याच्याच दराने आकारले जातील. सध्याच्या बुकिंग पद्धतीनुसार प्रिमियम रेल्वेंत बुकिंग (प्रत्यक्ष प्रवासाआधी ९० दिवस) सुरू होताच पहिली ३० ते ४० टक्के तिकिटे काही मिनिटांतच विकली जातात. त्यामुळे साहजिकच जास्त भाडे भरून ते घ्यावे लागेल.मनमानी भाडेवाढ करून गरिबांना दाबून टाकण्याचा प्रयत्न1प्रीमियम रेल्वे भाड्यांत ५० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आल्यामुळे सगळे विरोधी पक्ष सरकारवर हल्ला करण्याच्या व भाडेवाढ मागे घेण्यास भाग पाडण्याच्या प्रयत्नांत आहेत. काँग्रेसने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. 2काँग्रेसशिवाय डावे पक्ष, जनता दल (युनायटेड), राष्ट्रीय जनता दलासह इतर पक्षांनीही या भाडेवाढीबद्दल रेल्वेमंत्र्यांवर टीका करून भाडेवाढ तत्काळ मागे घ्यावी अशी मागणीही केली आहे. 3काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी सरकारचा हा निर्णय तुघलकी असल्याचा आरोप केला. जास्त खर्च करण्याची क्षमता असलेल्या प्रवाशांच्या प्रथम श्रेणी आणि एक्झिक्युटिव्ह श्रेणीला या वाढीतून वगळण्यात आले आहे हे न समजण्यासारखे आहे, असे सांगून मोदी सरकार सत्तेत आल्यापासून रेल्वे भाडेवाढ कशी कशी झाली याची आकडेवारीच त्यांनी सादर केली. 4सण आणि उत्सवांच्या तोंडावर सरकार मनमानी भाडेवाढ करून गरीब आणि मध्यमवर्गाला दाबून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप अन्य विरोधी पक्षांनीही केला आहे.