शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

भारतातून पुन्हा समुद्रमार्गे हज यात्रा शक्य, अल्पसंख्य व्यवहारमंत्र्यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 23:55 IST

हज यात्रेकरूंना समुद्रमार्गे पाठविण्याचा पर्याय पुन्हा आजमावून पाहण्याच्या भारताच्या प्रस्तावास सौदी अरबस्तानने मान्यता दिल्याने भारतातील मुस्लिमांना या वार्षिक यात्रेसाठी जहाजाने जाणे लवकरच शक्य होऊ शकणार आहे.

नवी दिल्ली : हज यात्रेकरूंना समुद्रमार्गे पाठविण्याचा पर्याय पुन्हा आजमावून पाहण्याच्या भारताच्या प्रस्तावास सौदी अरबस्तानने मान्यता दिल्याने भारतातील मुस्लिमांना या वार्षिक यात्रेसाठी जहाजाने जाणे लवकरच शक्य होऊ शकणार आहे. पूर्वी जहाजाने जेद्दापर्यंत जाऊन भारतीय यात्रेकरू हज करत असत. परंतु गेली अनेक वर्षे यात्रेकरूंना फक्त विमानानेच पाठविले जात आहे.यंदाच्या हज यात्रेसंबंधी भारत व सौदी अरबस्तान दरम्यानच्या करारावर मक्का येथे स्वाक्ष-या केल्यानंतर केंद्रीय अल्पसंख्य व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी ही माहिती दिल्याचे एका सरकारी निवेदनात नमूद केले गेले.पुन्हा समुद्रमार्गाने हज यात्रा कधी व कशा प्रकारे सुरू केली जाऊ शकेल याचा तपशील दोन्ही देश आपसात चर्चा करून नजिकच्या भविष्यात ठरवतील, असेही नक्वी म्हणाले.जहाजप्रवास २-३ दिवसांचा समुद्राने हज यात्रेसाठी जायचे, तर त्यासाठी पूर्वी १२ ते १५ दिवस लागायचे. परंतु आताची जहाज आधुनिक आहेत आणि त्यातून एकाच वेळी ४ हजार ते ५ हजार यात्रेकरून प्रवास करू शकतात. त्यांचा वेगही खूप असतो.त्यामुळे दोन ते तीन दिवसांतच २३०० नॉटीकल मैलाचे अंतर पार केले जाऊ शकते, असेही नक्वी यांनी सांगितले. मात्र जेद्दाह येथे उतरल्यानंतर तेथून मक्क्यापर्यंतचा प्रवास आणखी ४ तासांचा आहे.खर्च कमी लागेलया निर्णयामुळे हज यात्रेचा खर्च बराच कमी होईल व गरीब मुस्लिमांनाही हजला जाणे शक्य होईल, असेही नक्वी म्हणाले.

टॅग्स :Indiaभारत