शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्टोबर महिन्यापासून दहा रूपयांनी महाग होणार दिल्ली मेट्रोचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 13:04 IST

गांधी जयंतीनंतर दिल्ली मेट्रोतून प्रवास तुमच्या खिशाला भारी पडणार आहे.

ठळक मुद्देगांधी जयंतीनंतर दिल्ली मेट्रोतून प्रवास तुमच्या खिशाला भारी पडणार आहे. दिल्ली मेट्रोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 3 ऑक्टोबरपासून तिकिटासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. दुसऱ्या पर्वातील भाडेवाढ ही 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. 

नवी दिल्ली- गांधी जयंतीनंतर दिल्ली मेट्रोतून प्रवास तुमच्या खिशाला भारी पडणार आहे. दिल्ली मेट्रोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 3 ऑक्टोबरपासून तिकिटासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने या वर्षी मे महिन्यात मेट्रोच्या तिकीट दरात वाढ केली होती. मे महिन्यात केलेली वाढ 10 मेपासून लागू करण्यात आली. आता दुसऱ्या पर्वातील भाडेवाढ ही 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. 

मेट्रो रेल्वेच्या तिकिटांचे नवे दर 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. पण त्याचा भार सर्वसामान्य लोकांवर 3 ऑक्टोबरपासून पडेल. 1 ऑक्टोबरला रविवार आणि 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीची सुट्टी आहे. त्यामुळे तीन तारखेपासून मेट्रोने प्रवास करताना प्रवाशांना वाढल्याला किंमतीचं तिकीट काढावं लागणार आहे. मेट्रोने प्रवास करतान सुरूवातीच्या पाच किलोमीटर अंतरासाठी ही भाडेवाढ नसेल पण त्याच्या पुढील स्लॅबसाठी दहा रूपये जास्त द्यावे लागणार आहेत.

मे महिन्यात तिकिटाचे दर वाढविल्यानंतर मेट्रोने प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचं दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या निदर्शनास आलं. जून 2016 मध्ये मेट्रोने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही या वर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत जास्त होती. मेमध्ये मेट्रोच्या तिकीट दरात वाढ झाल्याने प्रवास करणाऱ्यांची संख्या घटल्याचा डीएमआरसीचा अंदाज आहे. मेट्रो तिकिटांचे दर वाढविल्याने प्रवाशांची संख्या घटेल याची चिंता नसल्याचं डीएमआरसीचं म्हणणं आहे. यावर्षी मे महिन्यात मेट्रोच्या तिकीट दरात वाढ झाली होती, त्याआधी 2009 तिकीट किंमतीत वाढ झाली होती. विजेच्या खर्चासह वाढत्या ऑपरेटिंग खर्चामुळे डीएमआरसीकडून तिकीट दरात वाढ केल्याची मागणी केली होती. 

स्टाफ, ऊर्जा आणि रिपेयरिंग खर्चासाठी मेट्रोच्या तिकीट दरात वाढ करणं गरजेचं असल्याचं डीएमआरसीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.