शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 18:16 IST

केरळमध्ये रेल्वे अपघातात चार सफाई कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Kerala Expres Accident : दक्षिण भारतातील केरळमधील पलक्कड येथे शनिवारी एक भीषण अपघात झाला. केरळमधील पलक्कडजवळ केरळ एक्स्प्रेस ट्रेनच्या धडकेत चार स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे. मृत सफाई कर्मचारी हे तामिळनाडू येथील रहिवासी होते. पुलावरून चालत असताना केरळ एक्स्प्रेसने त्यांना धडक दिली. तिघांचे मृतदेह हाती लागले असून एका व्यक्तीच्या मृतदेहाचा नदीत शोध सुरू आहे. रेल्वे पोलिसांनी ही माहिती दिली आहे.

तमिळनाडूतील चार स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पथक भरतपुझा नदीच्या पुलावरील ट्रॅक साफ करत होते. तेवढ्यात केरळ एक्सप्रेस ट्रेन आली. ते वेळेत दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि रुळांमध्ये अडकले. त्यामुळे रेल्वेची धडक बसल्याने ते नदीत पडले. या अपघातात चार सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून त्यात दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. सध्या तिन्ही मृतदेह हाती लागले असून चौथ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. वल्ली, राणी, लक्ष्मण आणि आणखी एक अनोळखी पुरुष अशी मृतांची नावे आहेत.

चार स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पथक भरतपुझा नदीच्या पुलावरील ट्रॅक साफ करत होते. त्याचवेळी केरळ एक्स्प्रेसने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की सर्व सफाई कामगार पुलावरून खाली पडले. यातील तिघांचे मृतदेह सापडले आहेत, तर एका सफाई कामगाराचा मृतदेह सापडलेला नाही. नदीत पडल्यानंतर सफाई कामगाराचा मृतदेह वाहून गेला असावा, अशी भीती व्यक्त व्यक्त करण्यात येत आहे.

दुपारी ३.०५ च्या सुमारास नवी दिल्ली-तिरुवनंतपुरम ट्रेनने या कर्मचाऱ्यांना धडक दिली. हे सफाई कामगार रेल्वे स्थानकापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या शोरणूर पुलाजवळील रेल्वे रुळावरील कचरा साफ करत होते. या धडकेमुळे साफसफाईच्या कामात गुंतलेले रेल्वे कर्मचारी रुळावरून खाली पडले. रेल्वे पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरु आहे. "कर्मचाऱ्यांनी ट्रेन येताना पाहिली नसावी, ज्यामुळे हा अपघात झाला असण्याची शक्यता आहे. पुढील तपास सुरू आहे," असे शोरनूर रेल्वे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

दुसरीकडे, उत्तर प्रदेशातील लखनऊ-गोंडा रेल्वे मार्गावरील बहराइचमधील जारवाल रोड पोलीस स्टेशन परिसरात शुक्रवारी सकाळी मालगाडीची धडक बसून दोन महिलांचा मृत्यू झाला. जारवाल रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झुकिया गावातील शाहजहान (४२) आणि सलमा (४०) या दोघी रेल्वे रुळ ओलांडून रोजच्या कामासाठी शेतात गेल्या होत्या. परत येताना त्यांनी ट्रेनचा आवाज ऐकला आणि दुसऱ्या ट्रॅकच्या मधोमध जाऊन थांबल्या आणि ट्रेन सुटण्याची वाट पाहू लागली. दरम्यान, ज्या ट्रॅकवर दोघे उभ्या होत्या त्याच ट्रॅकवर दुसरी ट्रेन आली. मालगाडीने धडक दिल्याने दोघींचा जागीच मृत्यू झाला. 

टॅग्स :KeralaकेरळIndian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघात