शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 18:16 IST

केरळमध्ये रेल्वे अपघातात चार सफाई कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Kerala Expres Accident : दक्षिण भारतातील केरळमधील पलक्कड येथे शनिवारी एक भीषण अपघात झाला. केरळमधील पलक्कडजवळ केरळ एक्स्प्रेस ट्रेनच्या धडकेत चार स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे. मृत सफाई कर्मचारी हे तामिळनाडू येथील रहिवासी होते. पुलावरून चालत असताना केरळ एक्स्प्रेसने त्यांना धडक दिली. तिघांचे मृतदेह हाती लागले असून एका व्यक्तीच्या मृतदेहाचा नदीत शोध सुरू आहे. रेल्वे पोलिसांनी ही माहिती दिली आहे.

तमिळनाडूतील चार स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पथक भरतपुझा नदीच्या पुलावरील ट्रॅक साफ करत होते. तेवढ्यात केरळ एक्सप्रेस ट्रेन आली. ते वेळेत दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि रुळांमध्ये अडकले. त्यामुळे रेल्वेची धडक बसल्याने ते नदीत पडले. या अपघातात चार सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून त्यात दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. सध्या तिन्ही मृतदेह हाती लागले असून चौथ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. वल्ली, राणी, लक्ष्मण आणि आणखी एक अनोळखी पुरुष अशी मृतांची नावे आहेत.

चार स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पथक भरतपुझा नदीच्या पुलावरील ट्रॅक साफ करत होते. त्याचवेळी केरळ एक्स्प्रेसने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की सर्व सफाई कामगार पुलावरून खाली पडले. यातील तिघांचे मृतदेह सापडले आहेत, तर एका सफाई कामगाराचा मृतदेह सापडलेला नाही. नदीत पडल्यानंतर सफाई कामगाराचा मृतदेह वाहून गेला असावा, अशी भीती व्यक्त व्यक्त करण्यात येत आहे.

दुपारी ३.०५ च्या सुमारास नवी दिल्ली-तिरुवनंतपुरम ट्रेनने या कर्मचाऱ्यांना धडक दिली. हे सफाई कामगार रेल्वे स्थानकापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या शोरणूर पुलाजवळील रेल्वे रुळावरील कचरा साफ करत होते. या धडकेमुळे साफसफाईच्या कामात गुंतलेले रेल्वे कर्मचारी रुळावरून खाली पडले. रेल्वे पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरु आहे. "कर्मचाऱ्यांनी ट्रेन येताना पाहिली नसावी, ज्यामुळे हा अपघात झाला असण्याची शक्यता आहे. पुढील तपास सुरू आहे," असे शोरनूर रेल्वे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

दुसरीकडे, उत्तर प्रदेशातील लखनऊ-गोंडा रेल्वे मार्गावरील बहराइचमधील जारवाल रोड पोलीस स्टेशन परिसरात शुक्रवारी सकाळी मालगाडीची धडक बसून दोन महिलांचा मृत्यू झाला. जारवाल रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झुकिया गावातील शाहजहान (४२) आणि सलमा (४०) या दोघी रेल्वे रुळ ओलांडून रोजच्या कामासाठी शेतात गेल्या होत्या. परत येताना त्यांनी ट्रेनचा आवाज ऐकला आणि दुसऱ्या ट्रॅकच्या मधोमध जाऊन थांबल्या आणि ट्रेन सुटण्याची वाट पाहू लागली. दरम्यान, ज्या ट्रॅकवर दोघे उभ्या होत्या त्याच ट्रॅकवर दुसरी ट्रेन आली. मालगाडीने धडक दिल्याने दोघींचा जागीच मृत्यू झाला. 

टॅग्स :KeralaकेरळIndian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघात