शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 18:16 IST

केरळमध्ये रेल्वे अपघातात चार सफाई कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Kerala Expres Accident : दक्षिण भारतातील केरळमधील पलक्कड येथे शनिवारी एक भीषण अपघात झाला. केरळमधील पलक्कडजवळ केरळ एक्स्प्रेस ट्रेनच्या धडकेत चार स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे. मृत सफाई कर्मचारी हे तामिळनाडू येथील रहिवासी होते. पुलावरून चालत असताना केरळ एक्स्प्रेसने त्यांना धडक दिली. तिघांचे मृतदेह हाती लागले असून एका व्यक्तीच्या मृतदेहाचा नदीत शोध सुरू आहे. रेल्वे पोलिसांनी ही माहिती दिली आहे.

तमिळनाडूतील चार स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पथक भरतपुझा नदीच्या पुलावरील ट्रॅक साफ करत होते. तेवढ्यात केरळ एक्सप्रेस ट्रेन आली. ते वेळेत दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि रुळांमध्ये अडकले. त्यामुळे रेल्वेची धडक बसल्याने ते नदीत पडले. या अपघातात चार सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून त्यात दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. सध्या तिन्ही मृतदेह हाती लागले असून चौथ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. वल्ली, राणी, लक्ष्मण आणि आणखी एक अनोळखी पुरुष अशी मृतांची नावे आहेत.

चार स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पथक भरतपुझा नदीच्या पुलावरील ट्रॅक साफ करत होते. त्याचवेळी केरळ एक्स्प्रेसने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की सर्व सफाई कामगार पुलावरून खाली पडले. यातील तिघांचे मृतदेह सापडले आहेत, तर एका सफाई कामगाराचा मृतदेह सापडलेला नाही. नदीत पडल्यानंतर सफाई कामगाराचा मृतदेह वाहून गेला असावा, अशी भीती व्यक्त व्यक्त करण्यात येत आहे.

दुपारी ३.०५ च्या सुमारास नवी दिल्ली-तिरुवनंतपुरम ट्रेनने या कर्मचाऱ्यांना धडक दिली. हे सफाई कामगार रेल्वे स्थानकापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या शोरणूर पुलाजवळील रेल्वे रुळावरील कचरा साफ करत होते. या धडकेमुळे साफसफाईच्या कामात गुंतलेले रेल्वे कर्मचारी रुळावरून खाली पडले. रेल्वे पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरु आहे. "कर्मचाऱ्यांनी ट्रेन येताना पाहिली नसावी, ज्यामुळे हा अपघात झाला असण्याची शक्यता आहे. पुढील तपास सुरू आहे," असे शोरनूर रेल्वे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

दुसरीकडे, उत्तर प्रदेशातील लखनऊ-गोंडा रेल्वे मार्गावरील बहराइचमधील जारवाल रोड पोलीस स्टेशन परिसरात शुक्रवारी सकाळी मालगाडीची धडक बसून दोन महिलांचा मृत्यू झाला. जारवाल रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झुकिया गावातील शाहजहान (४२) आणि सलमा (४०) या दोघी रेल्वे रुळ ओलांडून रोजच्या कामासाठी शेतात गेल्या होत्या. परत येताना त्यांनी ट्रेनचा आवाज ऐकला आणि दुसऱ्या ट्रॅकच्या मधोमध जाऊन थांबल्या आणि ट्रेन सुटण्याची वाट पाहू लागली. दरम्यान, ज्या ट्रॅकवर दोघे उभ्या होत्या त्याच ट्रॅकवर दुसरी ट्रेन आली. मालगाडीने धडक दिल्याने दोघींचा जागीच मृत्यू झाला. 

टॅग्स :KeralaकेरळIndian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघात