शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
4
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
5
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
6
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
7
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
8
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
9
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
10
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
11
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
12
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
13
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
14
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
15
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
16
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
17
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
18
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
19
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
20
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?

'PoK वापसी'चा ट्रेलर! मोदी सरकारच्या प्लॅननं पाकचा होणार तिळपापड; लोकसेभेत खास विधेयक सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 22:10 IST

महत्वाचे म्हणजे, काही जण हा 'PoK वापसी'चा ट्रेलर असल्याचेही बोलत आहेत.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने ज्या पद्धतीने काश्मिरमध्ये लागू असलेले कलम 370 हटविले, आता त्याच पद्धथीने PoK परत घेण्यावरही काम सुरू झाले आहे. याच पार्श्वभूमीवर, नरेंद्र मोदी सरकारने मंगळवारी लोकसभेत असे विधेयक सादर केले आहे, ज्यामुळे पाकिस्तानचा तिळपापड होणे निश्चित आहे, असे मानले जात आहे. महत्वाचे म्हणजे, काही जण हा 'PoK वापसी'चा ट्रेलर असल्याचेही बोलत आहेत.

काश्मीरी पंडितांसाठी रिझर्व्हेशन! -केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक 2023 सादर केले. या विधेयकात विस्थापित काश्मिरी पंडितांसाठी 2 जागा राखीव ठेवण्यासंदर्भात तरतूद करण्यात आली आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर, उपराज्यपाल कश्मिरी पंडित समुदायातील 2 सदस्यांना नॉमिनेट करू शकतील. PoK विस्थापितांसाठीही जम्मू काश्मीर असेम्बलीमध्ये आरक्षणाची तरतुदही करण्यात आली आहे. तेथे, एलजी त्यांच्या वतीने 1 सदस्य नॉमिनेट करू शकतील.

'एका देशात दोन पंतप्रधान आणि दोन संविधान कसे'? -केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी लोकसभेत जम्मू-काश्मीरशी संबंधित दोन विधेयके सादर केली. यातील पहिले म्हणजे, 'जम्मू काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक 2023' आणि दुसरे म्हणजे, जम्मू काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक 2023'. विधेयक मांडताना गृहमंत्री म्हणाले, एका देशात दोन पंतप्रधान, दोन संविधान आणि दोन ध्वज कसे असू शकतात? ज्यांनी हे केले त्यांनी चूक केली. पंतप्रधान मोदींनी ते दुरुस्त केले. देशात एक प्रधान, एक निशाण आणि एकच विधान असावे, असे आम्ही 1950 पासून म्हणत आलो आहोत.

'आम्ही इतिहासातील चूक दुरुस्त केली' -केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, 'आम्ही देशात एक पंतप्रधान, एक ध्वज आणि एक संविधान केले. आम्ही इतिहासातील चुका दुरुस्त केली.' जम्मू-काश्मीर आरक्षण विधेयकात काश्मिरी पंडितांसाठी विधानसभेत 2 जागा आणि पीओकेमधून विस्थापितांसाठी 1 जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. मोदी सरकारच्या या विधेयकांवर पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'ते प्रत्येक संस्थेची पायमल्ली करत आहेत' -महेबुबा मुफ्ती यांनी आरोप केला की, असे सर्व कायदे अवैध आहेत. संविधानातील कलम 370 बेकायदेशीरपणे रद्द केले गेले आहे आणि हे प्रकरण न्यायालयात विचाराधीन आहे. जेव्हा असे एखादे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात विचाराधीन असताना, सरकार त्यावर कायदा कसा बनवू शकते. हे बेकायदेशीर आहे. ते संविधान, संसद आणि सर्वोच्च न्यायालयाची पायमल्ली करत आहेत. ते देशातील प्रत्येक संस्थेची पायमल्ली करत आहेत.' 

टॅग्स :Amit Shahअमित शाहCentral Governmentकेंद्र सरकारlok sabhaलोकसभाParliamentसंसदJammu Kashmirजम्मू-काश्मीर