शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

'PoK वापसी'चा ट्रेलर! मोदी सरकारच्या प्लॅननं पाकचा होणार तिळपापड; लोकसेभेत खास विधेयक सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 22:10 IST

महत्वाचे म्हणजे, काही जण हा 'PoK वापसी'चा ट्रेलर असल्याचेही बोलत आहेत.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने ज्या पद्धतीने काश्मिरमध्ये लागू असलेले कलम 370 हटविले, आता त्याच पद्धथीने PoK परत घेण्यावरही काम सुरू झाले आहे. याच पार्श्वभूमीवर, नरेंद्र मोदी सरकारने मंगळवारी लोकसभेत असे विधेयक सादर केले आहे, ज्यामुळे पाकिस्तानचा तिळपापड होणे निश्चित आहे, असे मानले जात आहे. महत्वाचे म्हणजे, काही जण हा 'PoK वापसी'चा ट्रेलर असल्याचेही बोलत आहेत.

काश्मीरी पंडितांसाठी रिझर्व्हेशन! -केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक 2023 सादर केले. या विधेयकात विस्थापित काश्मिरी पंडितांसाठी 2 जागा राखीव ठेवण्यासंदर्भात तरतूद करण्यात आली आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर, उपराज्यपाल कश्मिरी पंडित समुदायातील 2 सदस्यांना नॉमिनेट करू शकतील. PoK विस्थापितांसाठीही जम्मू काश्मीर असेम्बलीमध्ये आरक्षणाची तरतुदही करण्यात आली आहे. तेथे, एलजी त्यांच्या वतीने 1 सदस्य नॉमिनेट करू शकतील.

'एका देशात दोन पंतप्रधान आणि दोन संविधान कसे'? -केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी लोकसभेत जम्मू-काश्मीरशी संबंधित दोन विधेयके सादर केली. यातील पहिले म्हणजे, 'जम्मू काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक 2023' आणि दुसरे म्हणजे, जम्मू काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक 2023'. विधेयक मांडताना गृहमंत्री म्हणाले, एका देशात दोन पंतप्रधान, दोन संविधान आणि दोन ध्वज कसे असू शकतात? ज्यांनी हे केले त्यांनी चूक केली. पंतप्रधान मोदींनी ते दुरुस्त केले. देशात एक प्रधान, एक निशाण आणि एकच विधान असावे, असे आम्ही 1950 पासून म्हणत आलो आहोत.

'आम्ही इतिहासातील चूक दुरुस्त केली' -केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, 'आम्ही देशात एक पंतप्रधान, एक ध्वज आणि एक संविधान केले. आम्ही इतिहासातील चुका दुरुस्त केली.' जम्मू-काश्मीर आरक्षण विधेयकात काश्मिरी पंडितांसाठी विधानसभेत 2 जागा आणि पीओकेमधून विस्थापितांसाठी 1 जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. मोदी सरकारच्या या विधेयकांवर पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'ते प्रत्येक संस्थेची पायमल्ली करत आहेत' -महेबुबा मुफ्ती यांनी आरोप केला की, असे सर्व कायदे अवैध आहेत. संविधानातील कलम 370 बेकायदेशीरपणे रद्द केले गेले आहे आणि हे प्रकरण न्यायालयात विचाराधीन आहे. जेव्हा असे एखादे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात विचाराधीन असताना, सरकार त्यावर कायदा कसा बनवू शकते. हे बेकायदेशीर आहे. ते संविधान, संसद आणि सर्वोच्च न्यायालयाची पायमल्ली करत आहेत. ते देशातील प्रत्येक संस्थेची पायमल्ली करत आहेत.' 

टॅग्स :Amit Shahअमित शाहCentral Governmentकेंद्र सरकारlok sabhaलोकसभाParliamentसंसदJammu Kashmirजम्मू-काश्मीर