शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
3
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
4
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
5
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
6
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
7
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
8
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
9
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
10
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
11
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
12
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
13
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
14
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
15
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
16
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
17
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
18
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
19
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
20
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर

आधुनिकतेच्या नव्या टप्प्याकडे; अनेक बदल आणि अपेक्षांचे व्हिजन-२0२0

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 05:19 IST

नव्या वर्षातील बदलांची सुरुवात नव्या संकल्पांनीच होत असते. आजपासून सुरू झालेले २0२0 तर अनेक अर्थांनी महत्त्वाचे आहे.

नव्या वर्षातील बदलांची सुरुवात नव्या संकल्पांनीच होत असते. आजपासून सुरू झालेले २0२0 तर अनेक अर्थांनी महत्त्वाचे आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, शेतीतील नवे प्रयोग, हवामानानुरूप शेतीचे नियोजन, डिजिटल आरोग्य सेवा, ई-कॉमर्समध्ये असलेल्या असंख्य संधी, अनेक सरकारी उपक्रमांचे खासगीकरण, येऊ घातलेली ५-जी सेवा, पर्यावरणपूरक वाहने, ड्रोनची नवनवी उड्डाणे, पर्यटनात होत असलेली वाढ, परदेशांत शिकायला जाणारे भारतीय विद्यार्थी आणि शिक्षणाचा हब बनत चाललेल्या भारतात शिकण्यासाठी येणारे परदेशी विद्यार्थी, ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे कमी होणारे चित्रपटगृहांचे महत्त्व, त्यासाठी तयार होणारे चित्रपट आणि वेबसीरिज अशा अनेक बाबी या वर्षांत अधिक ठसठशीत होतील. सोन्याच्या दराने आणि शेअर बाजाराने घेतलेली भरारी २0२0 मध्येही सुरूच राहणार आहे. हे होत असताना नव्या वर्षामध्ये शांतता आणि राजकीय सलोखा कायम राहावा, ही सर्वांचीच इच्छा असणार. आधुनिकतेच्या नव्या टप्प्यावर एकमेकांना शुभेच्छा देतानाच रोजगारनिर्मिती व वस्तूंना मागणी वाढावी आणि आर्थिक मंदीतून देश लवकरात लवकर बाहेर यावा, अशी प्रार्थना सर्वांनीच करू या!नव्या वर्षात पदार्पण करताना पायाभूत सुविधांसाठी १00 लाख कोटींची गुंतवणूक योजना, रेल्वे दरात अगदी किरकोळ झालेली वाढ आणि अयोध्येतील वाद संपण्याचा अखेरचा टप्पा अशा बातम्या वाचायला मिळणार आहेत. मनोज नरवणे या मराठी माणसाने भारताचे लष्करप्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतल्याची बातमीही अशीच समाधानाची, मान ताठ करणारी.गेला महिनाभर एनआरसी व सीएएवरून चाललेली हिंसक आंदोलने आणि त्यावरून गढूळ होत गेलेले वातावरण यांपासून सर्वांना सुटका हवी आहे. त्यावर वाद, चर्चा अवश्य व्हावी, पण तणाव नको, असेच प्रत्येकाला वाटत असणार. राजकीय व सामाजिक वाद सामोपचाराने सुटावेत आणि त्यातून कमालीच्या खालच्या पातळीवर होणारे आरोप थांबावेत, अशीही प्रत्येकाची इच्छा असणार. पण हे सारे चालत राहते. वर्ष बदलले म्हणून ते काही लगेच संपणार नाही.मात्र त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे नव्या वर्षात आपण आधुनिकतेच्या आणखी वरच्या पायरीकडे जाणार आहोत. भारताला २0२५ पर्यंत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखविले आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षात हे बदल वेगाने व्हायलाच हवेत. त्यासाठी पहिल्या वर्षात नेमके काय बदल होणार, त्याचा आपल्याला काय फायदा होणार, कोणत्या बदलांमुळे देशाचे व जनतेचे भले होईल, याची सर्वांनाच उत्सुकता आहे आणि असेल.सन २0२0 मध्ये भारताची व्हिजन काय आहे, यात प्रत्येकाला रस आहे. बुलेट ट्रेन, खासगी रेल्वेगाड्या, मेट्रो, लॅपटॉप, पामटॉम, मोबाइल, आर्टिफिशियल इंटलिजन्स, नवनवी गॅजेट्स, पर्यावरणपूरक वाहने, पेपरलेस आरोग्यसेवा, डिजिटल क्रांतीच्या दिशेने वाटचाल यांचा विचार २५/३0 वर्षांपूर्वी कोणाच्याही मनात आला नसता. पण तो पल्ला आपण सहज पार केला. आता पुढचा टप्पा काय आहे, याची उत्सुकता आहे.