शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

आधुनिकतेच्या नव्या टप्प्याकडे; अनेक बदल आणि अपेक्षांचे व्हिजन-२0२0

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 05:19 IST

नव्या वर्षातील बदलांची सुरुवात नव्या संकल्पांनीच होत असते. आजपासून सुरू झालेले २0२0 तर अनेक अर्थांनी महत्त्वाचे आहे.

नव्या वर्षातील बदलांची सुरुवात नव्या संकल्पांनीच होत असते. आजपासून सुरू झालेले २0२0 तर अनेक अर्थांनी महत्त्वाचे आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, शेतीतील नवे प्रयोग, हवामानानुरूप शेतीचे नियोजन, डिजिटल आरोग्य सेवा, ई-कॉमर्समध्ये असलेल्या असंख्य संधी, अनेक सरकारी उपक्रमांचे खासगीकरण, येऊ घातलेली ५-जी सेवा, पर्यावरणपूरक वाहने, ड्रोनची नवनवी उड्डाणे, पर्यटनात होत असलेली वाढ, परदेशांत शिकायला जाणारे भारतीय विद्यार्थी आणि शिक्षणाचा हब बनत चाललेल्या भारतात शिकण्यासाठी येणारे परदेशी विद्यार्थी, ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे कमी होणारे चित्रपटगृहांचे महत्त्व, त्यासाठी तयार होणारे चित्रपट आणि वेबसीरिज अशा अनेक बाबी या वर्षांत अधिक ठसठशीत होतील. सोन्याच्या दराने आणि शेअर बाजाराने घेतलेली भरारी २0२0 मध्येही सुरूच राहणार आहे. हे होत असताना नव्या वर्षामध्ये शांतता आणि राजकीय सलोखा कायम राहावा, ही सर्वांचीच इच्छा असणार. आधुनिकतेच्या नव्या टप्प्यावर एकमेकांना शुभेच्छा देतानाच रोजगारनिर्मिती व वस्तूंना मागणी वाढावी आणि आर्थिक मंदीतून देश लवकरात लवकर बाहेर यावा, अशी प्रार्थना सर्वांनीच करू या!नव्या वर्षात पदार्पण करताना पायाभूत सुविधांसाठी १00 लाख कोटींची गुंतवणूक योजना, रेल्वे दरात अगदी किरकोळ झालेली वाढ आणि अयोध्येतील वाद संपण्याचा अखेरचा टप्पा अशा बातम्या वाचायला मिळणार आहेत. मनोज नरवणे या मराठी माणसाने भारताचे लष्करप्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतल्याची बातमीही अशीच समाधानाची, मान ताठ करणारी.गेला महिनाभर एनआरसी व सीएएवरून चाललेली हिंसक आंदोलने आणि त्यावरून गढूळ होत गेलेले वातावरण यांपासून सर्वांना सुटका हवी आहे. त्यावर वाद, चर्चा अवश्य व्हावी, पण तणाव नको, असेच प्रत्येकाला वाटत असणार. राजकीय व सामाजिक वाद सामोपचाराने सुटावेत आणि त्यातून कमालीच्या खालच्या पातळीवर होणारे आरोप थांबावेत, अशीही प्रत्येकाची इच्छा असणार. पण हे सारे चालत राहते. वर्ष बदलले म्हणून ते काही लगेच संपणार नाही.मात्र त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे नव्या वर्षात आपण आधुनिकतेच्या आणखी वरच्या पायरीकडे जाणार आहोत. भारताला २0२५ पर्यंत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखविले आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षात हे बदल वेगाने व्हायलाच हवेत. त्यासाठी पहिल्या वर्षात नेमके काय बदल होणार, त्याचा आपल्याला काय फायदा होणार, कोणत्या बदलांमुळे देशाचे व जनतेचे भले होईल, याची सर्वांनाच उत्सुकता आहे आणि असेल.सन २0२0 मध्ये भारताची व्हिजन काय आहे, यात प्रत्येकाला रस आहे. बुलेट ट्रेन, खासगी रेल्वेगाड्या, मेट्रो, लॅपटॉप, पामटॉम, मोबाइल, आर्टिफिशियल इंटलिजन्स, नवनवी गॅजेट्स, पर्यावरणपूरक वाहने, पेपरलेस आरोग्यसेवा, डिजिटल क्रांतीच्या दिशेने वाटचाल यांचा विचार २५/३0 वर्षांपूर्वी कोणाच्याही मनात आला नसता. पण तो पल्ला आपण सहज पार केला. आता पुढचा टप्पा काय आहे, याची उत्सुकता आहे.