शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

बेगुसरायमध्ये कन्हैया कुमारची वाट बिकट, मतविभागणी वाढवणार कटकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 21:52 IST

डाव्या विचारांचा विद्यार्थी नेता कन्हैया कुमार आणि भाजपाचा कडवा हिंदुत्ववादी चेहरा असलेले गिरिराज सिंह हे आमने-सामने येणार असल्याने बिहारमधील बेगुसराय मतदारसंघ देशपातळीवरील राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे.

बेगुसराय - डाव्या विचारांचा विद्यार्थी नेता कन्हैया कुमार आणि भाजपाचा कडवा हिंदुत्ववादी चेहरा असलेले गिरिराज सिंह हे आमने-सामने येणार असल्याने बिहारमधील बेगुसराय मतदारसंघ देशपातळीवरील राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. एकेकाळी डाव्या पक्षांचा गड असलेल्या या मतदारसंघात गेल्या निवडणुकीत भाजपाने बाजी मारली होती. दरम्यान, यावेळच्या निवडणुकीत भाकपला महाआघाडीने जागावाटपात बेगुसराय मतदारसंघ न दिल्याने भाकपने स्वतंत्रपणे कन्हैयाला उमेदवारी दिली आहे. मात्र आरजेडीने तन्वीर हसन यांना मैदानात उतरवल्याने कन्हैया कुमारची वाट बिट झाली आहे. कन्हैया कुमारने केंद्रात सत्ताधारी असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात जोरदार आघाडी उघडली होती. त्यामुळे बिहारमध्ये सत्ताधारी एनडीएविरोधात उभ्या करण्यात आलेल्या महाआघाडीकडून कन्हैया कुमारला बेगुसराय येथून उमेदवारी देण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र महाआघाडीत झालेल्या जागावाटपाच्या घोळानंतर बेगुसराय येथून राजद नेते तन्वीर हसन यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे भाकपने कन्हैया कुमार याला स्वतंत्रपणे रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला. मात्र या दोन्ही उमेदवारांमध्ये होणाऱ्या मतविभागणीचा लाभ गिरिराज सिंह यांना मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, कन्हैया कुमार आणि गिरिराज सिंह यांच्यात थेट लढत झाली असती तर त्याचा फायदा कन्हैया कुमार याला झाला असता. मात्र तिरंगी लढतीमुळे मतांचे गणित बिघडणार असल्याचा दावा राजकीय विश्लेषकांकडून करण्यात येत आहे. कन्हैया कुमारवर झालेला देशद्रोहाच्या आरोपामुळे त्याच्याविरोधात प्रखर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून गिरिराज सिंह यांना उरवण्याचा निर्णय भाजपाने घेतला. गिरिराज सिंह हे सुरुवातीला येथून लढण्यास इच्छुक नव्हते. मात्र मनधरणीनंतर त्यांनी बेगुसराय येथून कन्हैया कुमारच्या विरोधात लढण्यास होकार दिला. 2014 मध्ये भाजपाच्या भोला सिंह यांनी आरजेडीच्या तन्वीर हसन यांना 58 हजार मतांनी पराभूत केले होते. भोला सिंह हे सुद्धा पूर्वाश्रमीचे भाकपचे माजी नेते होते. नंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. दरम्यान 2014 मध्ये त्यांना एकूण मतदानाच्या 39.72 टक्के म्हणजे 4 लाख 28 हजार मते मिळाली होती. तर त्यांचे प्रतिस्पर्धी तन्वीर हसन यांना 34.31 टक्के म्हणजे 3 लाख 70 हजार मते मिळाली होती. तर भाकपचे उमेदवार राजेंद्र प्रसाद सिंह यांना 17.87 टक्के म्हणजेच दोन लाख मते मिळाली होती.    

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमारbegusarai-pcबेगूसरायBihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक 2019BJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक