शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

बेगुसरायमध्ये कन्हैया कुमारची वाट बिकट, मतविभागणी वाढवणार कटकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 21:52 IST

डाव्या विचारांचा विद्यार्थी नेता कन्हैया कुमार आणि भाजपाचा कडवा हिंदुत्ववादी चेहरा असलेले गिरिराज सिंह हे आमने-सामने येणार असल्याने बिहारमधील बेगुसराय मतदारसंघ देशपातळीवरील राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे.

बेगुसराय - डाव्या विचारांचा विद्यार्थी नेता कन्हैया कुमार आणि भाजपाचा कडवा हिंदुत्ववादी चेहरा असलेले गिरिराज सिंह हे आमने-सामने येणार असल्याने बिहारमधील बेगुसराय मतदारसंघ देशपातळीवरील राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. एकेकाळी डाव्या पक्षांचा गड असलेल्या या मतदारसंघात गेल्या निवडणुकीत भाजपाने बाजी मारली होती. दरम्यान, यावेळच्या निवडणुकीत भाकपला महाआघाडीने जागावाटपात बेगुसराय मतदारसंघ न दिल्याने भाकपने स्वतंत्रपणे कन्हैयाला उमेदवारी दिली आहे. मात्र आरजेडीने तन्वीर हसन यांना मैदानात उतरवल्याने कन्हैया कुमारची वाट बिट झाली आहे. कन्हैया कुमारने केंद्रात सत्ताधारी असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात जोरदार आघाडी उघडली होती. त्यामुळे बिहारमध्ये सत्ताधारी एनडीएविरोधात उभ्या करण्यात आलेल्या महाआघाडीकडून कन्हैया कुमारला बेगुसराय येथून उमेदवारी देण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र महाआघाडीत झालेल्या जागावाटपाच्या घोळानंतर बेगुसराय येथून राजद नेते तन्वीर हसन यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे भाकपने कन्हैया कुमार याला स्वतंत्रपणे रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला. मात्र या दोन्ही उमेदवारांमध्ये होणाऱ्या मतविभागणीचा लाभ गिरिराज सिंह यांना मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, कन्हैया कुमार आणि गिरिराज सिंह यांच्यात थेट लढत झाली असती तर त्याचा फायदा कन्हैया कुमार याला झाला असता. मात्र तिरंगी लढतीमुळे मतांचे गणित बिघडणार असल्याचा दावा राजकीय विश्लेषकांकडून करण्यात येत आहे. कन्हैया कुमारवर झालेला देशद्रोहाच्या आरोपामुळे त्याच्याविरोधात प्रखर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून गिरिराज सिंह यांना उरवण्याचा निर्णय भाजपाने घेतला. गिरिराज सिंह हे सुरुवातीला येथून लढण्यास इच्छुक नव्हते. मात्र मनधरणीनंतर त्यांनी बेगुसराय येथून कन्हैया कुमारच्या विरोधात लढण्यास होकार दिला. 2014 मध्ये भाजपाच्या भोला सिंह यांनी आरजेडीच्या तन्वीर हसन यांना 58 हजार मतांनी पराभूत केले होते. भोला सिंह हे सुद्धा पूर्वाश्रमीचे भाकपचे माजी नेते होते. नंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. दरम्यान 2014 मध्ये त्यांना एकूण मतदानाच्या 39.72 टक्के म्हणजे 4 लाख 28 हजार मते मिळाली होती. तर त्यांचे प्रतिस्पर्धी तन्वीर हसन यांना 34.31 टक्के म्हणजे 3 लाख 70 हजार मते मिळाली होती. तर भाकपचे उमेदवार राजेंद्र प्रसाद सिंह यांना 17.87 टक्के म्हणजेच दोन लाख मते मिळाली होती.    

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमारbegusarai-pcबेगूसरायBihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक 2019BJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक