शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

आरबीआय व केंद्रामधील वाद चिघळणार, आता 'हे' दोन अधिकारी आले आमने-सामने 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 11:42 IST

विशेष म्हणजे या वादात मंत्रालयाच्या टॉप अधिका-यांनी आता उडी घेतली आहे.

नवी दिल्ली- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि केंद्र सरकारमधील वाद काही शमण्याचं नाव घेत नाहीये. आरबीआयनं झालेले मतभेद सार्वजनिक केल्यानंतर आता अर्थ मंत्रालयानंही आरबीआयवर आगपाखड करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे या वादात मंत्रालयाच्या टॉप अधिका-यांनी आता उडी घेतली आहे. त्यामुळे सरकार आणि आरबीआयमधील वाद आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.आर्थिक प्रकरणातील अर्थ मंत्रालयाचे सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी आरबीआयचे उप गव्हर्नर वीरल आचार्य यांच्या विधानावर टिप्पणी केली आहे. त्यानंतर आरबीआयनं आपल्या वेबसाइटवर अन्य उप गव्हर्नर एन. एस. विश्वनाथ यांनी जमशेदपूरमध्ये या आठवड्यात दिलेलं व्याख्यान अपलोड केलं आहे. ज्यात पैशांची उणीव भागवण्यासाठी सरकार कसं अपयशी ठरतंय, याचा दाखला देण्यात आला आहे. बँका मजबूत झाल्याचा फक्त ढिंढोरा पिटला जातोय. परंतु खरी परिस्थिती तशी नाही, असं ते म्हणाले आहेत. मंत्रालयाचे आर्थिक प्रकरणातील सचिव सुभाष चंद्र गर्ग यांच्यावर आरबीआय आणि अर्थमंत्रालयातील संबंध चांगले राहतील, अशी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. केंद्रीय बँकेच्या स्वायत्ततेचा सन्मान न करणा-या सरकारांना आज नाही, तर उद्या बाजारातील आक्रोशाला सामोरं जावं लागतं, असं वीरल आचार्य म्हणाले होते. या विधानाचा हवाला देत गर्ग यांनी देशातील आर्थिक परिस्थिती सुधारत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाही 73वर पोहोचला आहे. तर ब्रेंट क्रूड ऑइलही 73 डॉलरच्या खाली आले आहे.बाजाराची परिस्थिती 4 टक्के सुधारली आहे. बाँड यील्ड्स 7.8 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. हाच बाजारांचा आक्रोश आहे काय, असा प्रश्नही सुभाष चंद्र गर्ग यांनी उपस्थित केला आहे. वीज क्षेत्रातील योजनांमध्ये अडकलेल्या बँकांच्या समस्येच्या समाधानावरून केंद्र आणि आरबीआयमध्ये वाद आहेत. या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्रालयानं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला तीन पत्रे पाठवली आहेत. विशेष म्हणजे ही पत्रे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अॅक्ट 7 अंतर्गत पाठवण्यात आली आहेत. त्यामुळे केंद्र सरकार रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला आदेश देऊ इच्छितात, अशीही चर्चा आहे. यापूर्वी या कायद्याचा कधीही वापर करण्यात आलेला नाही.  

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकCentral Governmentकेंद्र सरकार